१८ हजार ५४९ विद्यार्थी घेत आहेत ज्ञानाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST2020-12-11T04:56:36+5:302020-12-11T04:56:36+5:30
चंद्र्रपूर : ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग १३ नोव्हेंबरपासून सुरु सुरू झाले. मंगळवारी जिल्ह्यातील ...

१८ हजार ५४९ विद्यार्थी घेत आहेत ज्ञानाचे धडे
चंद्र्रपूर : ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग १३ नोव्हेंबरपासून सुरु सुरू झाले. मंगळवारी जिल्ह्यातील ४४९ शाळा सुरू झाल्या. त्यामध्ये १८ हजार ५९४ विद्यार्थी प्रत्यक्षात वर्गात उपस्थित राहून ज्ञानाचे धडे घेत आहेत. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व अन्य सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्या. याचा तालुका व जिल्हास्तरावरून नियमित आढावा घेत आहे. कोविड १९ बाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करून मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जात आहे. प्रत्येक वर्गखोल्याचे निजंर्तुकीकरण करण्यात आले आहे, हात धुण्यासाठी व्यवस्था, शारीरिक अंतर ठेवत एका बेंचवर एक विद्यार्थी बसविले जात आहे. थर्मल स्कॅनिंग, प्लस ऑक्सिमिटर, सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली. इयत्ता नववी व दहावीत शिकविणाºया शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांची आरटीपीसी आर चाचणी करण्यात आली. दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी जिल्ह्यातील् ४४९ शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरक्षितपणे सुरू झाल्या आहे. १८ हजार ५ ९४ विद्यार्थी उपस्थित होते. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रोत्साहन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व मुख्यकार्यकारी अधिकारी कर्डिले यांनी दिल्या.