१०८ ने दिले एक लाखांवर रुग्णांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:50+5:30
रुग्णांना वेळेवर उपचार व्हावे, या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय आरोय अभियानातंर्गत १०८ क्रमांकाची रुग्णावाहिकेला सुरुवात केली. ग्रामीण भागात आजही दळणवळाच्या सोई उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना त्वरीत जिल्हा रुग्णालयात किंवा शहरातील रुग्णालयात नेण्यासाठी अडचण जाते. त्यामुळे अनेकांना जीव गमावावा लागत होता.

१०८ ने दिले एक लाखांवर रुग्णांना जीवदान
परिमल डोहणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रुग्णांना तत्काळ रुग्णालयात पोहचविण्याच्या उद्देशाने शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णावाहिका सुरु केली. या रुग्णवाहिकेने मागील पाच वर्षांत एक लाख ३० हजार ५१० रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहचवून जीवदान दिले आहे.
रुग्णांना वेळेवर उपचार व्हावे, या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय आरोय अभियानातंर्गत १०८ क्रमांकाची रुग्णावाहिकेला सुरुवात केली. ग्रामीण भागात आजही दळणवळाच्या सोई उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना त्वरीत जिल्हा रुग्णालयात किंवा शहरातील रुग्णालयात नेण्यासाठी अडचण जाते. त्यामुळे अनेकांना जीव गमावावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरु केली आहे. मागील चार वर्र्षींच्या आकडेवारी लक्षात घेतल्यास ही रुग्णवाहिका रुग्णांना नवसंजीवनी देत असल्याचे सिद्ध होत आहे. सन २०१४ पासून या रुग्णवाहिकेने आॅक्टोबर २०१९ पर्यंत एक लाख ३० हजार ५१० रुग्णांना जीवदान दिले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सुर्व सोईसुविधा उपलब्ध असलेल्या २३ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. या रुग्णवाहिकेमध्ये आॅपरेशन हेड डॉ. दीपककुमार उके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व्यवस्थापक डॉ. चेतन कोरडे यांच्या नेतृत्वात रुग्णवाहिकेवर ५४ ड्रायव्हर, ४४ डॉक्टर सेवा देत आहेत. दरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांनी फोन करुन माहिती दिल्यास सदर रुग्णवाहिका त्वरीत त्या घटनास्थळावर जाऊन त्याला रुग्णालयात हजर करते.
विशेष म्हणजे, १०८ रुग्णवाहिकेसोबत डॉक्टरही पाठविला जातो. ते रुग्णांवर प्राथमिक उपचार करीत असल्याने रुग्णालयात जातपर्यंत रुग्ण दगावण्याची शक्यता कमी होत आहे.
रुग्णाच्या कुटुंबियांकडून फोन आल्यानंतर उपलब्ध असलेली रुग्णवाहिका त्वरित त्याठिकाणी पाठविली जाते. तसेच रुग्णवाहिकेतील डॉक्टरही आपतकालिन परिस्थितीत रुग्णावर उपचार करीत असतात. त्यामुळे रुग्णांवर वेळेवर व सुव्यस्थित उपचार होऊ शकतो.
-डॉ. चेतन कोरडे, जिल्हा व्यवस्थापक
आपातकालिन सेवेत रुग्णाला योग्य सेवा मिळावी यासाठी आमची चमू तत्पर असते. रुग्णवाहिकेतील सर्व वैद्यकीय साहित्यांची नेहमीच देखभाल व दुरुस्ती करण्यात येते. त्यामुळे कोणतीही स्थिती उदभवल्यास त्यावर वेळेवर यशस्वी उपचार करता येतो.
-डॉ. दीपककुमार उके, आॅपरेशन हेड