महायुतीला मतांचे दान; इतरांची दाणादाण

By Admin | Updated: May 20, 2014 23:51 IST2014-05-20T23:44:14+5:302014-05-20T23:51:48+5:30

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी महायुतीला मतांचे भरभरून दान दिले असले तरी इतर पक्षांची मात्र दानादान उडवली आहे.

Votes of Mahayuti; Others scream | महायुतीला मतांचे दान; इतरांची दाणादाण

महायुतीला मतांचे दान; इतरांची दाणादाण

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी महायुतीला मतांचे भरभरून दान दिले असले तरी इतर पक्षांची मात्र दानादान उडवली आहे. बुलडाण्यात मोठा गाजावाजा करून मनसे उमेदवारी देणार होता. पण ऐनवेळी मनसेने कच खाल्ली व उमेदवार दिला नाही. यामागील कारण काही असो परंतु गेल्या पाच वर्षात मनसेने नेटवर्क उभा केल्याचा जो देखावा निर्माण केला आहे. त्याचे मुल्यमापन करण्याची संधी या पक्षाने गमावली. तीन-तीन जिल्हाध्यक्ष असणार्‍या या पक्षाची ताकद ह्यझाकली मुठह्ण अशीच राहिली आहे. आता विधानसभा निवडणुकीत मनसेचे इंजीन किती धुर सोडते हे समजेलच. बसपाने उमेदवार देवून आपले कॅडर कायम राहिल, याचा प्रयत्न केला. ३ टक्के मते या पक्षाने घेतली हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे. तर आम आदमी पार्टीचा फुगा लोकांनीच फोडला आहे. अंजली दमानिया तसेच विजय पांढरे यांनी बुलडाण्यात येवून आम आदमी पार्टीच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यामुळे तब्बल ३३ जणांनी या पक्षाकडे उमेदवारी मागीतली होती. प्रत्यक्षात या पक्षाला मिळालेली मते आम आदमीचे बुलडाण्यात कुठेही अस्तित्व नसल्याचे दाखवून देणारे ठरले आहे. महायुतीच्या घटक पक्षातील रिपाइंला आठवलेंच्या मंत्रीपदाची तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चिखलीसारख्या मतदार संघाची अपेक्षा या निकालाने वाढविली आहे. खरतर हा निकाल सर्वच राजकीय पक्षांना नव्याने सुरूवात करण्यास बाध्य करणारा ठरला आहे. त्यामुळे या निकालातून शिकतो कोण? यावरच राजकारण अवलंबून आहे

 ** काँग्रेस: कार्यकर्त्यांची उमेद हरवीली

 काँग्रेसला या मतदारसंघातुन १९९८ मध्ये शेवटचे यश मिळाले. काँग्रेस-राकॉ आघाडीचा विचार केला तर राकॉ पेक्षाही काँग्रेसची ताकद व नेटवर्क जिल्ह्यात मजबुत आहे मात्र अंतर्गत गटबाजी असल्यामुळे काँग्रेसची ताकद अवसानघातकी आहे त्यामुळेच ९८ नंतर मुकुल वासनिक यांच्या सारख्या दिग्गजाला पराभव पहावा लागला. हा मतदारसंघ राष्ट्रवादीला गेल्यानंतर काँग्रेसची भूमिका ही दूय्यम झाली. आपले नेटवर्क वापरतांना राष्ट्रवादी सन्मान देत नाही, विचारात घेत नाही अशी भावना अनेक नेत्यांची झाली. एकसंघ काँग्रेसने निर्माण केलेली ताकद राष्ट्रवादीच्या पाठीशी किती राहिली हा संशोधनाचा विषय आहे. मात्र पाच वर्ष जुळलेला कार्यकर्ता आघाडी धर्माच्या निवडणुकीत रिकामा झाला.या निकालाने तर त्याची उभारीच हरविली आहे. पुन्हा नव्याने उमेद निर्माण करण्याचे काम काँग्रेसला करावे लागेल. काँग्रेसच्या काही नेत्यांनी आघाडी धर्म पाळला नाही, अशी तक्रार राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी केल्याची चर्चा आहे. मुळात अशा तक्रारींचे काय होते याचा अनुभव सर्वांनाच असल्यामुळे त्या गांभिर्याने घेतल्या जात नाहीत. प्रश्न हा आहे की काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात सेनेचा लिड हा कल्पनेपलीकडील आहे त्यामुळे आगामी काळात मार्ग कठीण आहे.

