शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

चराई क्षेत्र कमी झाल्यामुळे मेंढपाळ अडचणीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 16:46 IST

 बुलडाणा : चराई क्षेत्र कमी झाल्यामुळे मेंढपाळांना आपल्या मेंढ्यांना चारण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्दे४८ वन विभागापैकी २७ वनविभागांमध्ये चराईक्षेत्र उपलब्ध नाही.चराईक्षेत्र उपलब्ध असेल्या २१ वनविभागात मागिल काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.

- हर्षनंदन वाघ

 बुलडाणा : चराई क्षेत्र कमी झाल्यामुळे मेंढपाळांना आपल्या मेंढ्यांना चारण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यात वनक्षेत्राची व्याप्ती एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २० टक्के असली तरी ४८ वन विभागापैकी २७ वनविभागांमध्ये चराईक्षेत्र उपलब्ध नाही. तर उपलब्ध असलेल्या वनविभागात अतिक्रमण व वृक्ष लागवड करण्यात आल्यामुळे चराईक्षेत्र कमी झाल्यामुळे मेंढपाळ अडचणीत आले आहेत. राज्यात एकूण ४८ वनविभागांपैकी चराई क्षेत्र उपलब्ध नसलेल्या २७ वनविभागात अमरावती, पूर्व मेळघाट, पश्चिम मेळघाट, उस्मानाबाद, बीड, परभणी, अहमदनगर, पूर्व नाशिक, पश्चिम नाशिक, सोलापूर, भोर, पुणे, जुन्नर, ठाणे, जव्हार, शहापूर, रोहा, अलीबाग, डहाणू, मेवासी, यावल, जळगाव, भामरागड, ब्रम्हपूरी, चिपळूण, यवतमाळ, पांढरकवाड या वनविभागाचा समावेश आहे. तर चराईक्षेत्र उपलब्ध असलेल्या २१ वनविभागात बुलडाणा, वर्धा, भंडारा, नागपूर, गोंदिया, औरंगाबाद, नांदेड, पश्र्चिम धुळे, उत्तर धुळे, सिरोंचा, आलापल्ली, मध्यचांदा, गडचिरोली, वडसा, चंद्रपूर, सावंतवाडी, सातारा, कोल्हापूर, अकोला, सांगली आणि पूसद या विभागांचा समावेश आहे. चराईक्षेत्र उपलब्ध असेल्या २१ वनविभागात मागिल काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. याशिवाय शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गंत वनविभागाच्या अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे चराईक्षेत्र मोठ्या प्रमाणात झपाट्याने कमी झाल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील मेंढपाळ अडचणीत आले आहेत.

 चराई पासेस देण्यास टाळाटाळ

मेंढपाळांना आपल्या तालुक्यातील वनविभागाच्या चराईक्षेत्रात मेंढ्या चारण्यासाठी पासेसची गरज आहे. मात्र चराईक्षेत्र कमी झाल्यामुळे वनविभागाचे अधिकारी पुरेसे पासेस उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे मेंढपाळ अडचणीत आले आहेत. शासनाच्या २ जानेवारी २०१७ च्या आदेशान्वये ३ हजार पेक्षा जास्त मेंढी संख्या असलेल्या तालुक्यांसाठी वनक्षेत्रात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गंत घोषित संरक्षित क्षेत्र वगळून मेंढी चराई परवाने देणे आवश्यक आहे. मात्र चराईक्षेत्र कमी झाल्यामुळे चराई पासेस देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

आजरोजी प्रत्येक मेंढपाळाजवळ कमीत कमी १० तर जास्तीत जास्त ३०० मेंढ्या आहेत. यासाठी वनविभागाकडून चराईक्षेत्रात मेंढ्या चारण्यासाठी परवानगी पासेस आवश्यक आहेत. मात्र वनविभागाकडून एका मेंढपाळास फक्त ४ चराई पासेस देण्यात येत आहेत. त्यामुळे मेंढ्या चारण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.

-धोंडीराम गोयकर, मेंढपाळ, रा.ईसालवाडी ता. मोताळा जि.बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाforestजंगल