शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
8
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
9
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
12
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
13
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
14
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
15
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
16
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
17
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
18
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
19
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
20
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP

दुष्काळात वन्यजीव तहानेने व्याकूळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 17:43 IST

बुलडाणा: पाणीटंचाईच्या झळा केवळ ग्रामीण किंवा नागरी वस्तीतच बसत नाहीत, तर अभयारण्यातही वन्यजीव तहानेने व्याकुळ होत आहेत. ज्ञानगंगा अभयारण्यातील नैसर्गीक पानवठ्यांवर दुष्काळाचे ढग निर्माण झाले आहेत.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: पाणीटंचाईच्या झळा केवळ ग्रामीण किंवा नागरी वस्तीतच बसत नाहीत, तर अभयारण्यातही वन्यजीव तहानेने व्याकुळ होत आहेत. ज्ञानगंगा अभयारण्यातील नैसर्गीक पानवठ्यांवर दुष्काळाचे ढग निर्माण झाले आहेत. तर कृत्रिम पानवठ्यांची स्थिती चिंताजनक असून अनेक हातपंप बंद आहेत. यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातीलवन्यजीव तहानले आहेत. अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात हिवाळ्याच्या सुरूवातीपासून पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरूवात झाली होती. सध्या पाणीटंचाईवर प्रशासनाला चांगलेच काम लागले आहे. पाण्याचा थेंबही नसलेल्या गावांमध्ये टँकर सुरू करणे, ज्याठिकाणी खासगी विहिरींना थोडेबहुत पाणी आहे, अशा विहिरी अधिग्रहीत करणे, यासारख्या उपायोजना पाणीटंचाई निवारणार्थ करण्यात येत आहेत. कमी पर्जन्यामुळे जिल्ह्यातील आठ तालुके व २१ महसूल मंडळात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. तर १५ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या दुष्काळाच्या झळा केवळ ग्रामीण किंवा नागरी भागातच नाहीत; तर वन्यजीवांनाही बसत आहे. जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबरवा, लोणार यांसारखी मोठ-मोठी अभयारण्ये असून येथे वेगवेगळ्या प्रजातींचे असंख्य वन्य प्राणी अधिवास करतात. बुलडाण्यापासून आठ किलोमीटरवर तर खामगावपासून २० किलोमीटरवर ज्ञानगंगा नदीशेजारी वसलेल्या २०५.२१० चौरस किलोमीटरच्या क्षेत्राला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा मिळालेला आहे. या अभयारण्यात बिबट, हरिण, काळवीट, रानमांजर, जंगली कुत्रे, तरस, लांडगा, रानडुक्कर, नीलगाय, माकड, वटवाघूळ, अस्वल यांसारखे वन्यजीव मुक्तपणे संचार करतात. स्थानिक तर काही स्थालांतरित अशा वेगवेगळ्या पक्ष्यांच्या अशा एकूण १५० प्रजाती या अभयारण्यात आढळून येतात. मात्र सध्या या अभयारण्यातील वन्यजीवांची पाण्यासाठी वाताहात होत आहे. येथे कृत्रीम पानवठे व नैसर्गीक पानवठे असूनही वन्यजीवांच्या घशाला कोरड पडत आहे. 

हातपंप बंद!ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये कुत्रिम पानवठे ३८ आहेत. तर हातपंप सात आहेत, त्यातील तीन हापंपत सध्या सुरू आहेत. मात्र चार हातपंप बंद स्थितीत आहेत. नैसर्गिक पानवठ्यांमध्ये लाखेचा झिरा, काशी नळकुंड, लांब डोह, ऋषिबाचा खोरा यांचा समावेश आहे. 

लोणार अभयारण्यातील पानवठे कोरडेलोणार अभयारण्यामध्ये विविध प्रजातीचे वन्यप्राणी आहेत. मात्र सध्या या अभयारण्यातील पानवठे कोरडे पडल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी मोठी अडचण होत आहे. यासंदर्भात वनसंरक्षक जाधव यांच्याशी संपर्क साधता असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. 

या दुष्काळाच्या झळा वन्यजीवांनाही बसत आहेत. त्यांच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातील उत्तर देव्हारी मधील पानवठा क्रमांक तीनची हापसी दुरुस्त करून देण्यात यावी तसेच अभयारण्यात इतर ठिकाणी असलेले हातपंप दुरूस्त करण्यात यावे, अशी मागणी वनविभागाकडे केलेली आहे. - नितिन श्रीवास्तववन्यजीव सोयरे, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यwildlifeवन्यजीवdroughtदुष्काळ