१६ गावांसाठी पाण्याचे टँकर मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 00:19 IST2017-04-26T00:19:28+5:302017-04-26T00:19:28+5:30
बुलडाणा : पाणी टंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट जिल्ह्यातील १६ गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर करण्यात आले आहे

१६ गावांसाठी पाण्याचे टँकर मंजूर
बुलडाणा : पाणी टंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट जिल्ह्यातील १६ गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये दे.राजा तालुक्यातील धोत्रा नंदई गावाचा समावेश आहे. तसेच सिं.राजा तालुक्यातील सावरगांव माळ गावाचाही समावेश आहे. धोत्रानंदई गावाकरिता २४ मेट्रीक टन क्षमतेचे १ टँकर दिवसातून ३ फेऱ्या मारणार आहे. सावरगांव माळसाठी २४ मेट्रीक टन क्षमतेचे १ टँकर दिवसातून ३ फेरी मारणार आहे. त्याचप्रमाणे बुलडाणा तालुक्यातील चौथाकरिता याच क्षमतेचे एक टँकर २ फेरी दिवसातून मारणार आहे. तसेच माळविहीर गावासाठी १ टँकर दिवसातून ३ फेऱ्या, हनवतखेडकरिता १ टँकर दिवसातून एक फेरी व गिरडा, गोंधनखेड लोकसंख्येसाठी १ टँकर २ फेरी, जांबच्या ३२१० लोकसंख्येसाठी १ टँकर ३ फेऱ्या आणि देऊळघाट येथील १६ हजार लोकसंख्येकरिता ६ टँकर दिवसातून ३ फेऱ्या मारणार आहे. रायपूर व शिरपूरच्या अनुक्रमे ९५५० व ५२५३ लोकसंख्येकरिता दोन टँकर दिवसातून ६ फेऱ्या मारणार आहे.
तसेच चिखली तालुक्यातील भोगावती येथील १०२० लोकसंख्येसाठी २४ मेट्रीक टन क्षमतेचे १ टँकर दिवसातून २ फेऱ्या मारणार आहे. सैलानी नगर येथे २५५३ लोकांसाठी १ टँकर दिवसातून ३ फेरी मारणार आहे. डोंगरशेवली येथील ३८५० लोकसंख्येकरिता २ टँकर ४ फेरी, धोडपच्या १४८० लोकसंख्येसाठी १ टँकर ३ फेरी, कोलारा गावच्या ३७५५ लोकसंख्येकरिता १ टँकर दिवसातून ३ फेरी व पळसखेड सपकाळ गावच्या ७०० लोकसंख्येकरिता १ टँकर दिवसातून ३ फेरी मारणार आहे. गटविकास अधिकारी यांनी संबंधित गावांना वेळोवेळी भेटी देवून टँकरच्या खेपांची नोंद तपासावी. ग्रामपंचायतीने नोंद व्यवस्थित घ्यावी. टँकरचे पाणी शुद्ध करूनच पुरविल्या जात असल्याबाबत दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाणी टंचाई विभागाने कळविले आहे.