 **राष्ट्रवादी: नव्या बदलांची संधी हुकली

 मराठयांचा पक्ष असा राष्ट्रवादीवर शिक्का आहे. यावेळी मात्र विदर्भ व खान्देश या दोन्ही विभागात मातब्बर मराठयांना वगळून इतर समाजाच्या नेत्यांना लोकसभेत संधी दिली. बुलडाण्यातही आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांना डावलून कृष्णराव इंगळे यांना उभे करण्यात आले मात्र उभे राहीलेले इंगळे हे त्यांच्या जळगाव जामोद मतदारसंघातही चालु शकले नाहीत. इंगळे यांचा पराभव हा राष्ट्रवादीतील नव्या बदलाची कवाडे बंद करणारा ठरला आहे. आ.डॉ.शिंगणे व सेनेचे प्रतापराव जाधव यांची साठगाठ आहे असा (गैर)प्रचार गेल्या निवडणूकीतही झाला त्याचा फटका राष्ट्रवादीला बसलाच. आ.शिंगणे यांनी कितीही नकार दिला तरी जिल्हा बँकेत पुन्हा सर्वांना घेऊन राजकारण करणे त्या गैरप्रचाराला पुष्टी देणारे ठरले. कालांतराने डॉ.शिंगणे यांचेही पक्षातील महत्व कमी होत चालल्याचे प्रत्यंतर याच जिल्हा बँकेच्या विविध निर्णयांनी आले. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादीत नवे नेतृत्व निर्माण करणारी होती. कदाचीत त्यामुळेही मतांचे ध्रुवीकरण एकाच ठिकाणी एवटल्याची शंका सध्या अनेकांच्या चर्चेत आहे. आता राष्ट्रवादीला नव्याने सुरवात करीत हातात असलेल्या दोन विधानसभेत कंबर कसावी लागणार आहे. विजयाची संधी असतानाही दोन वेळा झालेला पराभव या पक्षाचा भविष्यात मतदारसंघावरील दावाच संपवू शकतो.

 **शिवसेना: नमो मंत्राची संजीवनी

 केवळ ११ महिन्याचा कालावधी सोडला तर १९९६ पासुन शिवसेनेचा झेंडा या मतदारसंघात अविरत फडकत आहे. यावेळी नमो मंत्रामुळे सेनेला मोठी संजीवनी मिळाली असुन या पक्षाची ताकद व उमेद वाढली आहे. शिवसेनेत असलेली अंतर्गत बंडाळी, वाद हे सारे या निवडणुकीत पुसल्या गेले. उद्धव ठाकरे यांनी बांधलेल्या शिवबधंनाला जागत बाळासाहेबांच्या स्वप्नपुर्तीसाठी झटलेल्या शिवसैनिकांच्या परिङ्म्रमाला सत्तेचे फळ आले आहे. या निकालाच्या पृष्ठभूमीवर शिवसेना प्रचंड फार्मात आली असुन येणार्‍या विधानसभा निवडणुकीत याचा फायदा सेनेला नक्कीच होईल, असे चित्र सध्या तरी आहे. प्रतापराव जाधव यांनी प्रत्येक मतदारसंघात लिड घेतला. हा लिड निश्‍चीतच मोदी लाटेचा असला तरी त्या-त्या मतदारसंघातील शिवसैनिकांच्या परिङ्म्रमाचाही वाटा मोठा आहे. आ.विजयराज शिंदे, आ.संजय रायमुलकर यांनी तर मतदारसंघ पिंजून काढत आपल्या विधानसभेच्या प्रचाराचीही फेरी पुर्ण केली होती त्यामुळे या सर्वाच्या मेहनतीमुळे कार्यकर्तेही पुन्हा एकदा एकसंघ झाले आहेत. ही ताकद आता विधानसभा निवडणुकांपर्यत टिकविता आली तरी सेनेसाठी मोठया यशाची पायाभरणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या तरी हा पक्ष विजयाच्या आनंदात आहे त्याचा उन्माद झाला नाही म्हणजे कमावले.

