शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

मालेगावातील ३५ कोटीची पाणी पुरवठा योजना थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 17:51 IST

मालेगाव (वाशिम): शहराची वाढलेल्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाºया पाणीटंचाईवर कायम मात करण्यासाठी प्रस्तावित केलेली ३५ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना थंड बस्त्यात पडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव (वाशिम): शहराची वाढलेल्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाºया पाणीटंचाईवर कायम मात करण्यासाठी प्रस्तावित केलेली ३५ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना थंड बस्त्यात पडली आहे. शहराला अद्यापही एकाच जलकूंभातून पाणी पुरवठा होत असून, तालुक्यातील धरणांनी तळही गाठला आहे. त्यामुळे यंदाही शहरवासियांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची भिती आहे. मालेगाव ग्रामपंचायतचे नगर पंचायतमध्ये रुपांतर होऊन तीन वर्षांंचा कालावधी उलटला आहे, तर शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सुविधांत मात्र फारशी सुधारणा येथे झालेली नाही. त्यात शहरातील पाणी पुरवठा, ही अत्यंत ज्वलंत अशी समस्या आहे. दरवर्षी मालेगाव शहरात पाणीटंचाई जाणवते. शहराला गेल्या २५ वर्षांपासून पाणी पुरवठा करण्यासाठी एकच जलकूं भ असून, या जलकूंभातून एकाच वेळी संपूर्ण शहरवासियांना पुरेसा पाणी पुरवठा होणे शक्य नाही. त्यातच शहराला पाणी पुरवठा करणाºया प्रकल्पांची पातळीही उन्हाळ्यापूर्वीच तळ गाठण्यास सुरुवात करते. त्यामुळे उन्हाळाभर नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गतवर्षी अपुºया पावसामुळे नागरिकांना अतिशय भीषण पाणीटंचाईचे चटके सोसावे लागले होते. त्यावेळी चाकातीर्थ प्रकल्पावरून कुरळा प्रकल्पापर्यंत पाणी आणून, नागरिकांची तहान भागविण्यासाठी तात्पुरती योजना सुरू करण्यात आली. ती योजनाही फारसी उपयुक्त ठरली नाही. प्रत्यक्षात मालेगाव शहराची पाणीटंचाई कायम मिटविण्यासाठी प्रशासनाने ३५ कोटींची योजना प्रस्तावित केली आहे. तथापि, या योजनेचे कोणतेही काम अद्याप सुरू झाले नाही. आता यंदाही तालुक्यातील प्रकल्पांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. त्यात विहिरी आणि कूपनलिकाही कोरड्या पडत आहेत. त्यामुळे नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची भिती आहे. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाने वेळीच उपाय योजना करणेही आवश्यक आहे; परंतु अद्यापही यावर कोणताच ठराव, निर्णय झालेला नाही. 

  मालेगाव शहरात यंदा पाणीटंचाई भासणार नाही. यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. तात्पुरती पाणी पुरवठा योजना सुरू करून शहरात पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात येईल, तसेच ३५ कोटीच्या कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजनेसाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. -रेखा अरूण बळीनगराध्यक्ष, मालेगाव

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी