शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Post Office मध्ये नोकरीची संधी! ६५० पदांसाठी भरती; महाराष्ट्रात किती जागा भरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 12:48 IST

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि अन्य डिटेल्स...

नवी दिल्ली: देशवासीयांचा सर्वांत विश्वासू मानल्या जाणाऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) नोकरीची मोठी संधी प्राप्त झाली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी शुभवार्ता आहे. कोरोना संकटातून हळूहळू सर्वच क्षेत्रे पूर्वपदावर येताना पाहायला मिळत आहेत. सार्वजनिक असो वा खासगी क्षेत्रात नोकऱ्यांच्या अनेकविध संधी प्राप्त होताना दिसत आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (India Post Payments Bank) अंतर्गत डाकसेवत पदाची भरती केली जणार आहे.

या भरती प्रक्रियेअंतर्गत ग्रामीण डाकसेवक पदाच्या एकूण ६५० जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी विविध राज्यातून यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्रात एकूण ७२ रिक्त जागा भरण्यात येतील. पोस्ट विभाग, संचार मंत्रालयमध्ये ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज करण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. या पदांसाठी अद्याप अर्ज न केलेले इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 

अशी आहे अर्ज प्रक्रिया

इच्छुक उमेदवारांनी पदभरतीसाठी अर्ज करताना रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. डाकसेवक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था / बोर्डातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, जीडीएस म्हणून किमान २ वर्षे कामाचा अनुभव असावा. उमेदवाराचे वय २० वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

दरम्यान, या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ७०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३० हजार रुपये इतका पगार दिला जाणार आहे. यासाठी १० मे रोजी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, २७ मे ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन