शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

२०११ नंतरच्या झोपड्यांना प्रक्रियेतून वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:50 IST

केंद्र व राज्य सरकारने २०२२ पर्यंत सर्व बेघर कुटुंबांना घरकुल देण्याची घोषणा केली. मात्र, १ जानेवारी २०११ नंतरच्या अतिक्रमित भूखंड धारकांची प्रकरणे नियमानुकूल करण्याच्या विशेष मोहिमेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील निवासी भागात अतिक्रमण करून झोपडपट्ट्या बांधणाऱ्या शेकडो कुंटुंबीयांना घरकूलपासून वंचित राहावे लागणार आहे.

ठळक मुद्देबेकायदेशीरतेचा ठपका : मिळणार नाही प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र व राज्य सरकारने २०२२ पर्यंत सर्व बेघर कुटुंबांना घरकुल देण्याची घोषणा केली. मात्र, १ जानेवारी २०११ नंतरच्या अतिक्रमित भूखंड धारकांची प्रकरणे नियमानुकूल करण्याच्या विशेष मोहिमेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील निवासी भागात अतिक्रमण करून झोपडपट्ट्या बांधणाऱ्या शेकडो कुंटुंबीयांना घरकूलपासून वंचित राहावे लागणार आहे.केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नागरी हद्दीत अतिक्रमण करून झोपड्या बांधून राहणाऱ्या नागरिकांना प्रधानमंत्री घरकूल योजनेचा लाभ मिळत नाही. वनविभागाची जमीन वगळून शासनाच्या विविध विभाग अंतर्गत येणाºया नागरिक क्षेत्रातील जमिनीवर अतिक्रमण करून झोपड्या बांधून राहणाºया कुटुंबांचा संख्या बरीच आहे. या भूखंडांना नियमानुकूल करून नागरी मूलभूत सोईसुविधा मिळाव्यात, याकरिता अतिक्रमणधारकांनी महानगरपरिषद, नगरपरिषद व नगरपंचायत अनेकदा मोर्चे काढले. निवेदने देऊन समस्येकडे लक्ष वेधले. परंतु, यावर मागील चार वर्षांपासून सरकारने निर्णय घेतला नव्हता. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १ जानेवारी २०११ पूर्वीची सर्व अतिक्रमित जमिनीची प्रकरणे नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी भागातील जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण करून राहणाºया नागरिकांच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाणार आहे. यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त अथवा प्रकरणपरत्वे नगरपरिषद किंवा मुख्याधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. नगर २२विकास विभाग सहाय्यक संचालकांच्या सल्ल्याने सदर अतिक्रमणे नियमानुकूल केल्या जातील. १ जानेवारी २०११ च्यापूर्वीच्या अतिक्रमित भूखंडाना नियमित करून नागरी भागामध्ये घरकूल देण्यात येणार आहे. मात्र २०११ नंतरच्या नागरी क्षेत्रातील निवासी अतिक्रमित भूखंडांना बेकायदेशीर ठरविल्याने घरकुल मिळणार नाही.भरावा लागेल अधिशुल्क५०० चौरस फुटापेक्षा अधिक परंतु एक हजार चौरसफुटापर्यंत जमिनीवर प्रचलित दर मूल्यानुसार १० टक्के आणि एकहजार चौरस फुटापेक्षा अधिक जागेकरिता कब्जेहक्क म्हणून २५ टक्के अधिशुल्क अतिक्रमण धारकाकडून वसूल केले जाणार आहे. भूखंड कायदेशीर झाल्यानंतरच घरकूल योजनेचा लाभ मिळेल. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अधिशुल्कातून सूट देण्यात आली.दीड हजार फुटांची मर्यादानागरी भागात अतिक्रमण केलेल्या कमाल दीड हजार फुट भूखंडालाच नियमानुकूल केल्या जाणार आहे. अशा अतिक्रमणधारकांना भोगवटदार वर्ग दोनमध्ये सामाविण्यात येईल. दीड हजारपेक्षा अधिक भूखंड असल्यास संबंधित कुटुंबाला त्यावरील हक्क सोडावा लागेल.