 

**भाजप युती: धर्माची पताका

 

सुखदेव नंदाजी काळे यांनी १९८९ मध्ये वासनिकांचा पराभव करून भाजपाचा झेंडा या मतदासंघावर रोवला त्यानंतर मात्र भाजपाला यश आले नाही व ९६ पासुनच्या युती मध्ये सेनेला हा मतदारसंघ गेला तेव्हापासुन भाजपा हा युती धर्माची पताका घेऊनच वावरत आहे. तीन आमदार असलेल्या भाजपाची ताकद शिवसेनेच्या इतकीच आहे मात्र लोकसभा निवडणुकीतुन हा पक्ष दुय्यम भुमिकेत आल्याने बुलडाणा,मेहकर, सिंदखेडराजा या मतदारसंघात भाजपाची ताकद ही लक्षणीय अशी राहिलेली नाही. या निवडणुकीने मात्र भाजपामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. नागपूरनंतर संघाचे सर्वात मोठे नेटवर्क बुलडाण्यात आहे त्यामुळे संघ ह्यदक्षह्ण झाल्यामुळे आता भाजपा निवडणुकीसाठी ह्यसज्जह्ण झाला आहे. केद्रात मिळालेल्या सत्तेची फळे विधानसभा निवडणुकीपर्यत वाटून पुन्हा राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाची रणनिती ठरत आहे. नमो मुळे जशी सेनेला संजीवनी मिळाली त्याही पेक्षा भाजपाला नवजिवनच मिळाले आहे त्यामुळे या पक्षाचे कार्यकर्ते कमालीचे फार्मात आहे. जळगाव जामोद, चिखली, खामगाव व मलकापूर या चार विधानसभा मतदारसंघासाठी भाजपा नव्याने कामाला लागली आहे. मुळात केंद्रातील विजयामुळे कार्यकर्ते संघटीत झाले असल्याने हाच मोठा फायदा या पक्षाला आहे.

 

**भारिप-बमसं: फासे उलटे पडले

 

अँड.प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बमसं या पक्षाची रणनिती यावेळी सपशेल अपयशी ठरली. काँग्रेससोबत आघाडी करण्याचे भिजत घोंगडे शेवटपर्यंत तसेच राहिले व आंबेडकर एकला चलो प्रमाणे अकोल्यात उभे राहिले. मात्र ते तिसर्‍या क्रमांकावर फेकल्या गेले. निवडणुकीत त्यांना सामाजिक समिकरणातून मदत होईल, म्हणून बुलडाण्यात भारिप-बमसंने उमेदवारच न देण्याची भूमिका घेतली. अकोल्यातील माळी समाज आंबेडकरांना मदत करेल त्याबदल्यात बुलडाण्यात भारिप बमसंचे कार्यकर्ते कृष्णराव इंगळेंना मदत करतील, अशी मोट बांधल्या गेली. वास्तविक या सर्व गोष्टी ऑफ द रेकॉर्ड होत्या. मात्र आता लोकांना अंधारात ठेवता येत नाही. लोकांना ही बाब समजलीच व त्याचा परिणाम उलटा झाला. या मतदार संघात भारिपने गेल्यावेळी ३१ हजार ३४ मते घेतली. त्यामुळे यावेळी त्यांचा उमेदवार विजयी होईल, अशी अपेक्षा निश्‍चितच नव्हती. परंतु पक्षाचा उमेदवार असता तर पक्षासाठी ५ वर्ष झटणारे कार्यकर्ते आपली ताकद दाखवून देतात. पक्षात चैतन्य निर्माण होते. संघटना बांधली जाते. उमेदवार नसला तर काहीच हाती लागत नाही. भारिपच्या बाबतीत बुलडाण्यात तेच झाले. खामगांव आणि जळगांव या दोन मतदार संघात असलेला हा पक्ष त्यापलिकडे वाढण्याची संधी गमावून बसला आहे.

Web Title: Votes of Mahayuti; Others scream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.