शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ज्ञानगंगा अभयारण्य कार्यालयाच्या भिंती झाल्या बोलक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:36 AM

बुलडाणा : येथील ज्ञानगंगा अभयारण्य कार्यालयाच्या भिंती बोलक्या झाल्या असून, बुलडाणा जिल्ह्यातील वनवैभव असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याची प्रसिद्धी व नागरिकांमध्ये ...

बुलडाणा : येथील ज्ञानगंगा अभयारण्य कार्यालयाच्या भिंती बोलक्या झाल्या असून, बुलडाणा जिल्ह्यातील वनवैभव असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याची प्रसिद्धी व नागरिकांमध्ये वन्य प्राण्यांप्रती प्रेमभावना निर्माण व्हावी, पर्यटकांनी प्रत्यक्षात जंगल सफारी करून निसर्गाची अनुभूती घ्यावी, म्हणून बुलडाणा वन्यजीव विभागाचे आरएफओ मयूर सुवसे यांनी कार्यालय व तपासणी नाक्यांच्या भिंतींवर वन्य प्राण्यांचे आकर्षित करणारे चित्र रेखाटले आहे. अजिंठा पर्वत रांगेत बुलडाणा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरच्या बोथा जंगलाला १९९७ मध्ये ज्ञानगंगा अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले असून, त्याचे ज्ञानगंगा अभयारण्य असे नामकरण करण्यात आले. याच जंगलातून ज्ञानगंगा नदीचा उगम होत आहे. जवळपास २०५ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या या अभयारण्यात बिबटे, अस्वल, तडस, रानकुत्रे, कोल्हे, भेडकी, चौशिंगा, निलगाय, आदी प्राणी प्रामुख्याने आढळतात. अभयारण्याच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी व स्थानिक लोकांमध्ये वन्य प्राण्यांच्या प्रती आपुलकी निर्माण व्हावी, म्हणून जनजागृती करण्यासाठी बुलडाणा शहरात असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व त्रिशरण चौक येथे अनुक्रमे अस्वल व बिबटे यांचे पुतळे बसविण्यात आले आहेत. बुलडाणा येथील वनपरिक्षेत्र कार्यालय, वरवंड नाका, गोंधनखेड नाका, बोथा नाका, आदी ठिकाणच्या भिंती रंगवून भिंतींवर वन्य प्राण्याचे अतिसुंदर चित्र बनविण्यात आले आहे. बुलडाणा-खामगाव या मार्गाने ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या लोकांना रंगविलेल्या भिंती आकर्षित करीत असून, त्यांच्या मनात जंगल सफारीची इच्छा जागृत होत आहे. पर्यटकवाढीमुळे स्थानिक लोकांचा रोजगारही वाढेल तसेच अभयारण्याचा प्रचार व प्रसार होऊन लोकांमध्ये जनजागृती होईल, हाच या मागचा उद्देश असल्याची माहिती बुलडाणा आरएफओ मयूर सुरवसे यांनी दिली आहे.