शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांकडून स्व:स्वार्थासाठीच सत्तेचा वापर - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 17:29 IST

खामगाव: स्वातंत्र्याच्या सात दशकात सत्ता उपभोगणा-या प्रस्थापितांनी केवळ गांधीजीच्या नावाचाच वापर केला. मात्र, महात्मा गांधीजीच्या स्वप्नांतील भारत निर्माणाच्या कार्यासाठी भाजप प्रयत्नशील असून, मोंदीच्या नेतृत्वात शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यास सुरूवात झाली आहे. स्वच्छ समाजाची निर्मिती ही परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याची ग्वाही महिला व बालकल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री ना. पंकजा मुंडे-पालवे यांनी येथे दिली.

ठळक मुद्देखामगाव येथ आयोजित मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्युज नेटवर्कखामगाव: स्वातंत्र्याच्या सात दशकात सत्ता उपभोगणा-या प्रस्थापितांनी केवळ गांधीजीच्या नावाचाच वापर केला. मात्र, महात्मा गांधीजीच्या स्वप्नांतील भारत निर्माणाच्या कार्यासाठी भाजप प्रयत्नशील असून, मोंदीच्या नेतृत्वात शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यास सुरूवात झाली आहे. स्वच्छ समाजाची निर्मिती ही परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याची ग्वाही महिला व बालकल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री ना. पंकजा मुंडे-पालवे यांनी येथे दिली.स्थानिक जिल्हा परिषद कन्या शाळेत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिताताई डवरे, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती श्वेताताई महाले, पंचायत समिती सभापती उर्मिलाताई गायकी,   जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. ष्णमुख राजन,  नगर परिषद उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार, समाज कल्याण सभापती गोपाळ गव्हाळे, जि.प. सदस्य जयश्रीताई टिकार, मालुबाई मानकर, वर्षा उंबरकार, रेखा महाले, पंचायत समिती उपसभापती भगवानसिंह सोळंके, गटविकास अधिकारी शिंदे, शत्रुघ्नं पाटील, गजानन देशमुख, नगर पालिकेच्या शिक्षण सभापती भाग्यश्री मानकर यांची उपस्थिती होती.

यावेळी मुंडे म्हणाल्या की, गरीबांच्या प्रत्येक घरात शौचालयाची निर्मिती करून स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. यासाठी बजेटमधील मोठ्या निधीची तरतूद ग्रामविकास खात्यासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे  शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचत असून, राज्याची अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे वाटचाल सुरू असून, मार्च महिन्यापर्यंत संपूर्ण राज्य हगणदरीमुक्त करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. स्त्री-भ्रूण हत्या थांबविण्यासाठीही शासन प्रयत्न असून, ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. जिजाऊंच्या जन्मभूमीतून या योजनेच्या जाणीव जागृती प्रचार रथाला सुरूवात झाली असून, सिंदखेड ते चोंढीपर्यत आणि नायगावपर्यंत जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या. खामगाव मतदार संघातील रस्ते विकासासाठी २६.५ कोटी रूपयांचा निधीही ग्रामविकास खात्याकडून देण्यात आला आहे. यामध्ये मतदार संघातील ५२ किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यांची निर्मिती केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.प्रास्ताविक गटविकास अधिकारी शिंदे यांनी केले. संचलन अरविंद शिंगाडे यांनी केले. याप्रसंगी आ. आकाश फुंडकर यांचेही समयोचित भाषण झाले. या मार्गदर्शन मेळाव्याला अंगणवाडी सेविका, आशा सेविकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. यावेळी शिलाई मशीन, झेरॉक्स मशीनचे वितरण  त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियान वकृत्व स्पर्धेतील मंजुश्री कळस्कार, वैष्णवी सोनटक्के यांच्यासह हगणदरी मुक्तीसाठी कार्यरत ग्रामसेवक, सरपंच तसेच आयएसओ मानांकन शाळांमधील शिक्षक,  तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात यशस्वी कामगिरी करणाºया विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. पशुसंवर्धन योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचेही वितरण ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे- पालवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे पंचायत समितीतंर्गत वैयक्तीक लाभार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटपही याप्रसंगी करण्यात आले.उपेक्षीतांच्या उत्थानासाठी सरकारचे प्रयत्न- ना. फुंडकरग्रामीण विकासाच्या स्वप्नं पूर्तीच्या दिशेने राज्य शासनाची वाटचाल सुरू आहे. विकासाच्या परिवर्तनाची नांदी राज्यात सुरू आहे. शेतकºयांना पाणी, वीज आणि शेतमालाला भाव देण्यासाठी शासन कटीबध्द असून, उपेक्षीतांच्या उत्थानासाठी सरकारचे प्रयत्न असल्याची ग्वाही राज्याचे कृषी तथा फलोत्पादन मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी येथे दिली.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेkhamgaonखामगाव