२२ हजार ५४५ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST2021-02-05T07:40:01+5:302021-02-05T07:40:01+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार ६८ झाली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ५४५ ...

22 thousand 545 people defeated Corona | २२ हजार ५४५ जणांची कोरोनावर मात

२२ हजार ५४५ जणांची कोरोनावर मात

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार ६८ झाली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ५४५ झाली आहे. सध्या १३२ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ९९ हजार ८०९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ लाख ७४ हजार ६२१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३९१ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३५३, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १५, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधित आलेल्या १९ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील चार, भद्रावती सहा, मूल एक, वरोरा चार, कोरपना तीन व जिवती येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना आजार गेला नाही, कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून आढळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Web Title: 22 thousand 545 people defeated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.