शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

थकीत शेतकऱ्यांनी फिरविली नाफेडच्या तूर खरेदीकडे पाठ

By admin | Updated: April 4, 2017 00:46 IST

शेतमाल विक्रीतून संमतीविना ४० टक्के कर्जकपात

खामगाव : अवसायनात असलेल्या जिल्ह्यातील ग्रामसेवा/विविध कार्यकारी सहकारी संस्थांना नवसंजीवनी मिळावी, तसेच कोट्यवधी रुपयांची थकलेली कर्ज वसुलीसाठी प्रशासनाने सक्तीने पाऊल उचलले असून, या अंतर्गत शेतमालापोटी देण्यात येणाऱ्या चुकाऱ्यातून ४० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या संमतीविना कपात केली जात आहे. शेतकऱ्यांना हक्काची असणारी जिल्हा केंद्रीय बँक तसेच ग्रामसेवा/विविध कार्यकारी सहकारी संस्था ह्या कोट्यवधी रुपयांचे कर्ज थकल्याने गत काही वर्षांपासून अवसायनात आहेत. दरम्यान, जिल्हा बँकेला केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला. मात्र, तरीही या बँकेचे व्यवहार अजूनही सुरळीत झाले नाहीत. परिणामी शेतमाल विक्रीतून मिळणाऱ्या रकमेमधून ४० टक्के कपात सक्तीने केली जात आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती/सचिव, जिल्ह्यातील सर्व तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थाचे अध्यक्ष/व्यवस्थापक व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी पत्र दिले असून, कर्जकपातीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. याबाबत दिलेल्या पत्रात, महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम १९६० चे कलम ४८ (अ) आणि कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व नियमन) अधिनियम १९६३ चे कलम ३० (अ) अन्वये ग्रामसेवा/ विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जदार सभासदाच्या शेतमाल विक्रीतून सांगड पद्धतीने सहकारी संस्थांची कपात करणे कायद्यातील तरतुदीनुसार अनिवार्य आहे. ही कायद्यातील अनिवार्य तरतूद असल्यामुळे सद्यस्थितीत सुरू असलेल्या तूर या शेतमालाचे विक्रीतून कर्जदार शेतकऱ्याकडील कर्जाची कपात विक्री रकमेच्या ४० टक्के मर्यादेपर्यंत करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्याची संमती नसली, तरीसुद्धा विक्री रकमेच्या ४० टक्केपर्यंत किंवा कर्ज रक्कम यापैकी जे कमी असेल तितकी कपात करून सदर रक्कम संबंधितांकडे पाठविण्यात यावी, अशा सूचना या पत्रान्वये देण्यात आल्या आहेत. तसेच वरील कायद्यातील तरतुदीचे पालन न केल्यास संबंधित अधिनियमानुसार आपण कार्यवाहीस पात्र राहाल, याची नोंद घ्यावी, असा इशारासुद्धा या पत्रान्वये देण्यात आला आहे. एकूणच या पत्रानुसार शेतमाल चुकाऱ्यातून कर्ज रक्कम कपात केली जात आहे.

कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांनी फिरविली नाफेडच्या केंद्रांकडे पाठनाफेड केंद्रावर तूर विकल्यानंतर सहकारी संस्थांच्या थकीत असलेल्या कर्जाची कपात केली जात आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे ग्रामसेवा/विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांकडून नाफेड केंद्रावर तूर विक्रीऐवजी खुल्या बाजारात तूर विक्री केली जात आहे. नाफेडचे केंद्रावर शेतकऱ्यांचा शेतमाल स्वीकारल्या जात असला, तरी अनेकजण व्यापारी म्हणून शेतकऱ्यांजवळील तूर खरेदी करुन शेतकऱ्यांचे सातबारा जमा करुन शेतकऱ्यांच्या नावावर नाफेडच्या केंद्रावर हमीभावाने शेतमाल विक्री करतात. मात्र, शेतमाल चुकाऱ्यातून थकीत कर्जाची कपात सुरु झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काही शेतकऱ्यांनी आपली तूर व्यापाऱ्याला देऊन त्याच्याकडून रक्कम घेतली. तसेच चुकाऱ्यांच्या पैशातून कर्ज कपातही करून घेतल्याची काही उदाहरणे दिसून येत आहेत.