शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

शाश्वत व हक्काचे आरक्षण हवे, मराठा मोर्चामधील सूर; बुलढाण्यात ‘एक मराठा, लाख मराठा'

By निलेश जोशी | Updated: September 13, 2023 16:49 IST

१३ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मोर्चास प्रारंभ झाला. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणांनी यावेळी संपूर्ण बुलढाणा शहर दणाणून गेेल होते.

बुलढाणा : मराठा आरक्षणासोबतच जालन्यातील अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ बुलढाणात १३ सप्टेंबर रोजी सकल मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. जिजामाता प्रेक्षागारातून शांततेत व शिस्तीत हा मोर्च काढण्यात आला.

संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. तेथे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा स्थानिक जयस्तंभ चौकात पोहोचला. तेथे या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

१३ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मोर्चास प्रारंभ झाला. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणांनी यावेळी संपूर्ण बुलढाणा शहर दणाणून गेेल होते. दरम्यान जयस्तंभ चौकात हा मोर्चा पोहोचल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांत झाले. यावेळी मराठा मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या समीक्षा, दीपाली भोसले, गायत्री खराटे, वैष्णवी कड यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका मांडली. शाश्वत व हक्काचे आरक्षणासाठी मराठा समाजाचा संघर्ष सुरू असून दुसऱ्याचे नुकसान करून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण द्यावे. दुसऱ्याच्या वाट्यातून ते नको असे या जिजाऊंच्या लेकींनी सांगितले.

पल्लवी जरांगेचेही आवेशपूर्ण भाषणअंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांची कन्या पल्लवी, आणि त्यांच्या भारती कटारे आणि सुवर्णा शिंदे या दोन्ही बहीणींनी मोर्चात सहभगा घेतला. त्यामुळे मोर्चेकऱ्यांमध्ये उत्साह अेासंडून वाहत होता. मनोज जरांगे यांचे आंदोलन हे समाजाच्या मागण्यांसाठी आहे. आपण सर्व स्वत:च्या हक्कासाठी आज रस्त्यावर उतरलो आहोत. अंतरवाली सराटी येथे शांततेत आंदोलन सुरू असतांना त्यांच पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. पण आपण वाघ आहोत. मराठा सहसहा पेटून उठत नाही, पण पेटून उठला तर विझत नाही, असे वक्तव्य करत पल्लवीने आरक्षणाशिवाय माघार नसल्याचे स्पष्ट केले.

आरक्षणासाठी आत्महत्या नकरण्याचे आवाहनमराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे हे त्यासाठी उपोषण करत आहेत. परंतू या उपोषणाला पाठींबा म्हणून काही जण स्वत:चा जीव धोक्यात घालत आहे. आरक्षण मिळाल्यानंतर तरुण मुले जेव्हा नोकरीमध्ये जातील ते मनोज जरांगेंना बघायचे आहे. त्यामुळे कृपया करून कोणीही आरक्षणाच्या मुद्द्यावर स्वत:चा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मनोज जरांगे यांची बहीण भारतीताई कटारे यांनी केल आहे. शांततेच्या व संवैधानिक मार्गाने शाश्वत आरक्षणासाठीचा हा आपला लढा असल्याचे त्या म्हणाल्या. आपले भाऊ मनोज जरांगे यांनी हाच संदेश घेऊन आपल्याला येथे पाठवल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण