मलकापूर तालुक्यातून विहीर चोरीला गेली!
By Admin | Updated: June 10, 2015 02:35 IST2015-06-10T02:35:36+5:302015-06-10T02:35:36+5:30
हिंगणा काझी शिवारात होती विहीर; ग्रामपंचायतसह जिल्हा प्रशासनही संशयाच्या घे-यात .

मलकापूर तालुक्यातून विहीर चोरीला गेली!
बुलडाणा : शासनाच्या ई-क्लास जमिनीवर रोजगार हमी योजनेंतर्गत सन २00६ मध्ये भालेगाव (रण) वासीयांकरिता लगतच्या हिंगणाकाझी शिवारात पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे खोदकाम व बांधकाम करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली. विहिरीकरिता मंजूर झालेला १ लाख ५३ हजार ६00 रुपयांचा निधीही भालेगाव (रण) ग्रामपंचायतला प्राप्त झाला; पण अद्यापही ह्यत्याह्ण जागेवर विहिरीची निर्मिती न झाल्याने तो प्राप्त झालेला निधी गेला तरी कुठे? तत्कालीन सरपंच व सचिवाने त्या निधीचे काय केले? असे प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहेत. याप्रकरणी प्रशासनाकडून अपेक्षित असे सहकार्य मिळत नसल्याचीही ओरड होत असून, ग्रामस्थांनी आता विहीर चोरीला गेल्याची तक्रार मलकापूर तहसीलदार यांच्याकडे करीत आंदोलनाचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. भालेगाववासीयांची पाणी समस्या सुटावी, या अनुषंगाने शासनाच्यावतीने रोजगार हमी योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याची विहीर खोदकाम व बांधकामकरिता जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे आदेश क्र.रोहयो/द.प./पिपावी/अका-२/५९७/0६ अन्वये २८ जून २00६ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच यांनी रितसर मागणी करून भालेगाव लगतच्या मौजे हिंगणा काझी शिवारातील गट नं.५३ मधील सरकारी जमीनमध्ये विहिरीकरिता १0 गुंठे जमिनीचा प्रस्तावदाखल करण्यासाठी हिंगणा काझी तलाठी यांच्याकडून गट नं.५३ चा ७/१२, नकाशा व नाहरकत आदी कागदपत्रे रितसर मिळवली. भूजल शास्त्रीय सर्वेक्षण विभागांतर्गत सदर गाव परिसराचे सर्वेक्षण करण्यात येऊन गट नं.५३ चा परिसर पाणी लागण्याच्या दृष्टीने योग्य असल्याचे स्थळदर्शक प्रमाणपत्र ग्रामपंचायतला देण्यात आले.