शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

२८७ युवक- युवतींनी केला अवयवदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:50 IST

भारत हा बहुतांशी गरीब लोकांचा देश आहे. येथील कोट्यवधी लोकांना अवयवदानाची गरज आहे. परंतु आपल्याकडे पाहिजे त्या प्रमाणात अवयवदान विषयक जागृकता नसल्याने ते केवळ काही लोकच करतात. मोहन फाऊंडेशन, चेन्नई यांनी बाबा आमटे यांच्या आनंदवनातील श्रमसंस्कार छावणीत उपस्थित शिबिरार्थी युवक-युवतींसमोर अवयवदानाचे महत्त्व विषद केले.

ठळक मुद्देप्रेरणादायी उपक्रम : आनंदवनातील श्रमसंस्कार छावणीत सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

लोकमत न्यूज नेटवर्कआनंदवन (ता.वरोरा) : भारत हा बहुतांशी गरीब लोकांचा देश आहे. येथील कोट्यवधी लोकांना अवयवदानाची गरज आहे. परंतु आपल्याकडे पाहिजे त्या प्रमाणात अवयवदान विषयक जागृकता नसल्याने ते केवळ काही लोकच करतात. मोहन फाऊंडेशन, चेन्नई यांनी बाबा आमटे यांच्या आनंदवनातील श्रमसंस्कार छावणीत उपस्थित शिबिरार्थी युवक-युवतींसमोर अवयवदानाचे महत्त्व विषद केले. छावणीतील २८७ शिबिरार्थी युवक युवतींनी कागदोपत्री पूर्तता करीत अवयवदानाचा संकल्प जाहीर केला.जागतिक कीर्तीचे थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी युवकांसोबत सामाजिक कार्य सुरू केले. युवकांना जात, धर्म व पंथ यापलिकडे जाऊन प्रत्येकाला सामाजिक बांधिलकी व राष्ट्र विकासात योगदान देता आले पाहिजे. राष्ट्रासाठी काम करता आले पाहिजे. प्रत्येकाला अवयवदान करून ते करता येईल. त्यासाठी पैशाची गरज नाही. गरिबातील गरीबही अवयवदान करून आपले सामाजिक दायित्व निभावू शकतो. हार्ट, लिव्हर, किडनी, स्कीन, नेत्रदान तथा शरिरातील बहुतांश अवयव दान करून तो गरजुंच्या उपयोगी पडू शकतो. त्यासाठी पैशाची गरज नाही. त्यामुळे सुशिक्षितांनी अवयवदानाचे महत्त्व समजून ते गरजुंना दान करण्याचे आवाहन डॉ. हेमल कान्विन्दे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत आमटे परिवारासह श्रमसंस्कार छावणीतील मुंबई, पुणे, जालना, कोल्हापूर, लातूर, जळगाव, दिल्ली, चेन्नई, केरळ व विदर्भातून आलेल्या २८७ युवक-युवतींनी उदंड प्रतिसाद देऊन आपले फार्म भरून दिले. आणि अवयवदान चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला. या अभियानात मोहन फाऊंडेशन चेन्नईचे डॉ. रवी वानखेडे, नागपूर येथील डॉ. हेमल कान्वेंदे आणि त्यांची चमू तथा महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचीव डॉ. विकास आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संयोजक डॉ. शितल आमटे, विश्वस्त सुधाकर कडू, गौतम करजगी, रवींद्र नलगिंटवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी देशाच्या विविध भागातून आलेले २७७ युवक तथा २२० युवती अशा एकूण ४९७ शिबिराथीर्नी उपस्थिती लावली.बाबा आमटे यांनी सामाजिक दायित्व निभावण्याचा वसा घेतलेला होता. तोच वारसा आम्ही आनंदवनवासीय समर्थपणे चालवित आहोत. जेव्हा जेव्हा समाजाला गरज पडली, तेव्हातेव्हा आनंदवन धावून गेले आहे. दिव्यांगही अवयव दान करून आपले सामाजिक दायित्व समर्थपणे निभावतील. आमटे परिवारानेही अवयवदानाचा संकल्प करून कागदोपत्री पूर्तता केलेली आहे. यापलिकडे कोणाला अवयवदान करावयाचे असल्यास त्यांनी आनंदवनाशी संपर्क साधावा.- डॉ. शीतल आमटे, शिबिर संयोजक, आनंदवनअवयवदानाचा फार्म भरून दिलेल्या प्रत्येक अवयवदात्याला आम्ही डोनर कार्ड भरून दिलेले आहेत. ते भरून त्यांनी पॉकीटमध्ये ठेवायचे. घरच्यांना दाखवायचे. मृत्यू दोन प्रकारे होतो, नॅचरल व ब्रेन डेथ. ब्रेन डेथमध्ये पेशंट आयसीयूमध्ये असतो. अशावेळी शरीराचे अवयवदान करू शकतो. मात्र कुटुंबाची त्यासाठी परवानगी आवश्यक असते. गरजुंनी मोहन फाऊंडेशनच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.-डॉ. हेमल कान्विन्दे, मोहन फाऊंडेशन, नागपूर