शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

‘वृक्ष वल्ली’ पोहचणार आता शेतात; बुलडाणा जिल्ह्यात वनशेती उपअभियानाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 17:29 IST

 - ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी जिल्ह्यात वन शेती उपअभियान हाती घेण्यात आल्याने ‘वृक्ष वल्ली’ आता शेतात पोहचणार आहे. त्यासाठी शेतकºयांना चार टप्प्यात अनुदान देण्यात येत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीचे हे पहिले वर्ष असून जिल्हा फळरोपवाटीकेकडून २५ हजार रोपे उपलब्ध करून देण्यात आले आहे.राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत ...

ठळक मुद्देराष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी राज्यभर वन शेती उपअभियान राबविण्यात येत आहे. वनशेतीमुळे नैसर्गिक साधनांचे संवर्धन होऊन वातावरणातील बदल काही प्रमाणात सौम्य होऊ शकते.उपअभियानाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली असून त्यासाठी जिल्हा फळरोपवाटीककडे २५ हजार रोपे उपलब्ध करण्यात आले आहेत.

 - ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी जिल्ह्यात वनशेती उपअभियान हाती घेण्यात आल्याने ‘वृक्ष वल्ली’ आता शेतात पोहचणार आहे. त्यासाठी शेतकºयांना चार टप्प्यात अनुदान देण्यात येत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीचे हे पहिले वर्ष असून जिल्हा फळरोपवाटीकेकडून २५ हजार रोपे उपलब्ध करून देण्यात आले आहे.राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी राज्यभर वन शेती उपअभियान राबविण्यात येत आहे. वनशेतीला प्रोत्साहन देण्यासह शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी हे अभियान उपयुक्त असून, यासाठी शेतकºयांना आलेल्या खर्चाच्या ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. या अभियानामुळे वातावरणातील बदल आणि पावसाच्या लहरीपणामुळे जोखमीचा झालेला शेती व्यवसाय शाश्वत करण्यासह शेतकºयांच्या उत्पादनात वाढ करणे फायद्याचे होणार आहे. वनशेतीमुळे नैसर्गिक साधनांचे संवर्धन होऊन वातावरणातील बदल काही प्रमाणात सौम्य होऊ शकते. केंद्र शासनाच्या सूचनांनुसार राबविण्यात येणाºया वन शेती उपअभियानाची अंमलबजावणी व नियोजनामध्ये कृषी आणि वन विभागाचा सहभाग महत्त्वाचा आहे. शेतकºयांच्या जमीनीवर हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ, रोजगाराच्या संधी, उत्पन्न आणि उपजिविकेचे साधन निर्माण करणे हा प्रमुख उद्देश या अभियानाचा आहे. जिल्ह्यात वन शेती उपअभियानाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली असून त्यासाठी जिल्हा फळरोपवाटीककडे २५ हजार रोपे उपलब्ध करण्यात आले आहेत.  शेतकºयांचा वनशेतीकडे कल वळविण्याकरीता वनशेतीसाठी शासकीय रोपवाटीकेतून रोपे देण्यात येत आहेत.  आठ कोटी रुपये निधीवृक्षतोड व लाकूड वाहतुकीचे नियम शिथिल करणाºया राज्यांत हे उपअभियान राबवण्यात येते. या अभियानासाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये राज्यात सुमारे ८ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार सध्या राज्यभर वनशेती उपअभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. 

वन शेती उपअभियान अंतर्गत विविध रोपे शासकीय फळरोपवाटीकेमध्ये उपलब्ध आहेत.  लागवडीसाठी शेतकºयांना टप्प्या-टप्प्याने अनुदान देण्यात येणार आहे. - मयुरी खलाणे, कृषी अधिकारी, जिल्हा फळरोपवाटीका बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाforestजंगलagricultureशेती