शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

२२ लाख आयटी प्रोफेशनल नोकऱ्या सोडणार; भारतात इंडस्ट्रीला घरघर, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 16:51 IST

आयटी सेक्टरला भारतीय कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता जाणवू लागली आहे. एका रिपोर्टनुसार IT-BPM क्षेत्रातील नोकरी सोडणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

आयटी क्षेत्रामुळे गेल्या दोन दशकांत भारताला सोन्याचे दिवस आले आहेत. आयटी सेक्टर वाढल्याने करोडो लोकांना रोजगार मिळाला आहे. घरांची मागणी, वाहनांची मागणी, जीवनावश्यक वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, याच आयटी सेक्टरला आता घरघर लागण्याची चिन्हे आहेत. आयटी प्रोफेशनल्सची संख्या घटू लागल्याने बड्या बड्या आयटी कंपन्यांचेही धाबे दणाणले आहेत. 

आयटी सेक्टरला भारतीय कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता जाणवू लागली आहे. एका रिपोर्टनुसार IT-BPM क्षेत्रातील नोकरी सोडणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हा वेग कमालीचा वाढू लागला आहे. असेच सुरु राहिले तर २०२५ पर्यंत २२ लाख आयटी प्रोफेशनल नोकरी सोडण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेला एट्रिशन रेट म्हटले जात आहे. स्वेच्छेने नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दराची मोजमाप करण्यासाठी ही व्याख्या वापरली जाते. 

या रिपोर्टनुसार ५७ टक्के आयटी प्रोफेशनल पुन्हा कधीही आयटी सेक्टरमध्ये परतणार नाहीएत. पगार वाढल्याने चांगली कामगिरी करता येईल आणि समाधान मिळेल, असे या कर्मचाऱ्यांना वाटत आहे. टीम लीज डिजिटलचे सीईओ सुनील चेम्मनकोटील यांच्यानुसार भारतीय आयटी क्षेत्राने गेल्या दशकात चांगली वाढ पाहिली आहे. IT क्षेत्राने 15.5 टक्के वाढ नोंदवली असून, आर्थिक वर्ष 2022 मध्ये 5.5 लाख नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. सध्याच्या काळात कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि प्राधान्यक्रम दोन्ही बदलले आहेत.हे कर्मचारी आपल्या कामाचे स्वरुप आणि त्यांच्या करिअरचा आढावा घेत आहेत. यावर काही फरक दिसताच हे कर्मचारी आपली नोकरी अर्ध्यातच सोडून अन्य कामांकडे वळू लागले आहेत, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

कर्मचाऱ्यांचे काय म्हणणे आहे...50 टक्के कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की आयटी क्षेत्रातील कर्मचारी चांगले उत्पन्न आणि फायदे नसल्यामुळे नोकऱ्या सोडत आहेत. तर 25 टक्के लोकांचे म्हणणे आहे की करिअरमध्ये वाढ न होणे हे नोकऱ्या सोडण्याचे मुख्य कारण आहे. 2021 मध्ये नवीन-युगातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली आहे, यामुळे देखील नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण वाढले आहे.  

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानjobनोकरी