शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

२७४ जणांना सापाचा डंख; २७० जणांचा वाचला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:00 IST

सर्पदंशाच्या बहुतांश घटना ग्रामीण व आदिवासी भागात घडतात, हे वास्तव आहे. सर्पदंशानंतर संबंधित रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी विलंब झाल्यास मृत्यू ओढवण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी केवळ ग्रामीण रुग्णालयच नव्हे, तर प्राथमिक आरोग्य केंद्रातही प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. त्यातही डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी २४ तास कर्तव्यावर असले तरच आपत्कालीन स्थितीत रुग्णावर उपचार होऊ शकतात.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : साप हा शेतकऱ्याचा मित्र असला तरी गत तीन वर्षांपासून सर्पदंशाच्या घटना वाढू लागल्या. यंदा जानेवारी ते जून २०२१ पर्यंत सर्पदंशाच्या २७४ घटनांची नोंद झाली. वेळीच उपचार झाल्याने २७० जणांचा जीव वाचला, तर चौघांचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयातून सर्पदंश प्रतिबंधक लस (स्नेक अँटिव्हेनिन) रुग्णांना मोफत दिले जाते. मात्र, मागणीच्या तुलनेत अल्प पुरवठा व नागरिकांतील गैरसमज आदी कारणांमुळे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीला गमावण्याच्या घटना चिंतेत भर घालणाऱ्या आहेत.सर्पदंशाच्या बहुतांश घटना ग्रामीण व आदिवासी भागात घडतात, हे वास्तव आहे. सर्पदंशानंतर संबंधित रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी विलंब झाल्यास मृत्यू ओढवण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी केवळ ग्रामीण रुग्णालयच नव्हे, तर प्राथमिक आरोग्य केंद्रातही प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. त्यातही डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी २४ तास कर्तव्यावर असले तरच आपत्कालीन स्थितीत रुग्णावर उपचार होऊ शकतात. आरोग्य प्रशासनाच्या अहवालानुसार, जानेवारी ते जून २०२१ पर्यंत जिल्ह्यात विषारी सर्पदंशाच्या २७४ घटना घडल्या, तर उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार झाल्याने १०५ रुग्णांचा जीव वाचला. त्यासाठी सर्पदंशाची घटना घडल्यानंतर गावठी उपचार किंवा मांत्रिकावर विश्वास न ठेवता रुग्णालयात दाखल केल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.

जूनमध्ये १०६ जणांना सर्पदंशजून २०२१ मध्ये सर्पदंशाच्या १०६ घटना घडल्या. आठ जणांवर ओपीडी, तर ९७ रुग्णांवर आयपीडीमध्ये उपचार करण्यात आले. यातील सिंदेवाही व गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयांतर्गत दोघांचा मृत्यू झाला. बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, चिमूर, कोरपना, मूल, राजुरा, सावली, वरोरा व गडचांदूर रुग्णालयांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना हमखास घडतात.

सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात भरती केल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. सध्या तरी रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक औषधी उपलब्ध आहे. सर्पदंशाच्या रुग्णांच्या उपचाराला कदापि विलंब होऊ देऊ नका, अशा सूचना डॉक्टरर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. सर्पदंश, श्वानदंश व विंचू दंशाच्या घटना व परिणामकारक उपचाराबाबत सातत्याने आढावा घेणे सुरू आहे.-डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर

मागणीनुसार अल्प औषधी पुरवठाराज्यात सर्पदंशावरील औषधी सद्य:स्थितीत फक्त हाफकीन या एकमेव संस्थेत बनविले जाते. मागणीच्या तुलनेत औषधीचा कमी पुरवठा होतो. एकूण मागणीच्या तुलनेत १० ते १५ टक्के औषधी उपलब्ध होत असल्याने अडचणी वाढतात. 

गैरसमज व अंधश्रद्धा धोकादायकच सापाचे विष मंत्राने उतरते. कडुलिंबाचा पाला व मिरची खाल्ल्यास प्रकृती सुधारते, सर्पदंश झालेल्या जागेवर औषधी वनस्पती उगाळणे किंवा बिया वगैरे खायला देणे, सर्पदंशाच्या ठिकाणी गरम केलेल्या लोखंडाने डागण्या देणे, यासारखे अनेक गैरसमज-अंधश्रद्धा शहरी व ग्रामीण भागात आजही आहेत. हे सर्व उपाय निरर्थक व वेळ वाया घालविणारे आहेत. असे केल्यास व्यक्तीच्या जीविताला धोका निर्माण होतो. 

 

टॅग्स :snakeसापFarmerशेतकरी