शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

पाणी परिषद : नदीजोड प्रकल्प लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 14:04 IST

नदीजोड प्रकल्प लोकचळवळ होऊन वैनगंगेचे पाणी हे पैनंगगेत आणण्यासाठी प्रभावी जनआंदोलन उभे राहावे, अशी अपेक्षा मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेत व्यक्त करण्यात आली.

बुलडाणा/मेहकर: हवामानामध्ये होणारे बदल आणि त्यामुळे सातत्याने पडणारा दुष्काळ पाहता तुटीच्या नदी खोऱ्यात जादा पाणी असलेल्या खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेला वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प लोकचळवळ होऊन वैनगंगेचे पाणी हे पैनंगगेत आणण्यासाठी प्रभावी जनआंदोलन उभे राहावे, अशी अपेक्षा मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेत व्यक्त करण्यात आली.बुलडाण्याचे खा. प्रतापराव जाधव, जिजाऊ जलसमृद्धी नदीजोड प्रकल्प समितीचे विकास डाळीमकर, प्रवीण खंडेलवाल, श्याम पठाडे, भास्कर कदम, ज्ञानेश्वर डहाके यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या पाणी परिषदेच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बनचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी पाटबंधारे मंत्री भारत बोंद्रे, नदीजोड तज्ज्ञ डॉ. स्वामी, नागपूर येथील जलदूत डॉ. सतीश चव्हाण, महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख, पूर्ती ग्रुपचे जल सल्लागार माधवराव कोटस्थाने, नजीजोड तज्ज्ञ सुरेंद्र खपके प्रामुख्याने उपस्थित होते.वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार झालेला आहे; मात्र घाटावरील भागाला याचा लाभ होणार नाही. पैनगंगा प्रकल्पापर्यंत हे पाणी आणल्यास घाटावरील भागासह अगदी यवतमाळ आणि मराठवाड्यालाही याचा लाभ होऊ शकतो. त्यादृष्टीने नदीजोड प्रकल्पाबाबत जनमानसात जागृती होऊन जिल्ह्यात ही एक लोकचवळ म्हणून उभी राहावी यासाठी ही पाणी परिषद आयोजित करण्यात आली असल्याचे यावेळी खा. प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले.हा प्रकल्प मार्गी लागल्यास विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांचा पाणी प्रश्न मिटण्यास मदत होईल. तापी आणि गोदावरी हे दोन्ही नदी खोरे जोडल्या जाऊन पाण्याची उपलब्धता या भागात निर्माण होऊन शेतकऱ्यांकडे सुबत्ता येईल, असे महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख यांनी सांगितले. यासोबतच गोसेखुर्द ते नळगंगा या ४०० किमी अंतरामधील बरेच बारकावे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, नदीजोड तज्ज्ञ सुरेंद्र खपके म्हणाले की, गोसेखुर्दमधून वाहून जाणाºया अतिरिक्त पाण्यापैकी १०० टीएमसी पाणी मिळाल्यास विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांची पाण्याची समस्या सुटेल. बुलडाणा जिल्ह्यालाही यातून जवळपास २५ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकले. वैनगंगेचे हे पाणी पेनटाकळी प्रकल्पात आणण्यासाठी अवघड अशा ४७ किमी लांबीच्या पट्ट्याचे सर्वेक्षण अपेक्षित आहे. पाणी प्रश्नावर सजग असलेल्या खा. प्रतापराव जाधव यांनी त्यासाठी स्वत:च्या विकास निधीतून ५ लाख रुपये देऊन या ४७ किमीच्या डीपीआरसाठी पुढाकार घेतला असल्याचे नदीजोड प्रकल्पाचे तज्ज्ञ सुरेंद्र खपके यांनी सांगितले. त्यामुळे आता प्रत्येकाने कामाला लागून ही लोकचवळ उभी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी जल सल्लागार माधवराव कोटस्थाने, जलदूत सतीश चव्हाण यांनीही उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरWaterपाणीriverनदी