शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:36 IST

दरेगाव : चांदवड तालुक्यातील पूर्व भाग खरिपातील पोळ कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जुलै महिन्यात पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. यावर्षी मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पावसाने ओढ दिल्याने भर पावसाळ्यात परिपरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे श्रावणसरींची प्रतीक्षा : पाण्याअभावी शेतकरी चिंतित

दरेगाव : चांदवड तालुक्यातील पूर्व भाग खरिपातील पोळ कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जुलै महिन्यात पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. यावर्षी मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पावसाने ओढ दिल्याने भर पावसाळ्यात परिपरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.कमी पाण्यावर शेतकऱ्यांनी कांदा उळे टाकून रोपे तयार करून ठेवली आहेत; मात्र लागवडीसाठी पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतित आहे. याआधीच खरिपातील अन्य पिके पावसाअभावी सुकली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे. हा आर्थिक फटका सहन करत असतानाच येथील उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असणाºया कांदा पिकाचे भवितव्य श्रावण महिन्याच्या सरींवर अवलंबून आहे. परिसरात तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाच्या भरवशावर काही शेतकºयांनी कांदा लागवड सुरू केली आहे. या भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीस सुरु वात होईल, अशी आशा आहे.पिके सुकेल्याने व फुलोºयात झटका बसून अपेक्षित उत्पादन न होता घट येणार आहे. या परिसरात दरवर्षी जिल्ह्यात सुरुवातीला लवकरच कांदा लागवड करतात. यावेळी पाऊस पाणीच नसल्याने लागवड उशिरा होणार आहे. मात्र त्याकरिता पुढे होणाºया पावसावर गणित अवलंबून राहणार आहेच. परिसरात अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याने विहिरींना पाणी नाही. नदी, नाले, बंधारे, शेततळे, कूपनलिका कोरड्याठाक आहेत. काही शेतकºयांना आपल्याकडे साठवणूक केलेल्या पाण्यावर तर काहींनी निसर्गभरोसे रोपे जगविली आहेत. पंचेचाळीस दिवसांपूर्वी टाकलेली रोपे लागवड योग्य तयार झाली आहे. काहींना थोडेसुद्धा पाणी नसल्याने ती जळाली. आज न उद्या पाऊस येईल या आशेने शेतकºयांनी कांदा लागवडीसाठी शेत मशागत करून पाळे पाडून वाफे तयार करून ठेवली आहेत. श्रावणात रिमझिम पाहळे स्वरूपात जरी पाऊस पडत राहिला तरी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड कोरडवाहू स्वरुपात होईल आणि त्यानंतर शेतकºयांचे डोळे परतीच्या पावसावर राहतील.