वान व पुर्णा या नद्याही कोरड्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:35 IST2017-08-03T23:32:17+5:302017-08-03T23:35:19+5:30
पातुर्डा : पातुडर्य़ात पेरण्यानंतर दमदार पाऊसच नसल्याने शेतकर्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. दुसर्यांदा पेरूनही गेल्या आठवडाभर दमदार पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.

वान व पुर्णा या नद्याही कोरड्या!
लोकमत न्यूज नेटवर्क
पातुर्डा : पातुडर्य़ात पेरण्यानंतर दमदार पाऊसच नसल्याने शेतकर्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. दुसर्यांदा पेरूनही गेल्या आठवडाभर दमदार पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. पावसाअभावी पिके पिवळी पडल्याने शेतकर्यांच्या चिंता वाढल्या आहेत. भरपूर पावसाच्या लपंडावाने किटकांचा प्रादुर्भाव सुध्दा दिसून येत असून पिकांवर पाने कुरतडणारे किड्यांचे आक्रमण झाले आहे. शेतकर्यांना दमदार पावसाची आशा लागुन आहे. मात्र परिणामकारक पाऊस पडत नसल्याने यंदा शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे शेत शिवारातील चित्र आहे. जून महिन्यात १६0 मिमी तर जुलै महिन्यात केवळ ८0 मिमी पावसाची येथील पर्जन्यमापक यंत्राची नोंद आहे. अत्यल्प पावसात पिके कशीबशी तग धरून आहेत. अशातच कोरड्या वातावरणामुळे पिके वाढू शकली नाहीत. मुग व उडीद व सोयाबीन हे पिक सध्या फळधारणेवर आहे. ऐन याच वेळात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकरी पिकांना पाणी देवून संगोपन करण्याचा प्रयत्न करीत आहे.
श्रावणाची झडी ची अपेक्षाच
श्रावण महिना अत्यंत पावसाचा असतो यातील १0 दिवस निघून गेल्याने श्रावणाच्या श्रडीची यावर्षी प्रतीक्षाच बनुन राहिली. वान धरणाच्या पाणलोट क्षेत्रालाही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तसेच पूर्णा ही सुध्दा परिसरातील मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे. या नदीकाठी मोठा पूर गेला नाही व ऑगस्ट महिन्यात पूर्णा नदी रौद्रय रूप धारण करते यावर्षी पूर्णा नदीला सुध्दा बेताचेच पाणी वाहिले.
पिक विमाबद्दल शेतकरी व्दिधा स्थितीत
परिसरात यावर्षी कमी पर्जन्यमान असून पिकांची परिस्थिती फारसी समाधानकारक नाही. असे असले तरीही पिक विम्याबद्दल शेतकरी व्दिधा मनस्थितीत आहे. गेल्या वर्षी शासनाने तूर पिकविण्याचे आवाहन केले . मात्र शासकीय खरेदी पाच हजार तर खाजगी व्यापार्यांकडे केवळ तीन हजार रूपये भाव मिळाला तसेच सोयाबीनला सुध्दा कमी भाव मिळाला. पिकांना योग्य भाव न मिळाल्याने शासकीय आवाहनाबद्दल शेतकर्यांमध्ये अनास्था आहे. तसेच गेल्या वर्षी पिकविम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकरी पिक विमा काढण्याबद्दल व्दिधा स्थितीत आहेत. पिक विमा काढण्याची तारीख वाढली मात्र शासकीय धोरण निश्चित नसल्याने शेतकर्यांचा उत्साह मात्र वाढला नाही, असे चित्र आहे.