शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हजारो शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 15:43 IST

शेवटच्या शेतकºयाच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी लागणारा अवधी पाहता, हजारो शेतकºयांना आणखी बराच काळ प्रतीक्षाच करावी लागण्याची चिन्हे आहेत

- देवेंद्र ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गत पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. शासनाकडून दुष्काळी अनुदान जाहीर झाले. या प्रक्रीयेला १ महिना उलटला असला, तरी खामगावसह घाटाखालील हजारो शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे.यावर्षीचा खरीप हंगाम अति पावसामुळे धोक्यात आला. उडीद, मुग, सोयाबीन, ज्वारी, मका, कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शासन स्तरावरून झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून अहवाल तयार करण्यात आले. यानंतर राष्ट्रपती राजवट सुरू असतानाच्या काळात दुष्काळामुळे झालेल्या नुकसानापोटी राज्यपालांनी मदतीची घोषणा केली. यानुसार दोन हेक्टरपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या मदतीनुसार हेक्टरी ८ हजार रूपये मदत जाहीर करण्यात आली. फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रूपये मदत देण्याची घोषणा झाली. यानंतरही बराच कालावधी गेला. अखेर नोव्हेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यातील मदतीची रक्कम तालुका स्तरावर जमा करण्यात आली. त्याचे वाटपही काही ठिकाणी पुर्ण झाले, तर अद्यापही काही शेतकºयांना मदत मिळणे बाकी आहे. यानंतर दुसºया टप्प्याची रक्कम जमा करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही रक्कम बँकनिहाय वाटप करण्यासाठी आणखी आठवडा जाईल. गत पहिल्या टप्प्यातील मदत जमा होण्याकरीता लागलेला महिनाभराचा कालावधी लक्षात घेता, दुसºया टप्प्यातील मदत शेवटच्या शेतकºयाच्या खात्यात जमा होईपर्यंत आणखी एक महिना लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिसºया टप्याची रक्कम आणि नंतर वाटप यामुळे अगदी शेवटच्या शेतकºयाच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी लागणारा अवधी पाहता, हजारो शेतकºयांना आणखी बराच काळ प्रतीक्षाच करावी लागण्याची चिन्हे आहेत. वास्तविक पाहता, खरीप हंगामातील पिकांचे झालेले नुकसान तसेच गत तीन ते चार वर्षांपासून असलेली दुष्काळी परिस्थिती पाहता, यावर्षी शेतकºयांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता होती. एकीकडे यावर्षीच्या दुष्काळी अनुदानाची ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे गतवर्षीचे दुष्काळी अनुदान, पिक विम्याची रक्कम, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचेही भीजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे शेवटच्या शेतकºयापर्यंत लाभ केव्हा मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी