शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

11 विद्यार्थी सुखरूप, एकाचा अजूनही पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST

युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १२ विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत.  यातील एक जण युद्ध सुरू होण्यापूर्वीच भारतात पोहचला. तर चिमूर येथील हर्षल ठवरे आणि वरोरा येथील आदिती सयारे हे नुकतेच घरी पोहचले आहेत. दरम्यान, ऐश्वर्या प्रफुल्ल खोब्रागडे ही चिमूर येथील विद्यार्थिनी बुखारेस्ट (रोमानिया) एअरपोर्टवर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण १२ विद्यार्थी तेथे शिक्षण घेत होते. यातील ११ विद्यार्थी सुखरूप असून जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यासोबत प्रशासनाचा अजूनही संपर्क झाला नाही. विशेष म्हणजे, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत महेश भोयर याने संवाद साधला असून तो कोरपना येथील रहिवासी आहे.युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १२ विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत.  यातील एक जण युद्ध सुरू होण्यापूर्वीच भारतात पोहचला. तर चिमूर येथील हर्षल ठवरे आणि वरोरा येथील आदिती सयारे हे नुकतेच घरी पोहचले आहेत. दरम्यान, ऐश्वर्या प्रफुल्ल खोब्रागडे ही चिमूर येथील विद्यार्थिनी बुखारेस्ट (रोमानिया) एअरपोर्टवर आली आहे. नेहा शेख भद्रावती ही पोलंड येथे पोहचली आहे. चंद्रपूर येथील धीरज बिश्वास हा विद्यार्थी रोमानिया येथे आहे. चंद्रपुरातील दीक्षराज अकेला आणि कोरपना येथील महेश भोयर हे रोमानिया येथील बाॅर्डवरून एअरपोर्टकडे रवाना झाले आहेत. ब्रह्मपुरी येथील महेश उके याने हॅग्नी बाॅर्डर ओलांडल्याचे  प्रशासनाने सांगितले. त्यामुळे हे सर्व सुखरूप असून कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र बल्लारपूर येथील भोयर नामक विद्यार्थ्यांचा  संपर्क झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यासोबत संपर्क साधण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहे.

महेश चालला २० कि.मी. पायीकोरपना येथील महेश विलास भोयर हा विद्यार्थी युक्रेनमधील इवानो विद्यापीठात शिक्षण घेत आहे. मात्र युद्ध सुरू झाले आहे आणि त्याला मायभूमीत केव्हा येतो, याची चिंता सतावत होती. विद्यापीठातून आठ तास बसने प्रवास करत रोमानिया-युक्रेन बाॅर्डर गाठले. त्यानंतर २० किमी पायी प्रवास करत रोमानियात तो दाखल झाला. येथून रोमानियाची राजधानी बुखारीपर्यंत पाचशे कि.मी.चा प्रवास करून तीन दिवसांपूर्वीच बुखारीस  विमानतळ त्याने गाठले. तेथील एका समाजसेवी संस्थेतर्फे त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तीन दिवसानंतर बुधवार २ मार्चला सायंकाळी ६ वाजता बुखारीस येथून विमानाने तो मायदेशी परतला आहे. तो दिल्ली विमानतळावर येणार आहे. महेश हा भारतातून ३० नोव्हेंबरला गेला होता.

 

टॅग्स :warयुद्धStudentविद्यार्थी