वान धरण आर्थिक उत्पन्नाचे स्रोत !
By Admin | Updated: December 22, 2014 00:46 IST2014-12-22T00:46:54+5:302014-12-22T00:46:54+5:30
राजकीय, शासकीय इच्छाशक्तीची गरज : पर्यटन, शेती, व्यवसायाच्या विविध संधी.

वान धरण आर्थिक उत्पन्नाचे स्रोत !
पंजाबराव ठाकरे /संग्रामपूर
नैसर्गिकदृष्ट्या तालुक्यासाठी वरदान असलेल्या वान धरणाचा नियोजनात्मक वापर होत नसल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही या भागातील शेतकर्यांना उपेक्षितच राहावे लागत आहे. आर्थिक उत् पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठीही हे धरण लाभदायी ठरणारे आहे. फक्त राजकीय व शासकीय इच्छाशक्तीचा वापर होणे गरजेचे ठरत आहे.
बुलडाणा व अकोला जिल्हय़ाच्या सीमेवर असलेल्या वान धरणाच्या पाण्याचा संग्रामपूरसारख्या मागास तालुक्याला आतापर्यंत पाहिजे तसा लाभ झाला नाही. खारपाणपट्टा असल्याने पिण्यासाठी गोडे पाणी या धरणातून देण्यासाठी आता कुठे योजना कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. धरणाला लागून प्राचीन म्हणजे सर्मथ रामदास स्वामींच्या हस्ते हनुमान मूर्तीची स्थापना येथे करण्यात आली असून, वारीचा हनुमान म्हणून राज्यभर या ठिकाणाची ओळख आहे व भक्तही आहेत. मात्र राजकीय व शासकीय स् तरावर याबाबत उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत भौगोलिक स्थिती असतानाही काहीही झाले नाही. एमटीडीसीचे निवासस्थानसुद्धा येथे आतापर्यंत निर्माण करण्यात आले नाही. किमान आता तरी यामध्ये धडाडीने कार्य होण्याची अपेक्षा आहे. याच धरणामुळे संग्रामपूर तालुक्यातील वान नदीच्या तेल्हाराकडील काठावरील गावांमध्ये पाटाच्या पाण्यामुळे रब्बी पिके घेण्याची संधी आहे. यासाठी वानखेड-उकळी कालवा पातुर्डा गावापर्यंत आहे. यामध्ये पाणीवापर संस्था निर्माण करण्यात आल्या; परंतु सिंचनाचे लाभक्षेत्र या संस्थाकडे तांत्रिकत्रृट्या राहिल्याने आजपर्यंत हस्तांतरित करण्यात आले नाही म्हणून यंदा दुष्काळी परिस्थितीत धरणात पाणी असतानाही शेतकर्यांना एक पाणी पिकासाठी मिळाले नाही. एका पाण्याने या भागातील शेतकर्यांना दिलासा मिळाला असता; परंतु वान पाटबंधारे विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देताना दिसत नाहीत. सद्य:स्थितीत पाटसरीच नसल्याने दररोज लाखो लीटर पाणी वाया जात आहे. लाभ क्षेत्रातील शेतापर्यंत पाणी देण्यासाठी पाटसरी व्यवस्थित करण्याची जाबबदारी ज्या विभागाची असते त्या विभागाकडून यासाठी लाखो रुपये खर्ची घालूनही वितरण व्यवस्था शिल्लक राहिली नाही. ज्या शेतात पाटसरीने पाणी जात नाही त्या लाभधारक शेतकर्यांसाठी पाणी देण्याच्या हिशेबाने पाटात कूपनलिका कार्यान्वित करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला; मात्र कू पनलिकेवर वीज व मशीनचाही पत्ता नसल्याने कार्यान्वित नाहीत.