जिल्हा परिषदांमधील बदल्या थांबल्या!
By Admin | Updated: May 24, 2014 00:08 IST2014-05-23T23:28:05+5:302014-05-24T00:08:34+5:30
शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी; बदल्यांच्या प्रक्रियेला स्थगिती

जिल्हा परिषदांमधील बदल्या थांबल्या!
बुलडाणा: राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये, विविध विभागातील कर्मचार्यांच्या समुपदेशाने बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली होती; मात्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याच्या पृष्ठभूमीवर या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. बदल्यांच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याचे नमूद करणारे पत्र प्राप्त होताच, समुपदेशनाची प्रक्रिया अध्र्यावर थांबविण्यात आली आहे. गट ह्यकह्ण व गट ह्यडह्ण च्या समुपदेशनातून होणार्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. तशी सूचना ग्रामविकास मंत्रालयाचे उपसचिव अ. ए. कुलकर्णी यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिली आहे.
बुलडाणा जिल्हा परिषदेत कालपासून एकूण १३५ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, आज सकाळी पुन्हा समुपदेशन सुरू करण्यात आले होते; मात्र दरम्यानच्या काळात ग्रामविकास मंत्रालयाचे पत्र प्राप्त झाल्यामुळे, ही सर्व प्रक्रिया दुपारीच थांब्विण्यात आली.