शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

२७४ जणांना सापाचा डंख; २७० जणांचा वाचला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:00 IST

सर्पदंशाच्या बहुतांश घटना ग्रामीण व आदिवासी भागात घडतात, हे वास्तव आहे. सर्पदंशानंतर संबंधित रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी विलंब झाल्यास मृत्यू ओढवण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी केवळ ग्रामीण रुग्णालयच नव्हे, तर प्राथमिक आरोग्य केंद्रातही प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. त्यातही डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी २४ तास कर्तव्यावर असले तरच आपत्कालीन स्थितीत रुग्णावर उपचार होऊ शकतात.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : साप हा शेतकऱ्याचा मित्र असला तरी गत तीन वर्षांपासून सर्पदंशाच्या घटना वाढू लागल्या. यंदा जानेवारी ते जून २०२१ पर्यंत सर्पदंशाच्या २७४ घटनांची नोंद झाली. वेळीच उपचार झाल्याने २७० जणांचा जीव वाचला, तर चौघांचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयातून सर्पदंश प्रतिबंधक लस (स्नेक अँटिव्हेनिन) रुग्णांना मोफत दिले जाते. मात्र, मागणीच्या तुलनेत अल्प पुरवठा व नागरिकांतील गैरसमज आदी कारणांमुळे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीला गमावण्याच्या घटना चिंतेत भर घालणाऱ्या आहेत.सर्पदंशाच्या बहुतांश घटना ग्रामीण व आदिवासी भागात घडतात, हे वास्तव आहे. सर्पदंशानंतर संबंधित रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी विलंब झाल्यास मृत्यू ओढवण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी केवळ ग्रामीण रुग्णालयच नव्हे, तर प्राथमिक आरोग्य केंद्रातही प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. त्यातही डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी २४ तास कर्तव्यावर असले तरच आपत्कालीन स्थितीत रुग्णावर उपचार होऊ शकतात. आरोग्य प्रशासनाच्या अहवालानुसार, जानेवारी ते जून २०२१ पर्यंत जिल्ह्यात विषारी सर्पदंशाच्या २७४ घटना घडल्या, तर उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार झाल्याने १०५ रुग्णांचा जीव वाचला. त्यासाठी सर्पदंशाची घटना घडल्यानंतर गावठी उपचार किंवा मांत्रिकावर विश्वास न ठेवता रुग्णालयात दाखल केल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.

जूनमध्ये १०६ जणांना सर्पदंशजून २०२१ मध्ये सर्पदंशाच्या १०६ घटना घडल्या. आठ जणांवर ओपीडी, तर ९७ रुग्णांवर आयपीडीमध्ये उपचार करण्यात आले. यातील सिंदेवाही व गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयांतर्गत दोघांचा मृत्यू झाला. बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, चिमूर, कोरपना, मूल, राजुरा, सावली, वरोरा व गडचांदूर रुग्णालयांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना हमखास घडतात.

सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात भरती केल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. सध्या तरी रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक औषधी उपलब्ध आहे. सर्पदंशाच्या रुग्णांच्या उपचाराला कदापि विलंब होऊ देऊ नका, अशा सूचना डॉक्टरर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. सर्पदंश, श्वानदंश व विंचू दंशाच्या घटना व परिणामकारक उपचाराबाबत सातत्याने आढावा घेणे सुरू आहे.-डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर

मागणीनुसार अल्प औषधी पुरवठाराज्यात सर्पदंशावरील औषधी सद्य:स्थितीत फक्त हाफकीन या एकमेव संस्थेत बनविले जाते. मागणीच्या तुलनेत औषधीचा कमी पुरवठा होतो. एकूण मागणीच्या तुलनेत १० ते १५ टक्के औषधी उपलब्ध होत असल्याने अडचणी वाढतात. 

गैरसमज व अंधश्रद्धा धोकादायकच सापाचे विष मंत्राने उतरते. कडुलिंबाचा पाला व मिरची खाल्ल्यास प्रकृती सुधारते, सर्पदंश झालेल्या जागेवर औषधी वनस्पती उगाळणे किंवा बिया वगैरे खायला देणे, सर्पदंशाच्या ठिकाणी गरम केलेल्या लोखंडाने डागण्या देणे, यासारखे अनेक गैरसमज-अंधश्रद्धा शहरी व ग्रामीण भागात आजही आहेत. हे सर्व उपाय निरर्थक व वेळ वाया घालविणारे आहेत. असे केल्यास व्यक्तीच्या जीविताला धोका निर्माण होतो. 

 

टॅग्स :snakeसापFarmerशेतकरी