शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष संवर्धनातून स्मृतीचे जतन; पर्यावरणपुरक रक्षाविसर्जन करून लावला वटवृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 18:19 IST

उबाळे कुटुंबियांनी वडिलांच्या मृत्यूनंतर रूढी परिवर्तनाचा सामाजिक संदेश देत पर्यावरणपुरक अस्थी व रक्षाविसर्जन करीत त्याठिकाणी वटवृक्षाचे रोपटे लावले.

- नवीन मोदे

धामणगाव बढे : स्वकीयाचा मृत्यू म्हणजे मनाला चटका लावणारी गोष्ट. परंतु, मृत्यू हेच जीवनाचे अंतीम सत्य आहे. अशाच दुखाच्या प्रसंगी पिंप्रीगवळी येथील उबाळे कुटुंबियांनी वडिलांच्या मृत्यूनंतर रूढी परिवर्तनाचा सामाजिक संदेश देत पर्यावरणपुरक अस्थी व रक्षाविसर्जन करीत त्याठिकाणी वटवृक्षाचे रोपटे लावले. त्यांच्या या कृतीचे समाजातील मान्यवरांनी कौतूक केले.पिंप्रीगवळी येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी कडूबा नारायण उबाळे (८४) यांचे २१ मे रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. आयुष्यभर त्यांनी वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेतला. त्यासाठी शेतात; तसेच घराच्या परिसरात अनेक झाडांचे संगोपन केले. २३ मे रोजी पिंप्रीगवळी येथे त्यांच्या अस्थी व रक्षा विसर्जनाचा (सावडण्याचा) विधी पार पडला. परंतु, वेगळ्या पध्दतीने त्यासाठी अस्थी व रक्षा विसर्जन नदीपात्रात न करता शेतामध्ये एका खडड्यात करण्यात आले व त्याठिकाणी समाजातील मान्यवरांचेहस्ते वटवृक्षाचे रोपटे लावण्यात आले. घरातील प्रिय व्यक्ती मृत्यूनंतरसुध्दा कधीही विस्मरणात जाऊ नये व शेवटच्या विधीमध्येसुध्दा पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी उबाळे कुटुंबीयांनी प्रत्यक्ष कृतीतून राबविलेली संकल्पना प्रेरणादायी आहे. त्याचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत झाले. त्यासोबत वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी आणखी २५ वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार कडुबा उबाळे यांचे पुत्र मारोती उबाळे यांनी केला. सर्वप्रथम जलसंपदा विभागात काम करणाºया स्व.कडुबा उबाळे यांचे नातु अंकीत चौथनकर यांनी ही संकल्पना मांडली व कुटुंबियांनी त्यास पाठबळ दिले. समाज परिवर्तनासाठी दिशादर्शक ठरणाºया या रक्षाविसर्जन कार्यक्रमाला दलितमित्र माधवराव हुडेकर, माजी आमदार सखाराम अहेर गुरूजी, डॉ. शिवशंकर गोरे, शिवसेना तालुका प्रमुख रामदास चौथनकर, विष्णु उबाळे, गणपतराव अहेर, गजानन हुडेकर, सरोदे, अंबादास धोंगडे, बहुसंख्य समाज बांधव तथा मित्र, आप्तेष्ट उपस्थित होते. 

 परिवर्तनवादी विचारांची आज समाजाला गरज आहे. पिंप्रीगवळी येथील उबाळे कुटुंबियांचा आदर्श अनुकरणीय आहे. वृक्षसंवर्धनातून प्रिय व्यक्तीच्या स्मृतीचे जतन ही लोकचळवळ बनावी यासाठी प्रयत्न करू.-डॉ.शिवशंकर गोरेसावता मंडळ, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाSocialसामाजिक