शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दिवाळीच्या दिवशी चटणी भाकर खाणार, शिंदे गटातील आमदाराने सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 16:43 IST

बळीराजावर ओढावलेल्या संकटामुळे शेतकऱ्याची दिवाळी यंदा अंधारात साजरी होत आहे. शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव असल्याने शेतकऱ्यांना आधार देत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.

बुलढाणा - राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट ओढावलं असून माजी मुख्यमंत्री आणि शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच औरंगाबादमध्ये जाऊन पाहणी दौरा केला. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. तत्पूर्वी, शिंदे गटाच्या आमदाराने शेतकऱ्यांच्या या दु:खात सहभागी होण्यासाठी आपणही दिवाळी न साजरी करता उद्या म्हणजे पहिल्या अंघोळीच्यादिवशी चटणी-भाकर खाऊन दिवाळी साजरी करणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी, जिल्हाधकारी कार्यालयासमोर ही कृती करुन एक संदेश देणार असल्याचंही ते म्हणाले. 

बळीराजावर ओढावलेल्या संकटामुळे शेतकऱ्याची दिवाळी यंदा अंधारात साजरी होत आहे. शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव असल्याने शेतकऱ्यांना आधार देत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्यामुळे आपणही यंदाची दिवाळी साजरी करणार नाही. अशी भूमिका आमदार संजय गायकवाड यांनी घेतली आहे. तसेच, मी कुठलाही निषेध नोंदवणार नाही, कुठलाही घोषणाबाजी करणार नाही. त्यामुळे हे सरकारविरोधात आंदोलन नाही. केवळ, समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचंही गायकवाड यांनी म्हटलं आहे. या भूमिकेमागे कुठलंही राजकारण नसल्याचंही ते म्हणाले.  

परतीच्या पावसाने जिल्हाभरात शेतकऱ्यांसमोर डोंगराचा संकट उभा केला आहे हातात तोंडाशी आलेला घास हरवल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. सगळ्यांची दिवाळी उत्साहाने साजरी होत असताना शेतकऱ्यांची दिवाळी मात्र संकटाने साजरी होत आहे. मागील दोन वर्षात कोरोना संक्रमणामुळे दिवाळीवर संकट होते.यंदा वातावरण निवळल्याने दिवाळी उत्साहात साजरी होईल असे वाटत होते. मात्र, परतीच्या पावसाने हे स्वप्न देखील धुळीस मिळाले .सातत्याने तिसऱ्या वर्षी शेतकऱ्याची दिवाळी साजरी होत नसल्याने शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवून या पोशिंदाच्या पाठीमागे आपण आहोत ही भूमिका घेत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी घेतली. तसेच, दीपावलीच्या दिवशी आपण कोणत्याही प्रकारचा दिवा लावणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले.  

टॅग्स :Sanjay Gaikwadसंजय गायकवाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना