शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

स्पर्धा परीक्षा देताय? ‘प्लॅन बी’ तयार ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 4:26 PM

स्पर्धा परीक्षेत आपल्याला हवं तेच पद मिळेल असं काही नाही, अपयश पचवायची तयारी कुणी करायची?

ठळक मुद्देग्लॅमर, यशस्वी कहाण्या, पदाची आकांक्षा याच गोष्टींना भुलून स्पर्धा परीक्षा देऊ नका. आपल्याला जगण्याची परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे हे पण लक्षात ठेवलेलं बरं!

 - अजय अर्जुन नरळे

स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र म्हणजे एक खूप मोठ जंगलच आहे. या जंगलात जाऊन वाघाची शिकार करणारे खूप कमी. ते जमणारे शिकारीच या जंगलात यशस्वी होतात. खूप मोठी स्वप्न घेऊन विद्यार्थी या जंगलात प्रवेश करतात परंतु त्यापैकी खूपच कमी विद्यार्थी यशस्वी होतात. अपयश पदरी पडलेल्यांकडे नोकरी-व्यवसायाचा दुसरा कोणताच पर्याय नसेल तर पश्याताप करून घेण्याशिवाय हातात काहीच शिल्लक राहत नाही.

सध्याच्या परिस्थितीत स्पर्धा परीक्षेतून जेवढी पदे शासन भरते त्याच्या कित्येक पटीने जास्त विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत आहेत. ज्या विध्याथ्र्याना या परीक्षेतून चांगली पदे मिळाली तेच विद्यार्थी सत्कार, भाषण, व्याख्याने या माध्यमातून समाजासमोर येतात व त्यांना मिळणार्‍या  सुविधा व सन्मान याची कल्पना करून बहुतेक विद्यार्थी या क्षेत्नाकडे आकर्षित होतात. परंतु याच क्षेत्नात अपयशी ठरलेल्या विद्याथ्र्याकडे पहायला कुणाला वेळही नसतो. त्यांच्या वाट्याला फक्त उपहास, विटंबना येते, आणि या परिस्थितीत त्यांच्याकडे आर्थिक कमाईचा दुसरा मार्ग नसेल तर त्यांची परिस्थिती ‘ना घर का, ना घाट का’ अशीच होते.

आजच्या तरु णाईने स्पर्धा परीक्षा क्षेत्न हे फक्त सन्मान मिळविण्यासाठी किंवा सुख-सुविधा मिळवण्यासाठी किंवा यशस्वी लोकांची भाषणं ऐकून, सत्कार पाहून निवडू नये. आयुष्यभर चांगले जीवन जगण्यासाठी हा एकच पर्याय नसतो. स्पर्धा परीक्षेतून मिळणारी पदे कोणती आहेत, त्यांची जबाबदारी काय आहे तसेच त्या जबाबदा-या कर्तव्ये पार पाडण्यात आपण यशस्वी होऊ का व त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे या सर्वांसाठी आपल्या मनाची पूर्ण तयारी आहे का याचा विचार करूनच या क्षेत्नात प्रवेश करावा.  आजकाल खूप तरु ण-तरु णी पदवी घेऊनही मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मनासारखा व्यवसाय सुरु  करता येत नाही म्हणून या क्षेत्नाकडे वळताना दिसत आहेत.

या क्षेत्नात असणारी स्पर्धा व परीक्षेची अनियमितता (अलीकडील काळात परीक्षा काही प्रमाणात वेळेत होत आहेत, परंतु पदसंख्येचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे) पाहता मनाची पूर्ण तयारी करून आलेला विद्यार्थीच येथे यशस्वी होतो. या क्षेत्नात येणार्‍या प्रत्येकाचं स्वप्न असतं की, आपण प्रशासनातील सर्वात वरच्या पातळीवर अधिकारी व्हावे परंतु प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होत नाहीत. सद्यस्थितीचा विचार करता सर्वप्रथम जे पद मिळेल ते घेऊन त्यानंतर पुढील पदासाठी अजून जोमाने तयारी करणेच योग्य आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

एका बाजूला मोठ्या पदावर निवड झालेल्यांच्या सुख-सुविधा, मान-सन्मान याचा विचार केला जातो परंतु त्याच वेळी ज्यांच्या पदरी अपयश पडले आहे त्यांची समाजात जी घुसमट होते त्याचा कोणी विचार करताना दिसत नाही. या क्षेत्नात जे यशस्वी होतात त्यांना त्यांच्या यशस्वी होण्याची कारणे सांगावी लागत नाहीत. परंतु जे अयशस्वी होतात त्यांची कारणे ते सांगू शकत नाहीत. समाज अयशस्वी लोकांची कोणतीही कारणे ऐकायला तयार नसतो. म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या सर्वानी अपयश आले तर आपला पर्याय कोणता असावा याची तयारी करून ठेवावी. या क्षेत्नात यशस्वी होऊच असे ठरवून प्रत्येकजण इथे येत असतो, पण समजा नाहीच जमलं तर पुढे काय याचा विचारही मनाशी असलेला बरा!

 या क्षेत्नात मला हेच पद हवे आहे आणी ते मिळेपर्यंत मी कोणतेही पद स्वीकारणार नाही असे करण्याऐवजी सर्वप्रथम कोणते पद मिळेल ते घेऊन आपले अंतिम ध्येय प्राप्त करण्यासाठी तयारी करावी. यश मिळाले तर सर्व काही कल्पनेप्रमाणे होईलच परंतु अपयश आले तरी  हाताशी पर्याय असेल. जगणं आपली परीक्षा पाहणार नाही.

 

 (नगरपरिषद अभियंता, सांगोले नगरपरिषद, जि-सोलापूर)