शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
5
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
6
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
7
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
8
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
9
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
10
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
11
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
12
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
13
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
14
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
15
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
16
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
17
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
18
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
19
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
20
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना

कृषी क्षेत्रातील नवीन क्षितिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:43 IST

भारत कृषी प्रधान देश आहे. कृषीक्षेत्रात आपण आज प्रगती करीत आहोत. या क्षेत्रात कार्यरत होऊन प्रगतीशील होण्याच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत.

भारत कृषी प्रधान देश आहे. कृषीक्षेत्रात आपण आज प्रगती करीत आहोत. या क्षेत्रात कार्यरत होऊन प्रगतीशील होण्याच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. आज आपण या क्षेत्राशी संबंधित करिअर कसे करता येईल ते जाणून घेणार आहोत. कृषी विज्ञान, कृषी अर्थशास्त्र आणि कृषी अभियांत्रिकी तसेच पुष्पोत्पादन आणि उद्यान कृषी ह्या काही कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण शाखा आहेत ज्यांची आपण माहिती घेणार आहोत.कृषी विज्ञानकृषी विज्ञान म्हणजे कृषी क्षेत्राच्या वैज्ञानिक, तांत्रिक आणि व्यापारिक बाजूंचा अभ्यास करणे. कृषी विज्ञानमध्ये शेतीचे उत्पादन वाढविणे, उत्तम प्रतीचे उत्पादन करणे आणि धान्य उत्पादनात येणाऱ्याअडथळ्यांवर मात करणे या विषयांशी संबंधित संशोधनआणि विकास यावर काम केलेजाते.या क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी इ.रू. (कृषी विज्ञान) ही पदवी मिळवावी लागते. पदव्युतर शिक्षणात म्हणजेच ट.रू. मध्ये सोइल कन्जर्वेशन, वॉटर कन्जर्वेशन, प्लांट फिसिओलॉजी, फार्मिंग सिस्टीम मॅनेजमेंट, सिड टेक्नॉलॉजी इ. अनेक विषयांचा अभ्यास करता येतो. या शिक्षणाचा उपयोग स्वयंरोजगारात करता येतो. तसेच सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये रोजगार संधी उपलब्ध होते.कृषी अर्थशास्त्रभारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. यामुळे कृषी अर्थशास्त्राला विशेष महत्त्व आहे. कृषी अर्थशास्त्रामध्ये कृषी उत्पादन आणि कृषी व्यवसाय यांचा अभ्यास करून अर्थशास्त्रातील सिद्धान्ताचा वापर करून कृषी उत्पादनातील अडचणींना दूर करणे त्याचप्रमाणे कृषी अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणे यांचा समावेश होतो.या क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी इ.रू. (कृषी अर्थशास्त्र ) यात पदवीधर होणे गरजेचे आहे, त्यानंतर ट.रू. म्हणजेच पदव्युतर शिक्षणामध्ये फार्मिंग फायनान्स, पॉलिसी, मार्केटिंग, इम्पोर्ट-एक्स्पोर्ट यांचा अभ्यास केला जातो. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यावर अनेक शासकीय संस्थांमध्ये रोजगार संधी उपलब्ध होते.कृषी अभियांत्रिकीकृषी अभियांत्रिकी या क्षेत्रात फार्म इक्विपमेंट, रुलर स्ट्रक्चर, इरिगेशन आणि ड्रेनेज तसेच रुलर इलेक्ट्रिसिटी यांचा प्रामुख्याने समावेश होतो. थोडक्यात सांगायचे तर या क्षेत्रात अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादन वाढवणारी साधने बनविली जातात. या क्षेत्राचा गेल्या काही वर्षांत बराच विस्तार झाला आहे. या क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी अ‍ॅग्रिकल्चर इंजिनीअरिंग चा डिप्लोमा, इ.ए. / इ.ळीूँ. , ट.ए. / ट.ळीूँ. मिळवावे लागते. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यावर शासकीय आणि खाजगी कंपन्या, संशोधन विभाग अशा अनेक ठिकाणी रोजगार संधी उपलब्ध होते.पुष्पोत्पादनपुष्पोत्पादन म्हणजेच फुलांची शेती. गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही या व्यवसायाने चांगला जम बसविला आहे. विविध फुले आणि शोभेची झाडे यांची शेती करून ते बाजारपेठ तसेच कॉस्मेटिक आणि परफ्युम इंडस्ट्रीला पुरविणे हा या व्यवसायाचा प्रमुख भाग आहे. या क्षेत्रात येण्यासाठी कृषी विज्ञानात पदवीधर होऊन पदव्युत्तर शिक्षणासाठी फ्लोरीकल्चर किंवा होर्टिकल्चर या विषयांची निवड करू शकता.उद्यान कृषीउद्यान कृषी म्हणजेच होर्टीकल्चर थोडक्यात सांगायचे तर बागायत काम. यामध्ये फलोत्पादन, पुष्पोत्पादन, औषधी वनस्पतींची बागायत केली जाते. या क्षेत्रात झाडे त्यांची सुंदरता, उपयोगता, त्यांचा वापर तसेच त्यांचे उत्पादन वाढविणे यावर भर दिला जातो. ही शाखा फूड प्रोडक्शनच्या शाखेशी निगडित आहे. या क्षेत्रात येण्यासाठी होर्टीकल्चरमध्ये पदवीधर किंवा पदव्युतर म्हणजेच इ.रू. आणि ट.रू. मिळविणे गरजेचे आहे. या क्षेत्रातील शिक्षणानंतर शासकीय आणि खाजगी क्षेत्रांमध्ये कार्यरत होता येते. संशोधन क्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध आहेत.- डॉ. श्रेया उदारेकरिअर काऊन्सलर