शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

11 विद्यार्थी सुखरूप, एकाचा अजूनही पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST

युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १२ विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत.  यातील एक जण युद्ध सुरू होण्यापूर्वीच भारतात पोहचला. तर चिमूर येथील हर्षल ठवरे आणि वरोरा येथील आदिती सयारे हे नुकतेच घरी पोहचले आहेत. दरम्यान, ऐश्वर्या प्रफुल्ल खोब्रागडे ही चिमूर येथील विद्यार्थिनी बुखारेस्ट (रोमानिया) एअरपोर्टवर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण १२ विद्यार्थी तेथे शिक्षण घेत होते. यातील ११ विद्यार्थी सुखरूप असून जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यासोबत प्रशासनाचा अजूनही संपर्क झाला नाही. विशेष म्हणजे, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत महेश भोयर याने संवाद साधला असून तो कोरपना येथील रहिवासी आहे.युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १२ विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत.  यातील एक जण युद्ध सुरू होण्यापूर्वीच भारतात पोहचला. तर चिमूर येथील हर्षल ठवरे आणि वरोरा येथील आदिती सयारे हे नुकतेच घरी पोहचले आहेत. दरम्यान, ऐश्वर्या प्रफुल्ल खोब्रागडे ही चिमूर येथील विद्यार्थिनी बुखारेस्ट (रोमानिया) एअरपोर्टवर आली आहे. नेहा शेख भद्रावती ही पोलंड येथे पोहचली आहे. चंद्रपूर येथील धीरज बिश्वास हा विद्यार्थी रोमानिया येथे आहे. चंद्रपुरातील दीक्षराज अकेला आणि कोरपना येथील महेश भोयर हे रोमानिया येथील बाॅर्डवरून एअरपोर्टकडे रवाना झाले आहेत. ब्रह्मपुरी येथील महेश उके याने हॅग्नी बाॅर्डर ओलांडल्याचे  प्रशासनाने सांगितले. त्यामुळे हे सर्व सुखरूप असून कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र बल्लारपूर येथील भोयर नामक विद्यार्थ्यांचा  संपर्क झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यासोबत संपर्क साधण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहे.

महेश चालला २० कि.मी. पायीकोरपना येथील महेश विलास भोयर हा विद्यार्थी युक्रेनमधील इवानो विद्यापीठात शिक्षण घेत आहे. मात्र युद्ध सुरू झाले आहे आणि त्याला मायभूमीत केव्हा येतो, याची चिंता सतावत होती. विद्यापीठातून आठ तास बसने प्रवास करत रोमानिया-युक्रेन बाॅर्डर गाठले. त्यानंतर २० किमी पायी प्रवास करत रोमानियात तो दाखल झाला. येथून रोमानियाची राजधानी बुखारीपर्यंत पाचशे कि.मी.चा प्रवास करून तीन दिवसांपूर्वीच बुखारीस  विमानतळ त्याने गाठले. तेथील एका समाजसेवी संस्थेतर्फे त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तीन दिवसानंतर बुधवार २ मार्चला सायंकाळी ६ वाजता बुखारीस येथून विमानाने तो मायदेशी परतला आहे. तो दिल्ली विमानतळावर येणार आहे. महेश हा भारतातून ३० नोव्हेंबरला गेला होता.

 

टॅग्स :warयुद्धStudentविद्यार्थी