शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

पश्‍चिम वर्‍हाडात २४ तासांत तीन शेतकरी आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:16 IST

खामगाव/वाशिम : पश्‍चिम वर्‍हाडात २४ तासात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. याशिवाय विष प्राशन केलेल्या आणखी एका शेतकर्‍याची प्रकृती गंभीर आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांपैकी दोन बुलडाणा तर एक वाशिम जिल्ह्यातील रहिवासी होते. 

ठळक मुद्देविष प्राशन केल्याने एक शेतकरी गंभीर, उपचार सुरू 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव/वाशिम : पश्‍चिम वर्‍हाडात २४ तासात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. याशिवाय विष प्राशन केलेल्या आणखी एका शेतकर्‍याची प्रकृती गंभीर आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांपैकी दोन बुलडाणा तर एक वाशिम जिल्ह्यातील रहिवासी होते. नांदुरा येथील  दोन शेतकर्‍यांनी २८ फेब्रुवारी रोजी विष प्राशन केले. यापैकी एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर आहे. तत्पूर्वी, २७ फेब्रुवारी रोजी देऊळगाव मही तालुक्यातील एका शेतकर्‍याने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. अवघ्या २४ तासात दोघांनी आत्महत्या, तर एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. नांदुरा तालुक्यातील विजयसिंह उत्तमसिंह जाधव (वय-५६) यांच्याकडे दोन एकर शेती असून, कपाशीच्या उत्पन्नातून  आर्थिक स्थिती सुधारेल, या आशेने यावर्षी जाधव यांनी कपाशी पिकाची लागवड केली होती. मात्र बोंडअळीने संपूर्ण पिकाचे नुकसान झाले. परिणामी,  कर्जाचा डोंगर वाढल्याने नैराश्यातून जाधव यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता विषारी कीटकनाशक प्राशन केले. जाधव यांच्यावर  बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेंबा शाखेचे ४0 हजार रुपयांचे कर्ज आणि कृषी कर्जही होते. कर्जमाफीची घोषणा होऊनही त्यांचे कर्ज अजूनही माफ झालेले नाही. परिणामी, आर्थिक विवंचनेतून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. याशिवाय नांदुरा तालुक्यातीलच खुमगाव बुर्टी येथील शेतकरी प्रभाकर गोंडू हिवाळे यांनी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान त्यांच्या बुर्टी शिवारातील शेतात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रभाकर हिवाळे यांच्या मालकीचे पाच एकर शेत असून, त्यांनी बीटी कपाशीची लागवड केली होती. बोंडअळीच्या हल्ल्यात कपाशीचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून  त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. 

युवा शेतकर्‍याने घेतला गळफासदेऊळगावमही येथून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या वाकी बु. येथील अल्पभूधारक युवा शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी घडली. वाकी बु. येथील रहिवासी रामदास नारायण दराडे (वय २८) या अल्पभूधारक शेतकर्‍याने स्वत:च्या   शेतातील नाल्यामध्ये झाडाला केबल वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

बाळू गाठे यांनी घेतली विहिरीत उडीकारंजा लाड : तालुक्यातील हिवरा लाहे येथील बाळू नागोराव गाठे (वय ४५) या शेतकर्‍याने कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून २७ फेबुवारी रोजी सायंकाळी ७.३0 वाजताच्या दरम्यान स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली. बाळू गाठे हे २७ फेबुवारी रोजी शेतात जातो म्हणून घरून निघून गेले. गेल्या वर्षांपासून नापिकी व मुलीचा विवाह ह्या खर्च या विवंचनेत असल्याने त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्याकडे ४ एकर शेती असून जिल्हा सहकारी बँकेचे ६0 हजार रुपये कर्ज आहे. 

त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. मुलांचे शिक्षण, तसेच शेतीचा खर्च असह्य झाल्याने बाळूने आत्महत्या केली. ही माहिती धनज पोलीस स्टेशनला हिवरा लाहे येथील सरपंच सागर ढेरे व पोलीस पाटील देवकिसन कवरे यांनी धनज पोलिसांना दिली.  

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याbuldhanaबुलडाणाwashimवाशिमKaranjaकारंजा