शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

अबब... पांढऱ्या सोन्याने गाठला पाच वर्षातील नीचांक; कापसाची बोंडे खुललीच नाही

By विवेक चांदुरकर | Updated: December 23, 2023 17:38 IST

कवळीने दर्जा घसरला, फक्त ४५०० रुपये भाव

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (बुलढाणा): अवकाळी पाऊस, बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाचा दर्जा घसरला आहे. कापसाची बोंडे खुलली नसून कवळीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. चक्क ४५०० रुपये क्विंटलने कापसाची खरेदी करण्यात येत असून, ६५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे यावर्षी कापूस उत्पादक शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. गत पाच वर्षातील कापसाचा हा नीचांकी दर आहे.

२०२१-२२ मध्ये कापसाचे दर १२ ते १३ हजार रुपयांवर पोहोचले हाेते. २१-२२ मध्ये ७२०० ते ११,६५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले होते. त्यामुळे २२-२३ वर्षामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची पेरणी केली होती. २२-२३ मध्ये कापसाला ६२०० ते ९४०० रुपये भाव मिळाले. सरासरी दर ७८०० होते. २३-२४ मध्ये मात्र कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. व्यापारी फक्त ४५०० रुपयांपासून कापसाची खरेदी करीत आहेत. चांगल्या कापसाला ६५०० रुपये भाव मिळत आहे. शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले असले तरी एफएक्यूच्या अडचणीमुळे शेतकरी व्यापाऱ्यांकडे शेतमाल विकण्याला प्राधान्य देतात. कापसाच्या दर्जाचे कारण सांगत व्यापारी अल्पभावात कापूस खरेदी करीत आहेत.

कापूस पडला काळा

जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. सतत चार ते पाच दिवस अवकाळी पाऊस झाल्यामुळे कापूस भिजला. भिजलेला कापूस काही प्रमाणात काळा पडला आहे. तसेच कपाशीची झाडे खाली पडल्याने कापसात माती मिसळली आहे. यासोबतच कापसाची बोंडे खुलली नसून कवळी असल्यामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे.

गत चार वर्षातील भाव

वर्ष दर सरासरी

  • २०२० - २१ ४८०० ते ६२०० ५५००
  • २०२१ - २२ ७२०० ते ११,६५० ९४००
  • २०२२ - २३ ६२०० ते ९४०० ७८००
  • २०२३ - २४ ४५०० ते ७१०० ५७००

ग्रामीण भागात ४८०० ते ६५०० रुपयांपर्यंत भाव आहेत. यावर्षी पावसामुळे कापसाचा दर्जा घसरला आहे. तसेच कवळीमुळे भाव पडले आहेत. ४८०० रुपयांपासून कापसाची खरेदी करण्यात येत आहे. अनेक शेतकरी याच भावात कापसाची विक्री करीत आहेत.- विनोद बोंबटकार. व्यापारी, जळगाव जामोद 

भाववाढीच्या अपेक्षेने १०६ टक्के पेरणीगत दोन वर्षांत कापसाला चांगले भाव मिळाले होते. कापसाचे भाव चांगले राहतील या अपेक्षेने जिल्ह्यात शेतकऱ्यांनी यावर्षी १०६ टक्के पेरणी केली. जिल्ह्यात कापसाचे सरासरी क्षेत्र १ लाख ८३ हजार ५६०.०६ हेक्टर आहे, तर यावर्षी १ लाख ९४ हजार ९२९ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला असून, केवळ ४५०० रुपये भाव मिळत आहे.

यावर्षी कापसाला कमी भाव मिळत आहे. अवकाळी पावसाने व बोंडअळीने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे दर्जा नसलेल्या कापसाला फक्त ४५०० रुपयेच दर मिळत आहेत. शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन मदत करण्याची गरज आहे.- पुरुषोत्तम मेतकर, बाजारभाव अभ्यासक, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणा