शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पाणी परिषद : नदीजोड प्रकल्प लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 14:04 IST

नदीजोड प्रकल्प लोकचळवळ होऊन वैनगंगेचे पाणी हे पैनंगगेत आणण्यासाठी प्रभावी जनआंदोलन उभे राहावे, अशी अपेक्षा मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेत व्यक्त करण्यात आली.

बुलडाणा/मेहकर: हवामानामध्ये होणारे बदल आणि त्यामुळे सातत्याने पडणारा दुष्काळ पाहता तुटीच्या नदी खोऱ्यात जादा पाणी असलेल्या खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेला वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प लोकचळवळ होऊन वैनगंगेचे पाणी हे पैनंगगेत आणण्यासाठी प्रभावी जनआंदोलन उभे राहावे, अशी अपेक्षा मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेत व्यक्त करण्यात आली.बुलडाण्याचे खा. प्रतापराव जाधव, जिजाऊ जलसमृद्धी नदीजोड प्रकल्प समितीचे विकास डाळीमकर, प्रवीण खंडेलवाल, श्याम पठाडे, भास्कर कदम, ज्ञानेश्वर डहाके यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या पाणी परिषदेच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बनचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी पाटबंधारे मंत्री भारत बोंद्रे, नदीजोड तज्ज्ञ डॉ. स्वामी, नागपूर येथील जलदूत डॉ. सतीश चव्हाण, महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख, पूर्ती ग्रुपचे जल सल्लागार माधवराव कोटस्थाने, नजीजोड तज्ज्ञ सुरेंद्र खपके प्रामुख्याने उपस्थित होते.वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार झालेला आहे; मात्र घाटावरील भागाला याचा लाभ होणार नाही. पैनगंगा प्रकल्पापर्यंत हे पाणी आणल्यास घाटावरील भागासह अगदी यवतमाळ आणि मराठवाड्यालाही याचा लाभ होऊ शकतो. त्यादृष्टीने नदीजोड प्रकल्पाबाबत जनमानसात जागृती होऊन जिल्ह्यात ही एक लोकचवळ म्हणून उभी राहावी यासाठी ही पाणी परिषद आयोजित करण्यात आली असल्याचे यावेळी खा. प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले.हा प्रकल्प मार्गी लागल्यास विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांचा पाणी प्रश्न मिटण्यास मदत होईल. तापी आणि गोदावरी हे दोन्ही नदी खोरे जोडल्या जाऊन पाण्याची उपलब्धता या भागात निर्माण होऊन शेतकऱ्यांकडे सुबत्ता येईल, असे महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख यांनी सांगितले. यासोबतच गोसेखुर्द ते नळगंगा या ४०० किमी अंतरामधील बरेच बारकावे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, नदीजोड तज्ज्ञ सुरेंद्र खपके म्हणाले की, गोसेखुर्दमधून वाहून जाणाºया अतिरिक्त पाण्यापैकी १०० टीएमसी पाणी मिळाल्यास विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांची पाण्याची समस्या सुटेल. बुलडाणा जिल्ह्यालाही यातून जवळपास २५ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकले. वैनगंगेचे हे पाणी पेनटाकळी प्रकल्पात आणण्यासाठी अवघड अशा ४७ किमी लांबीच्या पट्ट्याचे सर्वेक्षण अपेक्षित आहे. पाणी प्रश्नावर सजग असलेल्या खा. प्रतापराव जाधव यांनी त्यासाठी स्वत:च्या विकास निधीतून ५ लाख रुपये देऊन या ४७ किमीच्या डीपीआरसाठी पुढाकार घेतला असल्याचे नदीजोड प्रकल्पाचे तज्ज्ञ सुरेंद्र खपके यांनी सांगितले. त्यामुळे आता प्रत्येकाने कामाला लागून ही लोकचवळ उभी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी जल सल्लागार माधवराव कोटस्थाने, जलदूत सतीश चव्हाण यांनीही उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरWaterपाणीriverनदी