शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘वृक्ष वल्ली’ पोहचणार आता शेतात; बुलडाणा जिल्ह्यात वनशेती उपअभियानाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 17:29 IST

 - ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी जिल्ह्यात वन शेती उपअभियान हाती घेण्यात आल्याने ‘वृक्ष वल्ली’ आता शेतात पोहचणार आहे. त्यासाठी शेतकºयांना चार टप्प्यात अनुदान देण्यात येत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीचे हे पहिले वर्ष असून जिल्हा फळरोपवाटीकेकडून २५ हजार रोपे उपलब्ध करून देण्यात आले आहे.राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत ...

ठळक मुद्देराष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी राज्यभर वन शेती उपअभियान राबविण्यात येत आहे. वनशेतीमुळे नैसर्गिक साधनांचे संवर्धन होऊन वातावरणातील बदल काही प्रमाणात सौम्य होऊ शकते.उपअभियानाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली असून त्यासाठी जिल्हा फळरोपवाटीककडे २५ हजार रोपे उपलब्ध करण्यात आले आहेत.

 - ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी जिल्ह्यात वनशेती उपअभियान हाती घेण्यात आल्याने ‘वृक्ष वल्ली’ आता शेतात पोहचणार आहे. त्यासाठी शेतकºयांना चार टप्प्यात अनुदान देण्यात येत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीचे हे पहिले वर्ष असून जिल्हा फळरोपवाटीकेकडून २५ हजार रोपे उपलब्ध करून देण्यात आले आहे.राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी राज्यभर वन शेती उपअभियान राबविण्यात येत आहे. वनशेतीला प्रोत्साहन देण्यासह शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी हे अभियान उपयुक्त असून, यासाठी शेतकºयांना आलेल्या खर्चाच्या ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. या अभियानामुळे वातावरणातील बदल आणि पावसाच्या लहरीपणामुळे जोखमीचा झालेला शेती व्यवसाय शाश्वत करण्यासह शेतकºयांच्या उत्पादनात वाढ करणे फायद्याचे होणार आहे. वनशेतीमुळे नैसर्गिक साधनांचे संवर्धन होऊन वातावरणातील बदल काही प्रमाणात सौम्य होऊ शकते. केंद्र शासनाच्या सूचनांनुसार राबविण्यात येणाºया वन शेती उपअभियानाची अंमलबजावणी व नियोजनामध्ये कृषी आणि वन विभागाचा सहभाग महत्त्वाचा आहे. शेतकºयांच्या जमीनीवर हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ, रोजगाराच्या संधी, उत्पन्न आणि उपजिविकेचे साधन निर्माण करणे हा प्रमुख उद्देश या अभियानाचा आहे. जिल्ह्यात वन शेती उपअभियानाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली असून त्यासाठी जिल्हा फळरोपवाटीककडे २५ हजार रोपे उपलब्ध करण्यात आले आहेत.  शेतकºयांचा वनशेतीकडे कल वळविण्याकरीता वनशेतीसाठी शासकीय रोपवाटीकेतून रोपे देण्यात येत आहेत.  आठ कोटी रुपये निधीवृक्षतोड व लाकूड वाहतुकीचे नियम शिथिल करणाºया राज्यांत हे उपअभियान राबवण्यात येते. या अभियानासाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये राज्यात सुमारे ८ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार सध्या राज्यभर वनशेती उपअभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. 

वन शेती उपअभियान अंतर्गत विविध रोपे शासकीय फळरोपवाटीकेमध्ये उपलब्ध आहेत.  लागवडीसाठी शेतकºयांना टप्प्या-टप्प्याने अनुदान देण्यात येणार आहे. - मयुरी खलाणे, कृषी अधिकारी, जिल्हा फळरोपवाटीका बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाforestजंगलagricultureशेती