शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

११६ सहकारी संस्था गुंडाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:48 IST

ग्रामीण भागातील आर्थिक सबलीकरण करण्याच्या हेतूने स्थापन केलेल्या ११६ सहकारी संस्थांनी वारेमाप कर्जवाटप केले. आर्थिक शिस्त पाळली नाही. त्यामुळे सहकार विभागाला या संस्था बंद करण्याचा आदेश द्यावा लागला. या संस्था गुंडाळण्यात येणार असल्याने सहकारी संस्थांमध्ये भागभांडवल गुंतविणाऱ्यांना ंकोट्यवधी रूपयांची कर्ज वसुली कशी करायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींच्या कर्जवसुलीचे आव्हान : सहकार क्षेत्राला ग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागातील आर्थिक सबलीकरण करण्याच्या हेतूने स्थापन केलेल्या ११६ सहकारी संस्थांनी वारेमाप कर्जवाटप केले. आर्थिक शिस्त पाळली नाही. त्यामुळे सहकार विभागाला या संस्था बंद करण्याचा आदेश द्यावा लागला. या संस्था गुंडाळण्यात येणार असल्याने सहकारी संस्थांमध्ये भागभांडवल गुंतविणाऱ्यांना ंकोट्यवधी रूपयांची कर्ज वसुली कशी करायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.२०१० च्या कालखंडामध्ये सहकारी कायद्यामध्ये दुरूस्ती झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये शेकडो सहकारी संस्थांची स्थापना झाली. गृहउद्योग, लघु व्यवसायापासून तर शेती उद्योग प्रक्रियेशी निगडीत असलेल्या बहुतांश क्षेत्रामध्ये विकासाची कामे करणे, हा या सहकारी संस्थांचा हेतू होता. सहकार विभागाकडून संस्थांना आर्थिक पाठबळ देण्यात आले होते. सहकार चळवळीचे धोरणच ‘सकलांचे कल्याण’ या न्यायतत्त्वावर उभे असल्याने काही व्यक्तींनी स्वत:चे भांडवल गुंतविले. शेअर्स विकत घेतले. संस्थेच्या प्रत्येक टप्प्यावर मदत केली. पण, ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालणा देण्याचा मूळ हेतु बाजूला सारून काही सहकारी संस्थांमधील पदाधिकाºयांनी कागदोपत्री काम सुरू केले. शासनाकडून फायदे उपटून ग्रामविकासाचे कल्याण करीत आहोत, असा डांगोरा पिटण्याचा प्रकार सुरू ठेवला. मागील पाच वर्षांच्या कालखंडामध्ये या संस्थांची अर्थव्यवस्था पूर्णत: डबघाईस आली. जिल्हा उपनिबंधकांच्या मूल्यांकनानुसार सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या नापास झाल्याची सहकार क्षेत्रात केवळ चर्चा सुरू होती. दरम्यान, २०१७-१८ च्या अंकेक्षणात या संस्थांची स्थिती सुधारली नसल्याचे वास्तव पुढे आले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी जिल्ह्यातील तब्बल ११६ सहकारी संस्था अवसायनात काढल्या. या संस्थांकडून आर्थिक देणे आणि घेणे असणाऱ्या व्यक्तींना सहकार विभागाने जाहीर आवाहन करून माहिती देण्याचे कळविले आहे. ५ आॅक्टोंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. पण आपल्याच मर्जीतील लोकांना सहकाराचे फायदे मिळवून देणाऱ्यांकडून वसुली कशी करायची, हा खरा प्रश्न सहकार विभाग व भांडवल गुंतविणाऱ्या व्यक्तींपुढे उभा ठाकला आहे.राजकारणामुळे सहकाराला वाळवीस्थानिक ते जिल्हा स्तरावरील राजकारणात सक्रीय असणाºया नेत्यांनीच सहकारी संस्था स्थापन केल्या. सहकारी तत्त्वातील कल्याणकारी धोरणाला फाटा देऊन या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी कामकाज पुढे दामटले. याचा अनिष्ठ परिणाम जिल्ह्यातील सहकार चळवळीवर झाला आहे. केवळ राजकारणामुळे सहकार क्षेत्राला वाळवी लागल्याचे ११६ सहकारी संस्थांच्या बुडीत प्रकरणातून पुढे आले आहे.चंंद्रपूर तालुक्यातील सर्वाधिक बुडित संस्थाचंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक ४६ सहकारी संस्था बुडीत निघाल्या. त्यानंतर चिमूर तालुक्याचा दुसरा क्रमांक लागतो. या तालुक्यामध्ये ११ संस्था गुंडाळाव्या लागणार आहेत. पोंभुर्णा, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, भद्रावती व राजुरा तालुक्यातही अवसायनात निघालेल्या संस्थांची संख्या चिंताजनक आहे. लघु व्यवसायाशी संबंधित असणाºया संस्थांना सहकार चळवळीचा पाया मानला जातो. परंतु, याच संस्था अवसायनात निघाल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला भविष्य नाही, अशी शक्यता नागरिक वर्तवित आहेत.