शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

विरोधकांकडून स्व:स्वार्थासाठीच सत्तेचा वापर - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 17:29 IST

खामगाव: स्वातंत्र्याच्या सात दशकात सत्ता उपभोगणा-या प्रस्थापितांनी केवळ गांधीजीच्या नावाचाच वापर केला. मात्र, महात्मा गांधीजीच्या स्वप्नांतील भारत निर्माणाच्या कार्यासाठी भाजप प्रयत्नशील असून, मोंदीच्या नेतृत्वात शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यास सुरूवात झाली आहे. स्वच्छ समाजाची निर्मिती ही परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याची ग्वाही महिला व बालकल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री ना. पंकजा मुंडे-पालवे यांनी येथे दिली.

ठळक मुद्देखामगाव येथ आयोजित मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्युज नेटवर्कखामगाव: स्वातंत्र्याच्या सात दशकात सत्ता उपभोगणा-या प्रस्थापितांनी केवळ गांधीजीच्या नावाचाच वापर केला. मात्र, महात्मा गांधीजीच्या स्वप्नांतील भारत निर्माणाच्या कार्यासाठी भाजप प्रयत्नशील असून, मोंदीच्या नेतृत्वात शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यास सुरूवात झाली आहे. स्वच्छ समाजाची निर्मिती ही परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याची ग्वाही महिला व बालकल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री ना. पंकजा मुंडे-पालवे यांनी येथे दिली.स्थानिक जिल्हा परिषद कन्या शाळेत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिताताई डवरे, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती श्वेताताई महाले, पंचायत समिती सभापती उर्मिलाताई गायकी,   जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. ष्णमुख राजन,  नगर परिषद उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार, समाज कल्याण सभापती गोपाळ गव्हाळे, जि.प. सदस्य जयश्रीताई टिकार, मालुबाई मानकर, वर्षा उंबरकार, रेखा महाले, पंचायत समिती उपसभापती भगवानसिंह सोळंके, गटविकास अधिकारी शिंदे, शत्रुघ्नं पाटील, गजानन देशमुख, नगर पालिकेच्या शिक्षण सभापती भाग्यश्री मानकर यांची उपस्थिती होती.

यावेळी मुंडे म्हणाल्या की, गरीबांच्या प्रत्येक घरात शौचालयाची निर्मिती करून स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. यासाठी बजेटमधील मोठ्या निधीची तरतूद ग्रामविकास खात्यासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे  शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचत असून, राज्याची अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे वाटचाल सुरू असून, मार्च महिन्यापर्यंत संपूर्ण राज्य हगणदरीमुक्त करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. स्त्री-भ्रूण हत्या थांबविण्यासाठीही शासन प्रयत्न असून, ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. जिजाऊंच्या जन्मभूमीतून या योजनेच्या जाणीव जागृती प्रचार रथाला सुरूवात झाली असून, सिंदखेड ते चोंढीपर्यत आणि नायगावपर्यंत जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या. खामगाव मतदार संघातील रस्ते विकासासाठी २६.५ कोटी रूपयांचा निधीही ग्रामविकास खात्याकडून देण्यात आला आहे. यामध्ये मतदार संघातील ५२ किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यांची निर्मिती केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.प्रास्ताविक गटविकास अधिकारी शिंदे यांनी केले. संचलन अरविंद शिंगाडे यांनी केले. याप्रसंगी आ. आकाश फुंडकर यांचेही समयोचित भाषण झाले. या मार्गदर्शन मेळाव्याला अंगणवाडी सेविका, आशा सेविकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. यावेळी शिलाई मशीन, झेरॉक्स मशीनचे वितरण  त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियान वकृत्व स्पर्धेतील मंजुश्री कळस्कार, वैष्णवी सोनटक्के यांच्यासह हगणदरी मुक्तीसाठी कार्यरत ग्रामसेवक, सरपंच तसेच आयएसओ मानांकन शाळांमधील शिक्षक,  तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात यशस्वी कामगिरी करणाºया विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. पशुसंवर्धन योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचेही वितरण ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे- पालवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे पंचायत समितीतंर्गत वैयक्तीक लाभार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटपही याप्रसंगी करण्यात आले.उपेक्षीतांच्या उत्थानासाठी सरकारचे प्रयत्न- ना. फुंडकरग्रामीण विकासाच्या स्वप्नं पूर्तीच्या दिशेने राज्य शासनाची वाटचाल सुरू आहे. विकासाच्या परिवर्तनाची नांदी राज्यात सुरू आहे. शेतकºयांना पाणी, वीज आणि शेतमालाला भाव देण्यासाठी शासन कटीबध्द असून, उपेक्षीतांच्या उत्थानासाठी सरकारचे प्रयत्न असल्याची ग्वाही राज्याचे कृषी तथा फलोत्पादन मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी येथे दिली.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेkhamgaonखामगाव