शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

आदिवासी प्रकल्प कार्यालयाने घेतला बळी; मृत शिक्षकाच्या कुटुंबीयांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:12 AM

दोषी नसतानाही आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या मनमानी कारभाराने शे.सलीम शे.मुनाफ यांचा बळी घेतला असल्याचा आरोप गत ७ डिसेंबर रोजी हृदयविकाराने मृत्यू पावलेल्या शे.सलीम शे.मुनाफ यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : खामगाव तालुक्यातील पाळा येथील निंबाजी कोकरे अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील अत्याचार प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटल्यानंतर या शाळेची मान्यता रद्द करून १८ आरोपींवर दोषारोपपत्र दाखल होऊन न्यायालयीन चौकशी सुरू आहे. या प्रकरणात दोषी नसतानाही आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या मनमानी कारभाराने शे.सलीम शे.मुनाफ यांचा बळी घेतला असल्याचा आरोप गत ७ डिसेंबर रोजी हृदयविकाराने मृत्यू पावलेल्या शे.सलीम शे.मुनाफ यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.याबाबत मृत शिक्षकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सदर शाळेवरील २५ शालेय कर्मचार्‍यांपैकी नऊ जणांवर फौजदारी कारवाई होऊन त्यांचे निलंबन झाले आहे. दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणेच उर्वरित १६ शालेय कर्मचार्‍यांचे इतरत्र समायोजनाचे आदेश असतानाही याबाबत अद्यापही कारवाई  झालेली नाही, तसेच सदर कर्मचार्‍यांना शासन निर्णयानुसार निलंबन काळात देय असलेला निर्वाह भत्तादेखील अद्यापही सुरू करण्यात आलेला नाही, त्यामुळे गेल्या वर्षभरापासून उपासमारीची वेळ येऊन ठेपली असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते. अशातच मृत शेख सलीम यांचा आरोपींमध्ये समावेश नसतानासुद्धा व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची फौजदारी कारवाई झालेली नसताना त्यांना ४ नोव्हेंबर २0११ रोजी अदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आदिवासी विकास आयुक्त नाशिक हे शाळेला भेट देण्यास आले असता, शे.सलीम यांच्यावर शाळेत अनुपस्थित राहून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यासह दोन शिक्षक व एक स्वयंपाकी यांना निलंबित करण्यात आले. वस्तुत: भेटीच्या दिवशी शे.सलीम तेथे उपस्थित असल्याचे व्हिडिओ चित्रीकरणात असल्याबाबतचा पुरावा सादर करूनही अन्यायकारक पद्धतीने निलंबित करण्यासोबतच निलंबनानंतर कोणत्याही प्रकारची चौकशीसुद्धा केलेली नाही, तसेच निलंबन काळात देय असलेला निर्वाह भत्तादेखील सुरू केलेला नाही. दरम्यान, मृत शे.सलीम यांनी मृत्यूपूर्वी याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा केला असता, याकडे दुर्लक्ष झाल्याशिवाय निलंबन काळात प्रकल्प कार्यालय अकोला येथे मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश असल्याने बिकट आर्थिक परिस्थितीत व या प्रकरणात काही संबंध नसताना सोसावा लागणारा मन:स्ताप सहन न झाल्याने ७ डिसेंबर २0१७ रोजी त्यांच्या राहते गावी सवणा येथे हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, दोन मुले व पत्नी असा परिवार असून, या घटनेनंतर मृताची पत्नी शाहीन परवीन व कुटुंबीयांनी याबाबत दाद मागण्यासाठी अकोला येथे आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्याकडे गेले असता, हा प्रकार अंगलट येण्याच्या भीतीने सदर कार्यालयाने आमच्यावरच खोट्या तक्रारी दाखल केल्या असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला असून, या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा दोष नसताना मृत्यू पावलेल्या शे.सलीम यांना व इतर तीन कर्मचार्‍यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी कयुम शहा व मृताच्या कुटुंबीयांनी केली आहे. 

टॅग्स :chikhali roadचिखली रोडbuldhanaबुलडाणा