शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

मानवी संवेदना दृढ करण्यासाठी विवेकानंद विचार साहित्य संमेलन - गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 1:49 AM

मानवी संवेदना अधिक दृढ करून त्यांच्या एकात्मतेचा विचार आम्ही समाजाच्या नसानसात भिनविण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. 

ठळक मुद्देस्वामिजींच्या एकात्मतेचा विचार समाजाच्या नसानसात भिनविणार!

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम:  स्वामी विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त हिवरा आश्रम येथे आयोजित विवेकानंद विचार साहित्य संमेलन हे आगळे-वेगळे विचार संमेलन राहणार आहे. विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांना नवसमाज निर्मितीसाठी, राष्ट्र उभारणीसाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कसे प्रसारित करता येईल, हा उद्देश या संमेलनातून साधणे अपेक्षित आहे. मानवी संवेदना अधिक दृढ करून त्यांच्या एकात्मतेचा विचार आम्ही समाजाच्या नसानसात भिनविण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. सहा ते ८ जानेवारीदरम्यान होत असलेल्या स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाच्या पृष्ठभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांची उपस्थिती होती.  गोरे म्हणाले की, निष्काम कर्मयोगी शुकदास महाराज या विरक्त संन्याशाने मानवसेवेसाठी विवेकानंदांच्या विचारांची अगदी गावकुसातून पेरणी केली. आयुष्यभर त्या विचारांचे जागरण केले. 

आगळे-वेगळे संमेलनविवेकानंद विचार साहित्य संमेलन हे आगळे-वेगळे आहे. निव्वळ औपचारिकतेच्या परंपरेला फाटा देणारे हे संमेलन असून, त्यात अध्यक्षपदासाठी घोडेबाजार नसेल. संमेलनस्थळावरून वादही नसेल. पंचतारांकित व्यवस्थेसाठी सारस्वतांची एकमेकांवर चिखलफेकही नसेल. संमेलनाच्या पवित्र व्यासपीठावर राजकीय पुढार्‍यांचा वावरही नसेल, असे गोरे म्हणाले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा