शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

दर्जेदार शिक्षणासाठी ३०० शाळांचे रूपडे पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 05:00 IST

ज्यावेळी जि. प. ला चांगले अधिकारी मिळाले तेव्हाच प्रगतीचा आलेख उंचावला आहे. शिक्षणाबाबत एक मॉडेल जिल्हा करण्यासाठी  शाळांचे डिजिटलायझेशन करू. प्रत्येक विषयाचे चांगले शिक्षक नेमावेत. विषयतज्ज्ञ शिक्षकांद्वारे एकाच वेळी ३०० शाळांत ऑनलाइन पद्धतीने शिकविता आले पाहिजे. स्पर्धा परीक्षा, नीट, जेईई आदी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचा एक तास अभ्यास व्हावा, असे नियोजन करा, अशा सूचनाही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षण हे आपले ‘ॲसेट’ असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यातील २० याप्रमाणे ३०० शाळा अत्याधुनिक करण्याचा मानस आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेला तीन कोटींचा निधी देऊ, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. चंद्रपूर जि. प. हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त  कर्मवीर मा.सा. कन्नमवार सभागृहातील  कार्यक्रमात ते बोलत होते.  मंचावर आमदार किशोर जोरगेवार, प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरुनुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, प्रकाश देवतळे उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर जि. प. स्थापनेचे हे हीरकमहोत्सवी वर्ष आहे. जि. प. ही ग्रामीण भागातील विकासाचा कणा मानली जाते. ज्यावेळी जि. प. ला चांगले अधिकारी मिळाले तेव्हाच प्रगतीचा आलेख उंचावला आहे. शिक्षणाबाबत एक मॉडेल जिल्हा करण्यासाठी  शाळांचे डिजिटलायझेशन करू. प्रत्येक विषयाचे चांगले शिक्षक नेमावेत. विषयतज्ज्ञ शिक्षकांद्वारे एकाच वेळी ३०० शाळांत ऑनलाइन पद्धतीने शिकविता आले पाहिजे. स्पर्धा परीक्षा, नीट, जेईई आदी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचा एक तास अभ्यास व्हावा, असे नियोजन करा, अशा सूचनाही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केल्या. आरोग्य सुविधा, जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे दर्जेदार असावीत. जि. प. प्रशासकीय इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी प्रास्ताविक, तर सावन चालखुरे यांनी संचालन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे यांनी आभार मानले. यावेळी सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विभाग प्रमुखांचे  दोनदा प्रशिक्षण घ्यावेआमदार किशोर जोरगेवार म्हणाले, २९ पैकी केवळ १४ विषय जि. प.कडे आहेत. सर्व विभाग प्रमुखांचे वर्षातून दोनदा प्रशिक्षण घ्यावे. प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी जि. प. हीरक महोत्सव ही आनंदाची घटना आहे, ६० वर्षांत जिल्ह्याचा बराच विकास झाला, असे सांगितले.

 

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण