शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

१२ तासांचा बिबट-मानव संघर्ष

By admin | Updated: May 20, 2017 01:18 IST

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या हाकेवर असलेल्या मानेमोहाडी संघर्ष त गावा-शेजारी बिबट्याने पाच लोकांना जखमी केले होते.

मानेमोहाडी येथील थरार : हिंस्त्रपशुंच्या हल्ल्यांमध्ये वाढ राजकुमार चुनारकर। लोकमत न्यूज नेटवर्क चिमूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या हाकेवर असलेल्या मानेमोहाडी संघर्ष त गावा-शेजारी बिबट्याने पाच लोकांना जखमी केले होते. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने रेसक्यू आॅपरेशन राबविले. त्या मोहिमेमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असले तरी, बिबट मानवाचा तब्बल बारा तासाचा थरार अनेकांनी अनुभवला. सूर्य आग ओकत असल्याने तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जंगलातील वन्य प्राण्यांचे पाण्याचे पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाशेजारी येत आहेत. त्यामुळे जंगलव्याप्त गावात हिंस्त्र पशुच्या हल्ल्याचा घटनेत वाढ होत आहे. नुकतेच ताडोबा येथील आग्निरक्षकाला ठार मारण्याची घटना झाली. तर अस्वलाच्या हल्ल्यात चार तेदुपत्ता मजुरांना जीव गममावा लागला. या घटनामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत वन्यप्राणी व मानवाचा संघर्ष वाढला असल्याचे चित्र जंगलपरिसराचा गावात निर्मााण झाले आहे. मानव जीव साखळीत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलात वाघ असणे गरजेचे आहे. त्यामुळे वनविभागाकडून वाघाचे रक्षण करण्यात येत आहे.तसेच नागरिक सरपणासाठी व इतर कामासाठी जंगलात जाऊ नये म्हणून गॅस सिंलेडरचे वाटप करण्यात येत आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठया प्रमाणात आहे. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या लगत असलेल्या मानेमोहाळी या गावातील शेतकरी बकरी चारत असतांना सकाळी ९ वाजताच्या सुमारास बिबट्याने हल्ला करुन तीन लोकांना गंभीर जखमी केले. त्यामध्ये गिरीधर मुंडरे, विकास जिवतोडे, दवलत धाडसे, राजु चौधरी, अमोल ठेकेदार या पांच जणांनावर बिबटयाने हमला केला आहे. त्यामुळे बिबट व मानवाच्या संघर्षाचा थरार सकाळी १० ते रात्री १० असा तब्बल १२ तास उपस्थित नागरिकांनी अनुभवला. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे डीसीएफ केवल सिंह याच्या नेतृत्वात आरएफ ओ निवंडे, सोनट्टके तर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण परदेशी यांच्या नेतृत्वात रेस्क्यु आॅपरेशन राबविण्यात आले. तर आमदार किर्तीकुमार भांगडिया हेसुध्दा घटना स्थळावर तळ ठोकून बसले होते. अखेर रात्री ९ वाजताच्या दरम्यान या बिबट मानवसंघर्षाच्या थराराचा शेवट बिबट्याला जेरबंद करण्यात झाला. फोटोचा मोह बेतला असता जीवावर मानेमोहाडी शेत शिवरात पुलामध्ये असलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामधील अनेकांना जवळ जावून बिबट्याचा फ ोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र यावेळी बिबटाने चक्क बाहेर निघून हल्ला केला. त्यामध्ये अमोल सर व राजु चौधरी जखमी झाले. विदेशी पर्यटकांनीही अनुभवला थरार वाघ पाहण्यासाठी ताडोबामध्ये विदेशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मानेमोहाडी येथे मानव-बिबट्यामध्ये झालेला बारा तासांचा संघर्ष संयुक्त राट्रातील रहिवासी असलेल्या सरिता खानविलकर या विदेशी पर्यटन महिलेनी अनुभवला व हा प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. याबाबत प्रतिनिधीने विचारले असता, हा प्रसंग जीवनातील अद्भूत प्रसंग असल्याचे सांगितले. तसेच आपण याठिकाणी चौथ्यांदा अलो असून वन्य प्राण्यांवर व वनांवर अभ्यास करत असल्याचे सांगितले. शाबीरने वाचविले शिपायाचे प्राण नागरीकांच्या सुरक्षेसाठी व सुव्यवस्थेसाठी घटना स्थळावर आलेले शिपाई किशोर बोढे यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. मात्र यावेळी शाबीर पठाण याने बिबट्याच्या तोंडात बाबूंची काडी टाकून शिपाई कशोर बोढे यांची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. महिलांचीही अलोट गर्दी गावा शेजारी बिबट असल्याची वार्ता गावात पसरताच घटनास्थळावर वृध्द व महिलांनी मोठी गर्दी केली होती. आमदाराने केले नागरिकांना शांत वाघ पाहण्यासाठी पंचकोशीतील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. गर्दीला पागंवण्यासाठी पोलीस व वनविभागाचे कर्मचारी कायर् करीत होते. मात्र नागरिक त्यांचे ऐकत नव्हते. ही स्थिती पाहून आ. किर्तीकुमार भांगडीया यांनी घटनास्थळावरुन मागे व्हा व रेसक्यू आॅपरेशनसाठी मदतीचे आवाहन केले.