३१ कोरोनामुक्त तर ३६ नव्यांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:36 IST2021-01-08T05:36:26+5:302021-01-08T05:36:26+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात गुरुवारी ३१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ३६ कोरोनाबाधित रुग्णांची ...

३१ कोरोनामुक्त तर ३६ नव्यांची भर
चंद्रपूर : जिल्ह्यात गुरुवारी ३१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ३६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ५५६ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१ हजार ८४१ झाली आहे. सध्या ३३९ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८२ हजार ६३५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ५७ हजार ६९६ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
गुरुवारी मृत झालेल्यांमध्ये खडसंगी ता. चिमूर येथील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३७६ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३४३, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ ११, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
गुरुवारी बाधित आलेल्या ३६ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील १२, चंद्रपूर तालुका तीन, बल्लारपूर दोन, भद्रावती दोन, मूल तीन, सावली दोन, गोंडपिपरी दोन, राजुरा तीन, वरोरा पाच व कोरपना येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.