शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

बुलडाणा जिल्ह्यातील ८० टक्के गावात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 18:21 IST

बुलडाणा: दुष्काळी स्थितीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील पाणीटंचाई अधिक तीव्र होत असून १४२० गावांपैकी ८० टक्के गावामध्ये पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे.

बुलडाणा: दुष्काळी स्थितीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील पाणीटंचाई अधिक तीव्र होत असून १४२० गावांपैकी ८० टक्के गावामध्ये पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. दरम्यान, येत्या काळात मान्सूनची जिल्हयात दमदार हजेरी न लागल्यास टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत आणखी ३०७ गावांची भर पडण्याची साधार भीती व्यक्त होत आहे.त्यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाईनिवारण कक्षाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र दुष्काळ दाहकतेची स्थिती पाहता टंचाई या उपाययोजना काहीशा तोकड्या पडत असल्याचे चित्र आहे. बुलडाणा जिल्ह्यातील २५२ गावात तीव्र स्वरुपाचा दुष्काळ असून ४० टक्के गावात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे टंचाई कक्षाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. अर्थात २५२ गावे हे रेडझोनमध्ये गेले असून ५६४ गावे येलो झोनमध्ये गेले आहेत. त्यामुळे येत्या काळात पाऊस न आल्यास स्थिती बिकट होऊन आणखी ३०७ गावांची टंचाईग्रस्त गावांमध्ये भर पडले, अशी भीती व्यक्त होत आहे. असे असले तरी जिल्ह्याती २९७ गावात अद्याप पाणीटंचाई भासण्याची शक्यता नसल्याचे चित्र असून तसा अहवाल जिल्हा प्रशासनाने बनवला आहे.वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील २५२ गावांना २७२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खामगाव, बुलडाणा तालुक्यात येत्या काळात टँगरग्रस्त गावांची संख्या ५०शीच्या घरात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. देऊळगव राजा तालुकाही याबाबतीत मागे नाही.टंचाई निवारणासाठी यंदा ११२३ गावात दोन हजार १६७ उपाययोजना प्रस्तावीत करण्यात आल्या होत्या. त्यासाठी ४४ कोटी ६४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षीत होता. पैकी १५८६ उपाययोजनांना ८६८ गावातील टंचाई निवारण करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी १४४० उपाययोजना पूर्णत्वास गेल्या असून ८१८ गावांना त्याला लाभ झाला. त्यासाठी ३० कोटी २३ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने विधन विहरी घेणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पुरक नळ योजना, टँकरने पाणीपुरवठा करणे, खासगी विंधन विहीरींचे अधिग्रहण, विहीर खोलीकर आणि गाळ काढणे अशा उपाययोजना करणयात आल्या आहेत.

टंचाई निधीतून दोन कोटी ९५ लाखांची देयकेटंचाई काळात कुठलीही पाणीपुरवठा योजना ही थकीत विज देयकाअभावी बंद राहू नये म्हणून टंचाई निधीतून अशा नळ योजनांची देयके देण्यात येत आहे. त्यापोटी ११९५ पाणीपुरवठा योजनांची दोन कोटी ७५ लाख ६० हजार रुपयांची देयके देण्यात आली आहे. फेब्रुवारी २०१९ पर्यंतची ही देयके महावितरणला अदा करण्यात आली असून मार्च ते जून २०१९ या कालावधीतील देयके देण्यासाठीही चार कोटी ४८ लाख ५७ हजार रुपयांची गरज भासणार आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाकडे मागणी करून मार्गदर्शनही मागण्यात आलेले आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईbuldhanaबुलडाणा