भाजीपाल्याचे भाव काेसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST2021-02-05T08:36:26+5:302021-02-05T08:36:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : आवक वाढल्याने सर्वच भाज्यांचे दर रविवारच्या आठवडा बाजारात काेसळले. नवीन कांदा बाजारात ...

भाजीपाल्याचे भाव काेसळले
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आवक वाढल्याने सर्वच भाज्यांचे दर रविवारच्या आठवडा बाजारात काेसळले. नवीन कांदा बाजारात आल्याने भाव ४० ते ५० रुपयांवर स्थिर हाेते. फळांचा हंगाम संपत आल्याने दरात वाढ झाली आहे. खाद्यतेलही गेल्या आठवड्यात तुलनेत वाढल्याने सर्वसामान्यंना महागाईचा फटका बसणार आहे.
या आठवड्यात कांदा ४० रुपयांवर आला आहे तर हिरवी मिरची ४० रुपये किलाे, वांगी ३० रुपये किलोवर गेली आहेत. आवक घटल्याने मेथी, पालकचे दर वाढले आहेत. फळ बाजारात सफरचंद, माेसंबी, संत्रे आदींची आवक माेठ्या प्रमाणात कमी झाल्याने दर जवळपास दुप्पट झाले आहेत. किराणा साहित्यामध्ये तेलाचे भाव वाढले आहेत. सध्या बाजारातील भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव काेसळले असून, मेथी व पालक पाच रुपये जुडीप्रमाणे विकली गेली. भाव काेसळल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
द्राक्षांची आवक वाढल्याने भाव गेल्या आठड्याच्या तुलनेत कमी झाले आहेत. सफरचंद, माेसंबी व इतर फळेही महागली आहेत. टरबुजची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत.
सलीम बागवान,
फळ विक्रेता
नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने भाव ४० रुपयांवर कायम आहे. इतर भाजीपाल्याची आवक वाढल्याने तो स्वस्त झाला आहे. मिरचीचे भाव वाढलेलेच आहेत.
सचिन भालेराव, भाजी विक्रेता
द्राक्ष २०० रुपये किलाे
गत आठवड्यापासून फळांच्या दरात माेठी वाढ झाली आहे. डिलक्स सफरचंद १४० रुपये प्रतिकिलाेने विकले जात आहे. माेसंबीचे दरही माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. गत आठवड्यात डाळिंबाचे भाव १५० रुपये किलोवर हाेते. ते कायम आहेत. पपई व संत्र्याच्या दरातही वाढ झाली आहे. द्राक्षांची आवक वाढली असली तरी भाव २०० रुपयांवर स्थिर आहे.