शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चराई क्षेत्र कमी झाल्यामुळे मेंढपाळ अडचणीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 16:46 IST

 बुलडाणा : चराई क्षेत्र कमी झाल्यामुळे मेंढपाळांना आपल्या मेंढ्यांना चारण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्दे४८ वन विभागापैकी २७ वनविभागांमध्ये चराईक्षेत्र उपलब्ध नाही.चराईक्षेत्र उपलब्ध असेल्या २१ वनविभागात मागिल काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.

- हर्षनंदन वाघ

 बुलडाणा : चराई क्षेत्र कमी झाल्यामुळे मेंढपाळांना आपल्या मेंढ्यांना चारण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यात वनक्षेत्राची व्याप्ती एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २० टक्के असली तरी ४८ वन विभागापैकी २७ वनविभागांमध्ये चराईक्षेत्र उपलब्ध नाही. तर उपलब्ध असलेल्या वनविभागात अतिक्रमण व वृक्ष लागवड करण्यात आल्यामुळे चराईक्षेत्र कमी झाल्यामुळे मेंढपाळ अडचणीत आले आहेत. राज्यात एकूण ४८ वनविभागांपैकी चराई क्षेत्र उपलब्ध नसलेल्या २७ वनविभागात अमरावती, पूर्व मेळघाट, पश्चिम मेळघाट, उस्मानाबाद, बीड, परभणी, अहमदनगर, पूर्व नाशिक, पश्चिम नाशिक, सोलापूर, भोर, पुणे, जुन्नर, ठाणे, जव्हार, शहापूर, रोहा, अलीबाग, डहाणू, मेवासी, यावल, जळगाव, भामरागड, ब्रम्हपूरी, चिपळूण, यवतमाळ, पांढरकवाड या वनविभागाचा समावेश आहे. तर चराईक्षेत्र उपलब्ध असलेल्या २१ वनविभागात बुलडाणा, वर्धा, भंडारा, नागपूर, गोंदिया, औरंगाबाद, नांदेड, पश्र्चिम धुळे, उत्तर धुळे, सिरोंचा, आलापल्ली, मध्यचांदा, गडचिरोली, वडसा, चंद्रपूर, सावंतवाडी, सातारा, कोल्हापूर, अकोला, सांगली आणि पूसद या विभागांचा समावेश आहे. चराईक्षेत्र उपलब्ध असेल्या २१ वनविभागात मागिल काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. याशिवाय शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गंत वनविभागाच्या अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे चराईक्षेत्र मोठ्या प्रमाणात झपाट्याने कमी झाल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील मेंढपाळ अडचणीत आले आहेत.

 चराई पासेस देण्यास टाळाटाळ

मेंढपाळांना आपल्या तालुक्यातील वनविभागाच्या चराईक्षेत्रात मेंढ्या चारण्यासाठी पासेसची गरज आहे. मात्र चराईक्षेत्र कमी झाल्यामुळे वनविभागाचे अधिकारी पुरेसे पासेस उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे मेंढपाळ अडचणीत आले आहेत. शासनाच्या २ जानेवारी २०१७ च्या आदेशान्वये ३ हजार पेक्षा जास्त मेंढी संख्या असलेल्या तालुक्यांसाठी वनक्षेत्रात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गंत घोषित संरक्षित क्षेत्र वगळून मेंढी चराई परवाने देणे आवश्यक आहे. मात्र चराईक्षेत्र कमी झाल्यामुळे चराई पासेस देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

आजरोजी प्रत्येक मेंढपाळाजवळ कमीत कमी १० तर जास्तीत जास्त ३०० मेंढ्या आहेत. यासाठी वनविभागाकडून चराईक्षेत्रात मेंढ्या चारण्यासाठी परवानगी पासेस आवश्यक आहेत. मात्र वनविभागाकडून एका मेंढपाळास फक्त ४ चराई पासेस देण्यात येत आहेत. त्यामुळे मेंढ्या चारण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.

-धोंडीराम गोयकर, मेंढपाळ, रा.ईसालवाडी ता. मोताळा जि.बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाforestजंगल