शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

दिवाळीच्या दिवशी चटणी भाकर खाणार, शिंदे गटातील आमदाराने सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 16:43 IST

बळीराजावर ओढावलेल्या संकटामुळे शेतकऱ्याची दिवाळी यंदा अंधारात साजरी होत आहे. शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव असल्याने शेतकऱ्यांना आधार देत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.

बुलढाणा - राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट ओढावलं असून माजी मुख्यमंत्री आणि शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच औरंगाबादमध्ये जाऊन पाहणी दौरा केला. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. तत्पूर्वी, शिंदे गटाच्या आमदाराने शेतकऱ्यांच्या या दु:खात सहभागी होण्यासाठी आपणही दिवाळी न साजरी करता उद्या म्हणजे पहिल्या अंघोळीच्यादिवशी चटणी-भाकर खाऊन दिवाळी साजरी करणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी, जिल्हाधकारी कार्यालयासमोर ही कृती करुन एक संदेश देणार असल्याचंही ते म्हणाले. 

बळीराजावर ओढावलेल्या संकटामुळे शेतकऱ्याची दिवाळी यंदा अंधारात साजरी होत आहे. शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव असल्याने शेतकऱ्यांना आधार देत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्यामुळे आपणही यंदाची दिवाळी साजरी करणार नाही. अशी भूमिका आमदार संजय गायकवाड यांनी घेतली आहे. तसेच, मी कुठलाही निषेध नोंदवणार नाही, कुठलाही घोषणाबाजी करणार नाही. त्यामुळे हे सरकारविरोधात आंदोलन नाही. केवळ, समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचंही गायकवाड यांनी म्हटलं आहे. या भूमिकेमागे कुठलंही राजकारण नसल्याचंही ते म्हणाले.  

परतीच्या पावसाने जिल्हाभरात शेतकऱ्यांसमोर डोंगराचा संकट उभा केला आहे हातात तोंडाशी आलेला घास हरवल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. सगळ्यांची दिवाळी उत्साहाने साजरी होत असताना शेतकऱ्यांची दिवाळी मात्र संकटाने साजरी होत आहे. मागील दोन वर्षात कोरोना संक्रमणामुळे दिवाळीवर संकट होते.यंदा वातावरण निवळल्याने दिवाळी उत्साहात साजरी होईल असे वाटत होते. मात्र, परतीच्या पावसाने हे स्वप्न देखील धुळीस मिळाले .सातत्याने तिसऱ्या वर्षी शेतकऱ्याची दिवाळी साजरी होत नसल्याने शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवून या पोशिंदाच्या पाठीमागे आपण आहोत ही भूमिका घेत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी घेतली. तसेच, दीपावलीच्या दिवशी आपण कोणत्याही प्रकारचा दिवा लावणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले.  

टॅग्स :Sanjay Gaikwadसंजय गायकवाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना