ग्रामस्थांना मिळणार स्वच्छ पाणी
By Admin | Updated: April 16, 2017 13:41 IST2017-04-16T13:41:36+5:302017-04-16T13:41:36+5:30
धाड गावासाठी प्रभावी अशी ४ कोटी७२ लाखाची पाणी पुरवठा योजना मंजूर केली.

ग्रामस्थांना मिळणार स्वच्छ पाणी
धाड : गेल्या अनेक वर्षापासून धाड गावाला भेडसावणारी स्वच्छ पाणी
पुरवठ्याची प्रतिक्षा आता संपली असून सरपंच रिझवान सौदागर यांनी सतत
केलेल्या मागणी आणि पाठपुराव्याने धाड गावासाठी प्रभावी अशी ४ कोटी
७२ लाखाची पाणी पुरवठा योजना मंजूर केली. त्यामुळे आगामी काळात धाडच्या
ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे.
ग्रामीण भागात रस्ते, स्वच्छ पाणी, सांडपाण्याच्या नाल्या ह्या मुलभूत
सोयी आवश्यक आहेत. यापैकी महत्वाची पाण्याची सोय कायमस्वरुपी झाल्याने
नागरिकांना ही मोठी उपलब्धी झाली आहे, असे प्रतिपादन आ.राहुल बोंद्रे
यांनी धाड येथील ५.५० कोटीच्या विविध विकासकामाचे भूमिपुजन प्रसंगी
बोलताना केले.
धाडसह, साखळी खु., सावळी ह्या गावी आ.बोंद्रे व आ.हर्षवर्धन सपकाळ यांचे
हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन कार्यक्रम १३ एप्रिल रोजी पार पडले.
ह्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत आ.सपकाळ होते. धाड मधील राष्ट्रीय
पेयजल योजनेतून ४७२.८ लाख रु. पाणी पुरवठा योजनेसह जि.प.मधील शेषफंडातून
रस्ते बांधकाम भुमीपूजन आणि शौचालय बांधकामाचे अनुदान धनादेशाचे वाटप
येथे करण्यात आले. धाड ग्रा.पं.च्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला
होता.
याठिकाणी विशेष उपस्थितीत रसुलखान, पं.स.सभापती, प्रभाकर वाघ, अमोल
तायडे, चांद मुजावर, दिलीप खांडवे, गणेश सुसर, प्रमोद बोर्डे, वाहेदखान,
रमेश सनान्से, आमीन भै, एकनाथ धंदर, डॉ.शिंदे, रियाज अहेमद, गजानन लांडे,
सुनिल चांदा, अण्णासाहेब देशमुख, मुश्ताक सौदागर, प्रभाकर जाधव, ऐहसान
सेठ, पाशु सेठ, राजधर खाँ, संदीप शिंदे, राजू जाधव, शे.आसीफ, सै.अली भै,
लक्ष्मण बावणे, म.जुबैर यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात सरपंच रिझवान सौदागर यांनी आपल्या कार्यकाळात पाणी
पुरवठ्याची प्रभावी अशी योजना पूर्ण होत असून गावातील समस्या आपण आगामी
काळात सोडवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. संचालन
अरविंद गुजर यांनी तर आभार प्रदर्शन म.शफी यांनी केले. कार्यक्रमासाठी
ग्रामविकास अधिकारी बी.एच.धंदर व सदस्यांनी प्रयत्न केले.
(वार्ताहर)