शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

इतरांना दोष देताय?-पण चूक नक्की कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 13:44 IST

आपलं चांगलं झालं तर इतरांना त्याचं क्रेडीट देतो का? मग काही चुकलं तर दोष इतरांचा कसा?

ठळक मुद्देनिर्णय कुठलाही असो त्याचे चांगलेवाईट परिणाम असतातच. ते पेलण्याची तयारी हवी.स्वतःतही बदल करण्याची इच्छाशक्ती हवी.

-योगिता तोडकर

मनीषा माझ्याकडे समुपदेशनासाठी येत होती. तिच्या वैवाहिक आयुष्यात ती समाधानी नव्हती. सुरवातीच्या दोन सत्रांमध्ये तिने तिच्या अडचणी मला सांगितल्या, त्याला अनुसरून आमच्यात चर्चादेखील चालू होती. पण तिची आजची वाक्य मात्न थोडी विस्मयकारकच होती. ती म्हणाली, माझ्या आई वडिलांमुळे माझं वाटोळं झालं, त्यांनी मला चांगलं स्थळ पाहून दिल असतं तर माझे असे हाल झाले नसते. आणि त्यात हा समाज, ठराविक वयातच लग्न व्हावं, असच व्हावं आणि काय काय..

मी तीचं शांतपणे ऐकून घेतलं व म्हटलं,  अग अश्या प्रकारचे निर्णय कोणी आपल्यासाठी घेतं तेंव्हा त्यातून काही वाईट घडावं या उद्देशाने थोडीच निर्णय घेतले जातात. असे निर्णय आपल्याला नेमकं काय देणार हे वेळच ठरवते.

दुसरी गोष्ट तुझे लग्न करून देताना तुझं मत विचारातच घेतलं नव्हते का? त्यावर ती म्हणाली, ‘तसं बरं होतं स्थळ, नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं म्हणून मी हो म्हटलं. आणि मला काय माहित होतं पुढे जाऊन इतका त्रास होईल’’.

म्हणजे पहा की, मनीषाचं वैवाहिक आयुष्य चांगलं चालू असतं, सारं उत्तम असतं तर तिनं घरातल्यांना, किंवा समाजाला अथवा स्वतर्‍च्या निर्णयाला नावं ठेवली असती का? किंवा चांगलं झालं याचं क्रेडीट कुणाला दिलं असतं का?

तर नाही.

कारण मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे कि स्वतर्‍साठी निर्णय आपण स्वतंत्नपणे घेतला आहे की सगळ्यांबरोबर मिळून घेतला आहे? आणि कसाही घेतला तरी एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याचे चांगले वाईट परिणाम होणार आहेतच.  त्यामुळे होणारे परिणाम चांगले असोत वा वाईट त्याची जबाबदारी आपण घेतलीच पाहिजे. त्यासाठी दुसर्‍याला जबाबदार धरण्यात काय मजा, आणि तसेही परिणामांना तोंड तुम्हाला द्यायचंच आहे मग दोषारोपांचा खेळ करत बसण्यात काय अर्थ?

आणखी महत्वाची गोष्ट भले घेतलेले निर्णय बदलता येणार नसतात, पण त्यातून मार्ग शोधून परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळता येऊ शकते.

आज काही गोष्टी घडवून आणल्या तर उद्या नक्कीच छान असू शकतो. कालसाठी रडत बसण्यात काय अर्थ? निर्णय घेताना काय चुकलं हे समजून घेऊन चालू परिस्थितीनुसार त्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करायला हवा. गरज असल्यास स्वतर्‍मध्येही  काही बदल करायला हवेत. ज्यामुळे तुमचे व तुमच्या अवतीभोवती असणार्‍यांचे आयुष्य सुकर होईल.

कुठल्याही निर्णयाचे नकारात्मक परिणाम समोर आल्यास दुसर्‍याच्या बाबतीत वकील व स्वतर्‍च्या बाबतीत न्यायाधीश बनू नका. प्रत्येक निर्णयाच्या परिणामांची जबाबदारी घ्या. आणि त्याला अनुसरून परिस्थितीत  व स्वतर्‍मध्ये बदल घडवून आणा.

अन्यथा इतरांना दोष देण्यापलिकडे आपल्या हाती काहीच उरत नाही.

 

( लेखिका समुपदेशक आहेत.)

yogita1883@gmail.com