शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला पूर्णत्वास नेणार  - डॉ. राजेंद्र शिंगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:51 IST

वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजनेद्वारे विदर्भातील तुटीच्या भागात वळवण्याचे काम आपण पूर्णत्वास नेणार असल्याची, ग्वाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी चिखली येथे दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांचे सहकारातील तर माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांचे सिंचन क्षेत्रातील योगदान प्रचंड मोठे आहे. त्यांच्या इतके काम आपण करू की नाही, हे सांगणे अवघड असले तरी भारतभाऊंच्या काळात चालना मिळालेली आणि गोसीखूर्द प्रकल्पातील अतिरिक्त पाणी वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजनेद्वारे विदर्भातील तुटीच्या भागात वळवण्याचे काम आपण पूर्णत्वास नेणार असल्याची, ग्वाही राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी चिखली येथे दिली.ते सोमवारी चिखली येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री भारत बोंद्रे होते. तर प्रमुख उपस्थितीत आ. श्वेता महाले, रजणीताई शिंगणे उपस्थित यांची उपस्थिती होती. निवडणुकांत आरोप-प्रत्यारोप हे होतच असताच. परंतू, निवडणुकांनतर राजकारण व पक्षीय मतभेद विसरून विकासाला चालना देण्यासाठी एकत्र येणे ही महाराष्टÑाची संस्कृती असल्याचे स्पष्ट करत किंबहुना ही संस्कृती स्व.यशवंतराव चव्हाण यांच्यापासून चालत आली आहे आणि ही परंपरा चिखलीत या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने पहावयास मिळाली याचा वेगळा आनंद झाल्याचे मत शिंगणे यांनी व्यक्त केले. मी पडत्या फळाची आज्ञा मानून आणि सहकारात काम करणारा माणूस असून माझा पिंडच मुळात सर्वांना सोबत घेवून काम करण्याचा असल्यामुळे पालकमंत्री व राज्याचा मंत्री या नात्याने विकासकामे करताना कोणताही दुजाभाव राहणार नाही, तथापी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना न्याय देण्याचे काम येत्या काळात करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान येत्या काळात जिगाव प्रकल्पाला चालना देण्यासह क्रीडांगणांसाठी लागेल तेवढा निधी पुरविण्याची ग्वाही देखील ना.डॉ.शिंगणे यावेळी दिली. आ. श्वेता महाले यांनी ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पालकत्वातूनच आपल्या राजकीय व सामाजिक कार्याची सुरूवात झाली असल्याने विरोधी पक्षाची भूमिका बाजुला ठेवून हा कौटूंबिक सत्कार होत असल्याचे स्पष्ट केले.  

भेसळ खपवून घेणार नाही !अन्न व औषधी प्रशासनमंत्री हे पद महाराष्टÑातील जनतेच्या आरोग्याशी निगडीत आहे. राज्यातील जनतेला भेसळमुक्त अन्न व औषधी मिळायलाच हवे, राज्यात दुधात होणारी भेसळ ही गंभीर बाब आहे. यासाठी गुटख्याप्रमाणेच दूधात भेसळ करणाऱ्यांवरही कडक कारवाई करणार आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारच्या अन्नात भेसळ खपवून घेणार नाही, असा इशारा अन्न व औषधी प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणेChikhliचिखली