शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

बुलडाणा जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोताभोवती ‘वॉच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:16 AM

बुलडाणा: जिल्ह्यात झालेल्या अल्प पर्जन्यामुळे या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या पाचशे मीटर अंतरामध्ये विहिरीचे खोदकाम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर पाणीटंचाई प्रतिबंधासाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताभोवती प्रशासनाने ‘वॉच’ ठेवला आहे. 

ठळक मुद्देपाणीटंचाई निवारणार्थ विशेष प्रयोजन ५00 मीटरची अट विहीर खोदकामाला कायम

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात झालेल्या अल्प पर्जन्यामुळे या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या पाचशे मीटर अंतरामध्ये विहिरीचे खोदकाम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर पाणीटंचाई प्रतिबंधासाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताभोवती प्रशासनाने ‘वॉच’ ठेवला आहे. जिल्ह्यात सन २0१६-२0१७ या वर्षामध्ये १0 हजार १४५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला होता. तरीसुद्धा हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईचे चटके बसले; परंतु सन २0१७-१८ यावर्षी  मागील वर्षीपेक्षा १ हजार मि.मी. पाऊस कमी झालेला आहे. यावर्षी जिल्ह्यात एकूण ९ हजार ३२६ मि.मी. पाऊस झाला, तर १३ पैकी चार तालुक्यात पर्जन्यमानाने टक्केवारीत शंभरीसुद्धा गाठली नाही. जिल्ह्यातील लोणार तालुक्यात ९५ टक्के, मेहकर तालुक्यात ९९ टक्के, शेगाव तालुक्यात ७८ टक्के व संग्रामपूर तालुक्यात ९२ टक्केच पाऊस झाला आहे. या अल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिकच दिसून येत आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये हिवाळ्यापासूनच पाणीटंचाई भासत आहे. पाणीटंचाईवर प्रतिबंध म्हणून सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या पाचशे मीटर अंतरामध्ये कोणत्याही विहिरीचे खोदकाम करण्यास बंदी घातली आहे. त्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने विशेष प्रयोजन केले आहे. त्यानुसार सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताभोवती निश्‍चित व अधिसूचित केलेल्या प्रभाव क्षेत्रात विहिरीसाठी खोदकाम न करण्याच्या सूचना उपविभगीय अधिकार्‍यांमार्फत ग्रामसेवक व तलाठी यांना देण्यात आल्या आहेत. तसेच पाणीटंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक उपयायोजनाही प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. त्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या स्रोताभोवती नेहमी प्रशासनाकडून वॉच ठेवण्यात येत आहे.  अद्यापही जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये महाराष्ट्र भूजल विकास व व्यवस्थापन अधिनियमाचे पालन होतान दिसून येत नाही. 

यांची राहणार नजरउपविभागीय अधिकार्‍यांमार्फत पाणीटंचाई प्रतिबंधासाठी पिण्याच्या पाण्याच्या स्रोताभोवती विशेष लक्ष ठेवण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी व गावचे पोलीस पाटील यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच ग्रामसेवक, तलाठी व गावचे पोलीस पाटील यांना सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताभोवती पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या संरक्षणामध्ये कुठलाही अडथळा दिसून आला तर प्रशासनामार्फत चौकशी करून कारवाईसुद्धा होऊ शकते. 

तीन टप्प्यात उपाययोजनामहाराष्ट्र भूजल विकास व व्यवस्थापन अधिनियमान्वये तीन टप्प्यात पाणीटंचाईच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर २0१७ ते डिसेंबर २0१७ या कालावधीत पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात जानेवारी २0१८ ते मार्च २0१८ या कालावधीत आणि तिसर्‍या टप्प्यात एप्रिल २0१८ ते जून २0१८ या कालावधीत जिल्ह्यातील गावांमध्ये पाणीटंचाई व पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात येत आहेत.

पाणीटंचाई प्रतिबंधासाठी ग्रामस्तरीय समितीमध्ये सूचना दिलेल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या पाचशे मीटर अंतरामध्ये विहिरीचे खोदकाम करण्यास बंदी आहे. तसेच त्यासाठी ग्रामसेवक, तलाठी व गावचे पोलीस पाटील लक्ष ठेवून आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ  सार्जवनिक पाण्याच्या स्रोतावर अवैध  कनेक्शन असलेल्या मोटारीसुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत.- डॉ. नीलेश अपार, उपविभागीय अधिकारी, मेहकर.  

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा