शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

पाणी परिषद : नदीजोड प्रकल्प लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 14:04 IST

नदीजोड प्रकल्प लोकचळवळ होऊन वैनगंगेचे पाणी हे पैनंगगेत आणण्यासाठी प्रभावी जनआंदोलन उभे राहावे, अशी अपेक्षा मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेत व्यक्त करण्यात आली.

बुलडाणा/मेहकर: हवामानामध्ये होणारे बदल आणि त्यामुळे सातत्याने पडणारा दुष्काळ पाहता तुटीच्या नदी खोऱ्यात जादा पाणी असलेल्या खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेला वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प लोकचळवळ होऊन वैनगंगेचे पाणी हे पैनंगगेत आणण्यासाठी प्रभावी जनआंदोलन उभे राहावे, अशी अपेक्षा मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेत व्यक्त करण्यात आली.बुलडाण्याचे खा. प्रतापराव जाधव, जिजाऊ जलसमृद्धी नदीजोड प्रकल्प समितीचे विकास डाळीमकर, प्रवीण खंडेलवाल, श्याम पठाडे, भास्कर कदम, ज्ञानेश्वर डहाके यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या पाणी परिषदेच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बनचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी पाटबंधारे मंत्री भारत बोंद्रे, नदीजोड तज्ज्ञ डॉ. स्वामी, नागपूर येथील जलदूत डॉ. सतीश चव्हाण, महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख, पूर्ती ग्रुपचे जल सल्लागार माधवराव कोटस्थाने, नजीजोड तज्ज्ञ सुरेंद्र खपके प्रामुख्याने उपस्थित होते.वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार झालेला आहे; मात्र घाटावरील भागाला याचा लाभ होणार नाही. पैनगंगा प्रकल्पापर्यंत हे पाणी आणल्यास घाटावरील भागासह अगदी यवतमाळ आणि मराठवाड्यालाही याचा लाभ होऊ शकतो. त्यादृष्टीने नदीजोड प्रकल्पाबाबत जनमानसात जागृती होऊन जिल्ह्यात ही एक लोकचवळ म्हणून उभी राहावी यासाठी ही पाणी परिषद आयोजित करण्यात आली असल्याचे यावेळी खा. प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले.हा प्रकल्प मार्गी लागल्यास विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांचा पाणी प्रश्न मिटण्यास मदत होईल. तापी आणि गोदावरी हे दोन्ही नदी खोरे जोडल्या जाऊन पाण्याची उपलब्धता या भागात निर्माण होऊन शेतकऱ्यांकडे सुबत्ता येईल, असे महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख यांनी सांगितले. यासोबतच गोसेखुर्द ते नळगंगा या ४०० किमी अंतरामधील बरेच बारकावे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, नदीजोड तज्ज्ञ सुरेंद्र खपके म्हणाले की, गोसेखुर्दमधून वाहून जाणाºया अतिरिक्त पाण्यापैकी १०० टीएमसी पाणी मिळाल्यास विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांची पाण्याची समस्या सुटेल. बुलडाणा जिल्ह्यालाही यातून जवळपास २५ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकले. वैनगंगेचे हे पाणी पेनटाकळी प्रकल्पात आणण्यासाठी अवघड अशा ४७ किमी लांबीच्या पट्ट्याचे सर्वेक्षण अपेक्षित आहे. पाणी प्रश्नावर सजग असलेल्या खा. प्रतापराव जाधव यांनी त्यासाठी स्वत:च्या विकास निधीतून ५ लाख रुपये देऊन या ४७ किमीच्या डीपीआरसाठी पुढाकार घेतला असल्याचे नदीजोड प्रकल्पाचे तज्ज्ञ सुरेंद्र खपके यांनी सांगितले. त्यामुळे आता प्रत्येकाने कामाला लागून ही लोकचवळ उभी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी जल सल्लागार माधवराव कोटस्थाने, जलदूत सतीश चव्हाण यांनीही उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरWaterपाणीriverनदी