शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

water cup competition : बुलडाणा जिल्ह्याचा बोलबाला; तिन तालुक्यातील ९ गावांना पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 3:50 PM

जळगाव जामोद तालुक्यातील बांडापिंपळ या आदिवासी खेड्याची राज्यातील पहिल्या १५ गावांमध्ये निवड झाली.

ठळक मुद्दे बुलडाणा जिल्ह्यातून एकुण १४८ गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. जळगाव जामोद तालुक्यातून ५४ गावे या स्पर्धेत सहभागी झाले होते.मोताळा तालुक्यातील ५१ आणि संग्रामपूर तालुक्यातील ४३ गांवांनी या स्पर्धेत सहभागी झाले होते.

अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  ‘पाणी’  फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यातील ९ गावांनी विविध पुरस्कारांवर नाव कोरले प्रस्थापित केले. यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील बांडापिंपळ गावाचे वेगळेच वर्चस्व दिसून आले.पुणे येथील बालेवाडी येथे पाणी फांउडेशनच्यावतीने शानदार पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात पाणी फांउडेशनचे अध्यक्ष अमीर खान, मुख्यमंत्र्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.जळगाव जामोद तालुक्यातील बांडापिंपळ या आदिवासी खेड्याची राज्यातील पहिल्या १५ गावांमध्ये निवड झाली. दरम्यान, रविवारी पुणे येथे पार पडलेल्या एका सोहळ्यात बुलडाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यातील प्रत्येकी तीन गावांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  जळगाव जामोद तालुक्यातून ५४ गावे या स्पर्धेत सहभागी झाले होते. तर मोताळा तालुक्यातील ५१ आणि संग्रामपूर तालुक्यातील ४३ गांवांनी या स्पर्धेत सहभागी झाले होते. बुलडाणा जिल्ह्यातून एकुण १४८ गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. जिल्हा समन्वय प्रताप मारोडे यांच्या समवेत जळगावचे तालुका समन्वयक ऋषीकेश ढोले, राहुल सिरसाट, वैभव गावंडे, संग्रामपूर तालुका समन्वयक विवेक वानखडे, गजानन ढोबाळे, सीमा उमाळे आणि मोताळा तालुका समन्वय  बिंदीया तेलगोटे, सतीश राठोड, ब्रम्हदेव गिºहे  यांच्यासह पुरस्कार प्राप्त गावांचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते.

 बुलडाणा जिल्ह्यातील  ९ गावांचा सन्मान!जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील बांडापिंपळ, निंबोरा बु. आणि निंबोरा खुर्द , संग्रामपूर तालुक्यातील उमरा, भिलखेड, सावळा तर मोताळा तालुक्यातील पोफळी,  लपाली आणि पोखरी या गावांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पहिल्यास्थानी आलेल्या गावांना प्रत्येकी दहा लाख रुपये, द्वितीय स्थानी असलेल्या गावांना प्रत्येकी सहा तर तृतीय स्थानी आलेल्या तिनही गावांना प्रत्येकी चार लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. पोपटराव पवारांकडून बांडापिंपळचा विशेष सन्मान!जळगाव जामोद तालुक्यातील आदीवासी गावाचा पोपटराव पवार यांनी विशेष सन्मान केला. विनोबा भावे, बाबा आमटेंच्या चळवळीतून पुढे आलेल्या आणि सालईबन या निसर्ग प्रकल्पाचे मनजीतसिंह यांच्या पुढाकारात सातपुड्याच्या दुर्गम भागात झालेल्या कामांचा विशेष उल्लेख केला. यावेळी पोपटराव पवार यांनी सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बांडापिंपळ गावाला रस्ता मिळावा ही मागणी देखील मुख्यमंत्र्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे केली. यावेळी ‘लसून की चटणी बडी मजेदार; बांडापिंपळ पाणीदार’ या शब्दात पवार यांनी बांडापिंपळचा सन्मान केला. पोपटराव पवारांच्या कौतुकाच्या थापेमुळे बांडापिंपळ वासीयांसाठी हा पुरस्कार सोहळा खºया अर्थाने वेगळा ठरला.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाbuldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोद