शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

पुलासह बंधाऱ्यांमुळे जलसंधारणाला गती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 18:41 IST

पहिल्याच पावसात या पूलासह बंधाºयात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली असून जलसंधारणाला गती मिळाली आहे. त्यामुळे अमरावती विभागात पहिलाच पुलासह बंधारा बांधण्याच्या उद्देशाचे फलित झाल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देकाथरगाव येथे उभारण्यात आलेल्या पुलासह बंधाºयाला प्रत्येकी ६ मीटरचे ५ गाळे आहेत. या बंधाºयात पहिल्याच पावसात मोठ्याप्रमाणात पाण्याची साठवणूक झाली. सिंचन आणि पिण्याचे किंवा उद्योगाच्या हेतूसाठी या पाण्याचा उपयोग होवू शकतो.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे जतन आणि वाहतूक अशा तिहेरी उद्देशाने संग्रामपूर तालुक्यातील  काथरगाव येथे पहिलाच पुलासह बंधारा बांधण्यात आला. पहिल्याच पावसात या पूलासह बंधाºयात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली असून जलसंधारणाला गती मिळाली आहे. त्यामुळे अमरावती विभागात पहिलाच पुलासह बंधारा बांधण्याच्या उद्देशाचे फलित झाल्याचे दिसून येते. खालावलेली जलपातळी वाढविण्यासाठी तसेच पाणलोट व्यवस्थापनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील पूलासह बंधाºयाच्या धर्तीवर काथरगाव पूल (तालुका संग्रामपूर) येथे पहिलाच पुलासह बंधारा उभारण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोदतंर्गत या बंधाºयाचे एका महिन्याच्या कालावधीत विक्रमी वेळेत बांधकाम पूर्णत्वास नेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अमरावती विभागातील पहिलाच पुलासह बंधारा काथरगाव येथे बांधण्यात आला. या बंधाºयात पहिल्याच पावसात मोठ्याप्रमाणात पाण्याची साठवणूक झाली असून, काथरगाव येथील नागरिकांना दळणवळणाचीही सुविधाही निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल थोटांगे, जळगाव जामोदचे उपविभागीय अभियंता जितेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनात या पुलासह बंधाºयाचे बांधकाम तडीस नेण्यात आले. 

अशी आहे पुलासह बंधाºयाची रचना!बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथे उभारण्यात आलेल्या पुलासह बंधाºयाला प्रत्येकी ६ मीटरचे ५ गाळे आहेत. पुलाची लांबी ३० मीटर असून, बंधाºयाची उंची २ मीटर आहे. तर राफट फाउंडेशन पध्दतीने पायव्याची उभारणी केली आहे. काथरगाव पुलासह बंधाºयाच्या उभारणीसाठी २५ हजार ७८७ रुपयांप्रमाणे प्रतीमीटर खर्च लागला.

३.१५ कोटी लीटर्स साठवणूक क्षमता!काथरगाव येथील पुलासह बंधाºयाचे बांधकाम विक्रमीवेळेत म्हणजेच सुमारे एक महिन्याच्या कालावधीत पूर्णत्वास नेण्यात आले. बंधाºयाची पाणी साठवण क्षमता ३.१५ कोटी लीटर्स एवढी आहे. या बंधाºयामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यास मदत होवू शकते. त्याचप्रमाणे सिंचन आणि पिण्याचे किंवा उद्योगाच्या हेतूसाठी या पाण्याचा उपयोग होवू शकतो. जागेवर बांधण्यात आलेला पहिलाच बंधारा!सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सचिव पी.एल.बोंगीरवार यांच्या संकल्पनेत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे (प्रीकास्ट स्वरूपातील) पहिला पूलासह बंधारा बांधण्यात आला. हा बंधारा निर्मिती करताना बाहेर पुनरूत्पादनक्षम  (कान्क्रीट) तयार करण्यात आले. नंतर त्याची मूल येथे जुळवणी करण्यात आली. मात्र, काथरगाव येथे जागेवरच पुलासह बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे जागेवर बांधण्यात आलेला काथरगाव हा राज्यातील एकमेव पुलासह बंधारा ठरतोय. काथरगाव येथील बंधाराही सेवानिवृत्त सचिव पी.एल.बोंगीरवार यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आला. 

 काथरगाव येथे अमरावती विभागातील पहिलाच पूलासह बंधारा उभारण्यात आला. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या पुलासह बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. चंद्रपूर येथील बंधारा हा ह्यप्रीकास्टह्णस्वरूपातील असून, काथरगाव येथे जागेवरच पुलासह बंधाºयाची निर्मिती करण्यात आली आहे.- राजेश एकडेशाखा अभियंता, सा.बा.विभाग, जळगाव जामोद

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाDamधरण