शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

लोकअदालतीत ठेवली तब्बल १३ हजार प्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2022 05:00 IST

न्यायालयाच्या लढाईत आयुष्याचा बराच काळ निघून जातो, असे सांगून श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, वेळ न घालवता प्रलंबित प्रकरणे आपसी तडजोडीने त्वरित निकाली काढण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते. पॅनल वर असलेल्या सर्व न्यायाधीशांनी त्यांच्याकडे असलेली जास्तीत जास्त प्रकरणे आज निकाली काढावीत. पक्षकाराचे न्यायालयीन प्रकरण निकाली निघाले तर त्याला मानसिक समाधान लाभते. शिवाय त्याचा वेळ आणि पैसासुद्धा वाचतो.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यंदाची पहिलीच राष्ट्रीय लोकअदालत पार पडली. गत वर्षी तीन राष्ट्रीय लोकअदालतीमधून जिल्ह्यात सात हजार प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली होती, तर शनिवारच्या लोक अदालतीमध्ये १३ हजारांहून अधिक प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार विधिसेवा प्राधिकरण आपल्यापर्यंत पोहोचत आहे. पक्षकारांनी लोक अदालतीच्या माध्यमातून आपली प्रलंबित प्रकरणे निकाली काढून आयुष्यातील महत्त्वाचा वेळ आणि पैसा वाचवावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी केले. जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर न्या. केदार, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव किरण जाधव, आदी उपस्थित होते. न्यायालयाच्या लढाईत आयुष्याचा बराच काळ निघून जातो, असे सांगून श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, वेळ न घालवता प्रलंबित प्रकरणे आपसी तडजोडीने त्वरित निकाली काढण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते. पॅनल वर असलेल्या सर्व न्यायाधीशांनी त्यांच्याकडे असलेली जास्तीत जास्त प्रकरणे आज निकाली काढावीत. पक्षकाराचे न्यायालयीन प्रकरण निकाली निघाले तर त्याला मानसिक समाधान लाभते. शिवाय त्याचा वेळ आणि पैसासुद्धा वाचतो. असे त्या म्हणाल्या. विशेष म्हणजे जानबा पाटील आणि विजय शेंडे या पक्षकारांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विधिसेवा प्राधिकरणचे सचिव किरण जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी न्यायाधीश एस. एम. मौदेकर, के. पी. श्रीखंडे, एन. एन. बोदरकर, एम. एस. काळे, स्नेहा जाधव, ए. एन. माने, एन. एम. पंचारिया, आर. व्ही. मेटे यांच्यासह लॉ कॉलेजचे विद्यार्थी, उपस्थित होते.

 

टॅग्स :Lokadalatलोकअदालत