१३व्या वित्त आयोगाच्या निधीची होणार चौकशी
By Admin | Updated: May 27, 2014 23:36 IST2014-05-27T23:36:06+5:302014-05-27T23:36:06+5:30
१३ व्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पाठविण्यात आलेला २ कोटी ८१ लाख ७१ हजार ४८४ रुपयांचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत मंगळवारी गाजला. हा निधी गेला कुठे,

१३व्या वित्त आयोगाच्या निधीची होणार चौकशी
सदस्यांना आश्वासन: जि.प.ची सभा गाजली चंद्रपूर : १३ व्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पाठविण्यात आलेला २ कोटी ८१ लाख ७१ हजार ४८४ रुपयांचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत मंगळवारी गाजला. हा निधी गेला कुठे, याची चौकशी करण्याची मागणी पदाधिकार्यांकडून करण्यात आली. मुख्य कार्यपालन अधिकार्यांनी १५ दिवसांत याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. तेराव्या वित्त आयोगातून २0१0-११ आणि २0१३-१४ या वर्षात २ कोटी ८१ लाख ७१ हजार ४४८ हजारांना निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना देण्यात आला होता. मात्र, अनेक ग्राम पंचायतींना अजूनही हा निधी मिळाला नाही. सहा महिन्यांपूर्वीच हा प्रकार जिल्हा परिषद सदस्यांनी उघडकीस आणला. सभागृहात या मुद्दयावर चर्चाही करण्यात आली. मात्र, प्रत्येकवेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा झाली. या सभेत तेराव्या वित्त आयोगाचा मुद्दा अजेंडावर होता. सुरुवातीलाच सभासदांनी हा मुद्दा उचलून धरला. या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी रेटून धरली. शेवटी जि.प. अध्यक्षांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले. मुख्य कार्यपालन अधिकार्यांनी १५ दिवसात चौकशी करण्याचे आदेश दिले. (नगर प्रतिनिधी)