शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

वृक्ष संवर्धनातून स्मृतीचे जतन; पर्यावरणपुरक रक्षाविसर्जन करून लावला वटवृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 18:19 IST

उबाळे कुटुंबियांनी वडिलांच्या मृत्यूनंतर रूढी परिवर्तनाचा सामाजिक संदेश देत पर्यावरणपुरक अस्थी व रक्षाविसर्जन करीत त्याठिकाणी वटवृक्षाचे रोपटे लावले.

- नवीन मोदे

धामणगाव बढे : स्वकीयाचा मृत्यू म्हणजे मनाला चटका लावणारी गोष्ट. परंतु, मृत्यू हेच जीवनाचे अंतीम सत्य आहे. अशाच दुखाच्या प्रसंगी पिंप्रीगवळी येथील उबाळे कुटुंबियांनी वडिलांच्या मृत्यूनंतर रूढी परिवर्तनाचा सामाजिक संदेश देत पर्यावरणपुरक अस्थी व रक्षाविसर्जन करीत त्याठिकाणी वटवृक्षाचे रोपटे लावले. त्यांच्या या कृतीचे समाजातील मान्यवरांनी कौतूक केले.पिंप्रीगवळी येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी कडूबा नारायण उबाळे (८४) यांचे २१ मे रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. आयुष्यभर त्यांनी वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेतला. त्यासाठी शेतात; तसेच घराच्या परिसरात अनेक झाडांचे संगोपन केले. २३ मे रोजी पिंप्रीगवळी येथे त्यांच्या अस्थी व रक्षा विसर्जनाचा (सावडण्याचा) विधी पार पडला. परंतु, वेगळ्या पध्दतीने त्यासाठी अस्थी व रक्षा विसर्जन नदीपात्रात न करता शेतामध्ये एका खडड्यात करण्यात आले व त्याठिकाणी समाजातील मान्यवरांचेहस्ते वटवृक्षाचे रोपटे लावण्यात आले. घरातील प्रिय व्यक्ती मृत्यूनंतरसुध्दा कधीही विस्मरणात जाऊ नये व शेवटच्या विधीमध्येसुध्दा पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी उबाळे कुटुंबीयांनी प्रत्यक्ष कृतीतून राबविलेली संकल्पना प्रेरणादायी आहे. त्याचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत झाले. त्यासोबत वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी आणखी २५ वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार कडुबा उबाळे यांचे पुत्र मारोती उबाळे यांनी केला. सर्वप्रथम जलसंपदा विभागात काम करणाºया स्व.कडुबा उबाळे यांचे नातु अंकीत चौथनकर यांनी ही संकल्पना मांडली व कुटुंबियांनी त्यास पाठबळ दिले. समाज परिवर्तनासाठी दिशादर्शक ठरणाºया या रक्षाविसर्जन कार्यक्रमाला दलितमित्र माधवराव हुडेकर, माजी आमदार सखाराम अहेर गुरूजी, डॉ. शिवशंकर गोरे, शिवसेना तालुका प्रमुख रामदास चौथनकर, विष्णु उबाळे, गणपतराव अहेर, गजानन हुडेकर, सरोदे, अंबादास धोंगडे, बहुसंख्य समाज बांधव तथा मित्र, आप्तेष्ट उपस्थित होते. 

 परिवर्तनवादी विचारांची आज समाजाला गरज आहे. पिंप्रीगवळी येथील उबाळे कुटुंबियांचा आदर्श अनुकरणीय आहे. वृक्षसंवर्धनातून प्रिय व्यक्तीच्या स्मृतीचे जतन ही लोकचळवळ बनावी यासाठी प्रयत्न करू.-डॉ.शिवशंकर गोरेसावता मंडळ, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाSocialसामाजिक