शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

कन्हारगाव अभयारण्याविरोधात २० ग्रा.पं.चा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:39 PM

कोठरी- गोंडपिपरी मार्गावरील जंगलातील कन्हारगाव तसेच त्या टापूतील २६५ चौरस किलोमीटर जंगलव्याप्त भागात अभयारण्य (वन्यप्राणी निवास व संगोपन) प्रकल्प होणार आहे. मात्र, या नियोजित प्रकल्पाला येथील स्थानिकांचा विरोध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : कोठरी- गोंडपिपरी मार्गावरील जंगलातील कन्हारगाव तसेच त्या टापूतील २६५ चौरस किलोमीटर जंगलव्याप्त भागात अभयारण्य (वन्यप्राणी निवास व संगोपन) प्रकल्प होणार आहे. मात्र, या नियोजित प्रकल्पाला येथील स्थानिकांचा विरोध आहे. स्थानिकांनी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना या भागाला अभयारण्य करु नये, असे निवेदन दिले आहे. तसेच, या क्षेत्रात येणाऱ्या २० गावातील ग्रामपंचायतींनी ठराव करुन या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पाच्या विरोधात आता काँग्रेसही सरसावली आहे.या विषयावर पत्रपरिषद घेऊन काँग्रेसने या प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले आहे. शासनाला विरोध म्हणून नव्हे तर जवळच ताडोबा अभयारण्य असल्याने या भागातील लोकांना बेरोजगार करणाºया या अभयारण्याची गरज नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. या प्रकल्पामुळे एकूण २० गावे उठणार आहेत. यामुळे हजारो लोकांना रोजगारापासून मुकावे लागणार आहे. सोबतच पूनर्वसनाचा प्रश्न उभा होईल. या भागातील गुजरान जंगलातील कामे व शेतीवर चालते. आदिवासींना त्यापासून मुकावे लागेल. अभयारण्य म्हणजे वाघ आलेच. हिस्त्र प्राण्यांची वाढ होऊन त्याचा त्रास शेतकऱ्यांना होणार आहे. काँग्रेसने याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या डॉ. रजनी हजारे यांनी दिली. या पत्रपरिषदेत घनशाम मुलचंदानी, भास्कर माकोडे, अफसाना सैय्यद, विनोद बुटले, कोठारीचे सरपंच मोरेश्वर लोहे आदी उपस्थित होते.

टॅग्स :forest departmentवनविभाग