शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

जुुन्याच पंपांवर पाणीपुरवठ्याचा डोलारा; बुलडाणा शहरात आठ दिवसाआड पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 16:52 IST

बुलडाणा : जुन्याच मोटारपंपांवर नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा डोलारा उभा असल्यामुळे गेल्या दोन दशकांपासून बुलडाणेकरांच्या पाचवीला पुजलेली पाणीसमस्या कायम आहे

ठळक मुद्दे येळगाव धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पंप नादुरुस्त असल्याने नागरिकांना आठ दिवसाआड पाणी मिळत आहे. पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत. नळाला आठ दिवसानंतर पाणी येत असल्याने पाणी कसे पुरवावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

बुलडाणा : जुन्याच मोटारपंपांवर नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा डोलारा उभा असल्यामुळे गेल्या दोन दशकांपासून बुलडाणेकरांच्या पाचवीला पुजलेली पाणीसमस्या कायम आहे. सध्यस्थितीत येळगाव धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पंप नादुरुस्त असल्याने नागरिकांना आठ दिवसाआड पाणी मिळत आहे. पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत. एक लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या बुलडाणा शहराला नजीकच्या येळगाव धरणावरुन पाणीपुरवठा होतो. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने येळगाव धरण हाऊसफुल्ल झाले. धरणात सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र असे असतानाही शहरवासींना वेळेवर पाणी मिळत नाही. दररोज कुठल्या तरी वॉर्डातील लोकांची ओरड ऐकायला मिळते. गेल्या दोन -तीन दिवसांपासून नळाला आठ दिवसानंतर पाणी येत असल्याने पाणी कसे पुरवावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच लग्नसराईचे दिवस सुरु असल्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे. पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून नागरिक त्रस्त झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

नवीन पंप बसविणे आवश्यक

बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने १९९८ मध्ये येळगाव धरणावर २२५ हॉर्स पॉवर क्षमतेचे तीन मोटारपंप बसविलेले आहेत. त्यापैकी एक पंप स्टँडबाय ठेवून इतर दोन पंप सुरु असतात. जवळपास २० वर्षांपासून हे पंप सतत पाणी उपसण्याचे काम करीत आहेत. तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास एक पंप १० वर्ष चांगले काम करु शकतो. हे पंप जुनाट झाल्यामुळे सतत नादुुरुस्त असतात. सध्यस्थितीत दोन पंप बंद पडलेले असून केवळ एका पंपावर काम सुरु आहे. महिनाभरापूर्वीसुध्दा पंप बंद पडल्यामुळे अशीच परिस्थिती उदभवली होती. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नवीन पंप बसविण्याची गरज आहे. यासाठी तीन कोटी रुपयांचा प्रस्ताव मंत्रालयाच्या पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यांनी दिली.

पाणीप्रश्नाचे राजकारण नको

गेल्या दोन दशकांपासून शहरातील पाणीसमस्या कायम आहे. पाणीप्रश्नावर पालिकेपासून ते विधानसभेच्या निवडणूका लढल्या गेल्या. विरोधकांनी पाणीसमस्येविरोधात रान पेटविले. मात्र आजतागायत पाणीप्रश्न सुटलेला नाही. राजकीय पुढाºयांनी केवळ गरजेपुरता पाणीप्रश्न हाताळला. राजकारण बाजुला ठेवून कायमस्वरुपी समस्या मार्गी लागावी याकरिता सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. पाणीप्रश्नाचे केवळ राजकारण नको अशा भावना नागरिकांमधून ऐकायला मिळत आहेत.

मोटारपंप बंद पडल्यामुळे शहरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा सुरु होता. आता पंप दुरुस्त करण्यात आला असून नागरिकांना पुर्ववत पाणी मिळेल.

- अजय व्यवहारे अभियंता, नगर पालिका बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी